माजी मंत्री कोंडालिझा राईस म्हणाल्या, डॉ सिंह यांनी अमेरिका-भारत संबंध ‘ नव्या स्तरावर’… अणु करारावरील डॉ मनमोहन सिंह यांच्या भूमिकेचे केले कौतुक

डॉ मनमोहन सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना आपल्या भावना अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री कोंडालिझा राईस म्हणाल्या की,
माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह हे एक महान नेते होते ज्यांनी दोन्ही राष्ट्रांमधील ऐतिहासिक नागरी आण्विक कराराद्वारे अमेरिका-भारत संबंधांना “मूलभूतपणे नवीन स्तरावर” ठेवण्यास मदत केली, असल्याची भावना व्यक्त केली.

कोंडालिझा राईस पुढे बोलताना म्हणाल्या की, भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याबद्दल मला खूप वाईट वाटले – एक महान व्यक्ती आणि एक महान नेता ज्याने २००८ च्या ऐतिहासिक यूएस-भारत नागरी अणु कराराद्वारे यूएस-भारत संबंधांना मूलभूतपणे नवीन स्तरावर आणण्यास मदत केली असल्याचे एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हणाल्या.

त्या ट्विटमध्ये पुढे कोंडालिझा राईस ज्या, २००५ ते २००९ पर्यंत परराष्ट्र सचिव होत्या आणि त्यापूर्वी त्यांनी २००१ ते २९९५ या काळात तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम केले होते. याबाबत बोलताना म्हणाल्या की,  ती आठ वर्षे भारत-अमेरिका बदलणारी वर्षे म्हणून पाहिली जातात. याच संबधी सांगायचे, विशेषतः ऐतिहासिक नागरी अणु करार जो डॉ. मनमोहन सिंह आणि जॉर्ज बुश यांनी संयुक्तपणे सुरू केला होता.

कोंडालिझा राईस पुढे बोलताना म्हणाल्या की, “पंतप्रधान सिंह यांनी त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आणले आणि नंतर एक करार सुरक्षित करण्यासाठी आवश्यक पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांचे सरकार पुन्हा तयार केले, ज्यामुळे या प्रदेशाचा भौगोलिक राजकीय मार्ग बदलला जाईल आणि पुढील दशकांपर्यंत त्याचे दूरगामी परिणाम होतील. या मोठ्या हानीबद्दल मी भारतातील लोकांप्रती मनापासून शोक व्यक्त करते – त्यांना चिरशांती लाभो, ” असे सांगत आदरांजलीही वाहिली.

 

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कधी पूर्ण होणार? मुंबईला देशातील प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना विलंब का ?

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन १५ वर्षे झाली तरी अद्याप हा महामार्ग पूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *