मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. हे देशातील जनता पहात आहे. वैयक्तिक महत्वकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असे महाराष्ट्र …
Read More »मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले… काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही
मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असून काल शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी …
Read More »शेलारांचा सवाल, महाराष्ट्रातील तरूणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीवरून भाजपाची टीका
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र दौ-यावर असणा-या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्यावतीने त्यांची भेट घेणारे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीची अधिकृत माहिती महाराष्ट्र शासनाने जाहीर करावी. हे एक कटकारस्थान असून इथले उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाण्यास सत्ताधारी शिवसेना मदत तर करीत नाही ना? असा सवाल भाजपा नेते आमदार …
Read More »एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीबाबत उद्या बैठक मान्यता प्राप्त संघटना होणार सहभागी
मुंबई: प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या वेतनवाढीबाबत सांशकता आहे. ती दूर करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मान्यता प्राप्त संघटनांची उद्या बैठक बोलावली आहे. बैठकीत वेतन निश्चितीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वेतन निश्चितीबाबत निर्णय सरकारने पगारवाढ दिल्यानंतर एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. विलीनीकरणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत आंदोलन …
Read More »रश्मी शुक्ला प्रकरणामुळे कुंटेच्या मुदतवाढीला ब्रेक? कुंटेची मुदतवाढ केंद्राने रोखली
मुंबई: प्रतिनिधी सीताराम कुंटे यांना मुख्य सचिव पदासाठी किमान तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राला पाठवला होता. परंतु, रश्मी शुक्ला प्रकरणाच्या चौकशीत कुंटेनी बजावली भूमिका राज्य शासनाच्या पथ्यावर पडली. केंद्र सरकारच्या कार्यपध्दतीवर यावेळी साशंकता निर्माण झाल्याने मुदतवाढीला ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे. सीताराम कुंटे ३० नोव्हेंबरला निवृत्त …
Read More »गोपीचंद पडळकरांचा आरोप, अजित पवारांनी दिशाभूल केली एमपीएसएसी आयोगावर अद्याप सदस्यांची नियुक्ती नाहीच
मुंबई: प्रतिनिधी स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होऊनही स्वप्निल लोणकर सारख्या होतकरू विद्यार्थ्यांला आत्महत्या करावी लागली होती. तेंव्हा या प्रस्थापितांच्या आघाडी सरकारने खोटा आव आणत MPSC च्या विविध प्रश्नांबाबात फक्त घोषणाच केल्या. फक्त तोंडाची वाफ केली. विधान सभेत मोठ्या मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर …
Read More »ठाकरे सरकारने मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत
मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपयांची मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण ३४ कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ कोटी ६५ लाख रूपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे. आजवर शासनाची मदत न …
Read More »सीताराम कुंटे आता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार तर मुख्य सचिव पदाची धुरा चक्रवतींकडे अप्पर मुख्य सचिव देबाषीश चक्रवर्ती यांच्याकडे तात्पुरता पदभार
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे आज मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त झाल्याने मुख्य सचिव पदाचा पदभार अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सुपुर्द करण्यात आला. तसेच कोरोना काळात आणि त्यांची प्रदीर्घ प्रशासकिय सेवेतील अनुभव पाहून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रधान सल्लागार पदी राज्य सरकारने …
Read More »राज्यातील महाविद्यालयांमध्ये इन्फोसिस देणार ३ हजार ९०० कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणासाठी इन्फोसिस कंपनीसोबत सांमजस्य करार
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच या कराराच्या माध्यमातून ३ हजार ९०० पेक्षा …
Read More »शाळांची घंटा १ तारखेलाच वाजणारः फक्त या नियमांचे पालन करावे लागणार पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई: प्रतिनिधी येत्या १ डिसेंबर पासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. शाळा सुरू …
Read More »
Marathi e-Batmya