राजकारण

भाजपा-सेनेचे मंत्री पराभूत मुंडे, भेगडे, शिवतारे, शिंदे, खोतकर,बोंडे, फुके यांचा पराभव

मुंबईः प्रतिनिधी अब की बार २२० पारचा नारा देत भाजपा-शिवसेनेने निवडणूकीची घोषणा होण्याआधीच प्रचारात आघाडी घेतली. तसेच मागील पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशोब देण्यासाठी महाजनादेश, जनआर्शीवाद यात्रा काढल्या. मात्र या यांत्रांचा परिणाम काही राज्यातील जनतेवर झालेला नसून यात भाजपा-शिवसेनेचे ५ विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे दिसून येत आहे. राज्य …

Read More »

उदयनराजे भोसलेंचा ८३ हजाराने लोकसभा पोटनिवडणूकीत पराभव माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील ४ लाख ८३ हजार मतांनी विजयी

मुंबईः प्रतिनिधी सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करत पोटनिवडणूक लढविली. मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशाने नाराज झालेल्या सातारकरांनी उदयनराजेंना पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना विजयी केले. या पोटनिवडणूकीत श्रीनिवास पाटील यांना ४ लाख ८२ हजार ९४७ …

Read More »

भाजपा-सेनेच्या सत्ता उन्मादाला जनतेने नाकारले विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबईः प्रतिनिधी या निवडणुकीत दिसलं की भाजप – सेनेच्या लोकांचा सत्तेचा उन्माद जनतेला पसंद पडला नाही.मुळात जमिनीवर पाय ठेवून चालले की, त्यांचे स्वागत होते. परंतु त्यांनी सीमा ओलांडली होती अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. विधानसभा निवडणूकांचे निकाल दुपारपर्यंत स्पष्ट झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत …

Read More »

वंचितमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १२ जागा धोक्यात ९ हजाराहून अधिकचे मतदान घेतल्याने महाआघाडीच्या जागा घटल्या

मुंबईः प्रतिनिधी राज्यात लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणूकीतही वंचित बहुजन आघाडी आपली किमया दाखविणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून दुपारपर्यंत वंचितने आपली जादू दाखवित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ जागा धोक्यात आणल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवार अरविंद भातंबरे यांना १४ हजार ८६३ …

Read More »

नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मा पिछाडीवर क्षितीज ठाकूर विजयाच्या उंबरठ्यावर

मुंबईः प्रतिनिधी चकमेकफेम माजी पोलिस अधिकारी प्रदिप शर्मा हे निवडणूकीच्या रिंगणात उतरून राजकारणात आपले नशीब अजमावत होते. परंतु त्यांना पोलिसीगिरीतील दंबगशाही काही राजकारणात सध्यातरी दाखविता आली नाही. त्यांना ३६ हजार ७८० मते मिळून पिछाडीवर आहेत. तर तेथील विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांना ५९ हजार ९१३ मतांनी आघाडीवर असून त्यांचा विजय …

Read More »

वंचित आघाडीने रिसोडमध्य़े खाते उघडले अकोट, मुर्तिजापूरात आघाडीवर वंचित

मुंबईः प्रतिनिधी राज्यात लोकसभेनंतर विधानसभेसाठी रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीने रिसोडमध्ये आपले खाते उघडले आहे. वंचितचे उमेदवार दिलीप जाधव हे विजयी झाले असून शेजारील मुर्तिजापूर येथेही वंचितच्या उमेदवार प्रतिभा अवचार या ५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तसेच अकोटमध्ये संतोष रहाटे हे ही आघाडीवर आहेत. Share on: WhatsApp

Read More »

पंकजा मुंडे, राम शिंदे, मेहता पराभवाच्या छायेत धनंजय मुंडे, राम शिंदे, गीता जैन यांचा विजय निश्चित

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतमोजणीची सुरु आहे. या मतमोजणीत परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे १२ हजारहून अधिक, तर कर्जत-जामखेडमधून रोहीत पवार हे १३ हजारहून अधिक आणि मीरा-भाईंदरमधून अपक्ष उमेदवार गीता जैन या १२ हजारहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपाचे पंकजा मुंडे, राम शिंदे, नरेंद्र मेहता …

Read More »

मतमोजणीच्या कामासाठी पंचवीस हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या २४ रोजी होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली. मतमोजणी उद्या सकाळी ८ वाजता सुरू होईल. दरम्यान सर्व …

Read More »

मंत्री रावसाहेब दानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी भाजपाचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे कायदा तोडण्याचा सल्ला देत असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली. केंदीय मंत्री रावसाहेब दानवे हे कायदा तोडण्याचा सल्ला आणि प्रोत्साहन देवून लोकांच्या भावनेशी खेळत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या मंत्र्यांवर …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी शेतकऱ्यांच्या सबसिडीस स्थगिती तिजोरीतील पैशाअभावी राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या तिजोरीत पैसाच नसताना शासकिय कर्मचारी आणि शिक्षकांच्या पगारीचे दिवाळीपूर्वी वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषीपंपाच्या सबसिडीपोटीच्या रकमेच्या वाटपाला स्थगिती देण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतल्याची माहिती वित्त विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मागील काही वर्षापासून राज्य सरकारकडून वीज बचतीच्या अनुषंगाने कृषी पंपाचे …

Read More »