पालघर : प्रतिनिधी काँग्रेसचा विचार हाच देशाला, संविधानाला व सर्व जातीधर्माच्या लोकांना तारणारा आहे. काँग्रेसला इतिहास आहे व भविष्यही आहे. परंतु भारतीय जनता पक्षाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही. भाजपाने देश विकायला काढला असून डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी दिलेले संविधानही बदलण्याचा घाट घातला आहे, अशा भाजपाचे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समूळ उच्चाटन …
Read More »जयंत पाटलांचा कामाचा झपाटा; सकाळी ९ ते पहाटे ५, दिवस संपला दिवसभर अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि विभागाचा आढावाही
बीड: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सर्वांनाच त्यांच्या कामाचा झपाटा पाहायला मिळत असून पाटील यांचा सकाळी ९ वाजता सुरू झालेला दिवस दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता संपला. दिवसभरात अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी बीड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील …
Read More »भाजपामध्ये गेलेल्या लोकांना केंद्रीय एजन्सींचे संरक्षण आहे का?… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा खोचक सवाल
अहमदनगर: प्रतिनिधी भाजपामध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे आले …
Read More »मुख्यमंत्र्यांनी दिला शेतकऱ्यांना शब्द, “आपत्तीतून बाहेर काढणार….” तातडीची सर्वतोपरी मदत पोहचविण्याचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : प्रतिनिधी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, …
Read More »सलग तिसऱ्या दिवशी डिझेल तर पेट्रोलच्या दरात २२ दिवसांनी वाढ पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी महाग
मुंबई: प्रतिनिधी मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी डिझेल महागले आहे. तसंच २२ दिवसांनी पेट्रोलचे दर बदलले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलचे दर २५ पैशांनी आणि पेट्रोलचे दर २० पैशांनी वाढवले आहेत. आता दिल्लीत पेट्रोल १०१.३९ रुपये आणि डिझेल ८९.५७ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. याचा परिणाम म्हणून, ब्रेंट क्रूडचा दर शनिवारी ७८ डॉलर प्रति बॅरलची पातळी ओलांडून ७९.३६ डॉलरवर पोहोचला. कच्चे तेल ३ वर्षांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१८ मध्ये ते ८० डॉलरपर्यंत पोहोचले होते. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी वाढू शकतात. या वर्षी आतापर्यंत पेट्रोल १७.४२ रुपयांनी आणि डिझेल १५.४५ रुपयांनी महाग झाले आहे. १ जानेवारीला पेट्रोल ८३.९७ …
Read More »आमदार जिग्नेश मेवाणी, डावा नेता कन्हैयाकुमार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पार पडला प्रवेश सोहळा
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशातील आगामी गुजरात, उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि डाव्या चळवळीत तरूण नेता कन्हैया कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पाटीदार नेता हार्दीक पटेलही यावेळी उपस्थित होता. नवी दिल्लीतील आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात या दोघांनी …
Read More »पिकाची मोळी घेवून व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्यास जयंत पाटील यांनी दिला धीर जलसंपदा मंत्री पाटील यांनी पूरपरिस्थितीची केली पाहणी, अधिकाऱ्यांशी फोनवरून साधतायेत संवाद
बीड: प्रतिनिधी जालना, परभणी व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज सकाळी बीड येथे नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पावसाने हाती आलेले पीक वाया गेलेल्या पीकाची मोळी घेवून व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला जयंत …
Read More »मी धनंजय बोलतोय, तुम्ही व्यवस्थित, सुरक्षित आहात ना काळजी करु नका धनंजय मुंडे घटनास्थळी, रात्रीतून वेगाने मदतकार्य झाल्याने जीवितहानी टळली
अंबाजोगाई: प्रतिनिधी “मी धनंजय बोलतोय, तुम्ही व्यवस्थित, सुरक्षित आहात ना? किती जण व कुठे अडकलेले आहात? बोट मदतीला आली आहे का? काळजी करू नका;” असे बोलून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांची विचारपूस केली. देवळा ता.अंबाजोगाई येथील ५१ जण मांजरा …
Read More »प्रविण दरेकरांनी ठोकला हजार कोटींचा दावा मुंबै बँकेची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल
मुंबई: प्रतिनिधी मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक आहे. कारण मुंबै बँक आम्ही बाराशे कोटीच्या टप्प्यावरून दहा हजार कोटीवर मेहनतीने आणली. मुंबईच्या सहकाराचे हे वैभव आहे. या लौकिकास काळीमा फासण्याचे काम दुदैर्वाने काही जणांकडून झाले आहे. त्यामुळे बॅंकेच्या संदर्भात कोणीही उठसूट वाटेल ते स्टेटमेंट देईल हे …
Read More »हि शहरे हाय स्पीड रेल्वेने जोडा, मविआचे पूर्ण सहकार्य मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी मुंबई –नाशिक- नागपूर हाय स्पीड रेल्वेच्या कामाला गती देताना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल मात्र याच जोडीने जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद तसेच पुणे ते औरंगाबाद देखील हाय स्पीड रेल्वेने जोडावेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री आपल्या पत्रात …
Read More »
Marathi e-Batmya