सुपारी व नारळ झाडांच्या नुकसानीबद्दल मिळणार या नव्या रकमेनुसार मदत राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी

 निसर्ग चक्रीवादळामुळे पुर्णत: नष्ट झालेल्या  सुपारी व नारळाच्या झाडांना   विशेष बाब म्हणून   प्रति झाडाप्रमाणे  वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

निसर्ग चक्रीवादळामुळे  रायगड व रत्नागिरी जिल्हयात नुकसान झालेल्या बहुवार्षिक पिकांपैकी  सुपारी व नारळाच्या झाडांना  प्रति हेक्टरी रू. 50,000/- या दराने मदत देण्याऐवजी  पुर्णत: नष्ट झालेल्या  सुपारी व नारळाच्या झाडांना प्रति झाड प्रमाणे खालील दराने मदत  देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

सुपारी – रू ५०/- संपूर्ण नष्ट झालेल्या प्रति झाडासाठी

नारळ   – रू. २५०/- संपूर्ण नष्ट झालेल्या प्रति झाडासाठी

वरील दराने मदत देण्यासाठी होणारा संपुर्ण खर्च राज्य शासनाच्या निधीमधून करण्यास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

 

About Editor

Check Also

ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी

ग्रामपंचायत निवडणूक नियमावलीतील काही तरतुदी आणि आरक्षण निश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून राबवली जाणारी पद्धत ही अनुसूचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *