राजकारण

अजित पवार म्हणाले, मंत्रिपद मिळाल्यानंतर फिरणं भाग मात्र जरा भान ठेवलं असत तर… केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर तिरकस टीका

पुणे: प्रतिनिधी प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. राज्यात त्या चार जणांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर सांगितलं फिरा. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर फिरणं भाग आहे. पण प्रत्येकाने भान ठेवलं असतं तर हि वेळ आली नसती असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांचे नाव न घेता लगावला. …

Read More »

उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे-भाजपा नेते आशिष शेलार यांची टीका

रत्नागिरी: प्रतिनिधी ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उध्दव ठाकरे हे असून त्यांची शिवसेना कोकण विरोधी असल्याचा आरोप भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी रत्नागिरी येथे केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून रत्नागिरीतून पुन्हा सुरुवात झाली …

Read More »

वकिलांची चांगली फौज, अनिल परबांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

सांगली: प्रतिनिधी हे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर चाललंय, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत आपल्याकडे वकिलांची चांगली फौज असून ते सतत कायद्याची सविस्तर माहिती घेवून त्यानुसार न्यायालयीन लढ्यासाठी मदत करत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार सारखं न्यायालयाकडून थपडा खात असून परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं …

Read More »

पाठी लागू नका मी बोलायला लागलो तर सगळचं अवघड होईल चीवचीव सेना पुन्हा घरावर चालून आली तर त्यांचा योग्य सन्मान करू

रत्नागिरी: प्रतिनिधी मुंबई आणि कोकणात सुरु असलेल्या जन आर्शिवाद यात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यामुळे आलो आहे. या यात्रे दरम्यान काही घटना घडल्या. त्याचा सगळाच उल्लेख मी करत नाही. मात्र माझ्यावर झालेली कारवाई ही बेकायदेशीर असून एखाद्या दरोडेखोराप्रमाणे माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. नारायण राणेच्या पाठी जास्त लागू नका नाही …

Read More »

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वांचेच एकमत: अंतिम निर्णय येत्या ७ दिवसानंतर प्राप्त सूचना, उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करून शुक्रवारी पुन्हा बैठक

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक घेऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या …

Read More »

महाराष्ट्र प्रदेशची काँग्रेसची कार्यकारणी आणि १४ जिल्हा व ग्रामीणचे अध्यक्ष अखेर जाहीर १८ उपाध्यक्ष, ६५ जनरल सेक्रेटरी, १०४ सचिव, ६ प्रवक्ते कायम

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसची कार्यकारणीत कोणा कोणाचा समावेश होणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यानुसार आज काँग्रेसच्या केंद्रीय समितीने महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेस कार्यकारणीतील नावांना मंजूरी दिली असून यासंबधीची यादीही जाहीर केली. या कार्यकारणीत १८ उपाध्यक्ष, ६५ जनरल सेक्रेटरी, १०४ सचिव, १ खजिनदार आदींसह कार्यकारणी सदस्य आणि १४ …

Read More »

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदला वाढीसह मंत्रिमंडळाने घेतले हे महत्वाचे निर्णय निधी वितरणातील सुसूत्रता, अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहने, न्यायाधीशांना सुधारीत वेतनश्रेणी

मुंबई: प्रतिनिधी आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या दरमहा मोबदल्यात एक हजार रुपये तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कोरोना महामारी सुरु असेपर्यन्त आशा स्वयंसेविका व आशा गटप्रर्वतक यांना  दरमहा पाचशे रुपये कोविड भत्ता राज्य शासनाच्या निधीतून अदा …

Read More »

इंजिनिअरींगचे नवे कॉलेज, वाढीव तुकड्या या गोष्टी करायचेत या तारखेपर्यंत प्रस्ताव पाठवा तंत्रशिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थाच्या परवानगीसाठी मुदतवाढ

मुंबई : प्रतिनिधी राज्यात इंजिनियरींग अर्थात तंत्रशिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थांना कॉलेज सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अशा नव्या संस्थांना परवानगीसाठी आता १५ सप्टेंबर २०२१ पूर्वी अर्ज करता येतील.  यादृष्टीने  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ अधिनियम, १९९७ मधील विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात …

Read More »

बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? भाजपा आमदार गोपीचंद पडकरांची शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊतांवर टीका

सांगली-मुंबई: प्रतिनिधी आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असा खोचक सवाल करत असंतर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपीतांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल अशी बोचरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत …

Read More »

भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी सत्तेचा कितीही दुरुपयोग करा, परंतु भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही नसल्याचे सांगत भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री व नेत्यांना दिलेल्या धमक्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले. भाजपला जे करायचे आहे ते करावे. कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. …

Read More »