राजकारण

संकटातील अर्थव्यवस्थेवरून लक्ष हटविण्यासाठी नागरीकत्व कायदा आणला भारतातील धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता- शरद पवारांची भीती

पुणेः प्रतिनिधी देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक आणि संकटात असताना नागरीकत्व कायदा (CAA) कायदा आणून या मुळ मुद्यावरून लक्ष हटविण्यासाठीच हा विषय पुढे आणण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. तसेच या कायद्यामुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता असल्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुण्यात आयोजित पत्रकार …

Read More »

गिरणी कामगारांच्या घरांसाठी पनवेल येथे जागा हक्काची घरे देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्नः मंत्री जयंत पाटील

नागपूरः प्रतिनिधी मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा आहे. त्यादृष्टीकोनातून शहरातील ३८ गिरण्यांच्या जमिनीवर २४ हजार घरे तर उरलेली पनवेल येथील कोन गाव येथे पर्यायी जागा उपलब्ध असल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. विधानसभेत विचारण्यात आलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. गिरण्या …

Read More »

संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव हाणून पाडा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे आवाहन

नागपूरः प्रतिनिधी संविधानामुळे आपल्या देशात लोकशाही रूजली आणि वाढली. हेच संविधान बदलून देशात हुकुमशाही आणण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव आहे. संविधानाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचा डाव हाणून पाडण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. …

Read More »

फडणवीसांच्या उद्विग्न प्रश्नांना मुख्यमंत्री ठाकरेंची दिलखुलास उत्तरे भारूडाला अभंगातून आणि विडंबनातून जवाब

नागपूरः विशेष प्रतिनिधी राज्यपालांच्या अभिभाषणावरील ठरावाच्यावेळी काल काहीजणांनी हे चालेची ना ते चालेची ना सारखे काहीतरी म्हणत होते. मात्र आम्ही कमी बोलतो, जास्त काम करतो असे सांगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भाषेत सांगायचे तर संताचा तो प्रचार अमर, अजूनही लोक-मनावर, राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा उद्धरितो अशा पध्दतीचे आमचे राज्य …

Read More »

काँग्रेस पक्ष तरूणांना मोठी संधी देणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

नागपूरः प्रतिनिधी काँग्रेस पक्षाचा विचार हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विचार आहे. भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध आणि विभाजनवादी अजेंड्याला राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वाढवणारा काँग्रेस विचारच रोखू शकतो. काँग्रेसची विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करण्यासाठी तरूणांना मोठ्या प्रमाणात संधी देणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री …

Read More »

फडणवीस अभिभाषणावर बोलताय की सत्तेपासून वंचित राहिल्याचे दुःख व्यक्त करताय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा विरोधी पक्षनेत्यांना टोला

नागपूरः प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात झाली. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते की सत्तेपासून वंचित राहिल्याचे दुःख व्यक्त करत होते तेच कळत नव्हते. फडणवीस म्हणाले की श्रद्वेय बाळासाहेबांप्रती त्यांना आदर आहे. आदर होता तर उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द का नाही पाळला ? …

Read More »

सरकार स्थापनेवरून रंगली फडणवीस आणि शिंदे यांच्यात खडाजंगी अभिभाषणावरील चर्चेवेळी विरोधी पक्षनेत्यांची घसरली गाडी

नागपूरः विशेष प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सलग तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत हे सरकार जनमताचा कौल नाकरून सत्तेत विराजमान झाल्याचा आरोप केला. त्यावर शिवसेनेचे गटनेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत गोवा, मेघालय येथे काय केले ते आठवून पहा …

Read More »

शेतकरी आणि पुरग्रस्तांसाठी केंद्राकडे १४ हजार ६०० कोटींची मागणी अर्थमंत्री जयंत पाटील यांची सभागृहात माहिती

नागपूर: प्रतिनिधी राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने ६ हजार ६०० कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी २१०० कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पुरग्रस्तांच्या मदतीकरीता राज्य शासनाने १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केल्याची माहिती अर्थ मंत्री जयंत …

Read More »

बातमीचा फलक मुख्यमंत्र्यांसमोर फडकाविल्याने भाजपा-शिवसेनेच्या आमदारात धक्काबुक्की विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची सत्ताधारी-विरोधकांना समज

नागपूरः विशेष प्रतिनिधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यावरून भाजपाने आज दुसऱ्या दिवशीही आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई २५ हजाराची द्यावी अशी मागणी करत होते. यावेळी भाजपाचे औसाचे आमदार अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समोरील मोकळ्याजागेत बातमीचा फलक फडकाविण्याचा प्रयत्नास शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, …

Read More »

एकीकडे मराठीचा उदोउदो तर दुसरीकडे हिंदीत बॅनरबाजी भाजपाच्या दुटप्पी धोरणावर नवाब मलिक यांची टिका

नागपूरः प्रतिनिधी एकीकडे मराठीचा उदोउदो करायचा आणि दुसरीकडे सावरकरप्रकरणी आंदोलन करताना हिंदीत बॅनर झळकवायचे अशा प्रकारच्या भाजपच्या दुटप्पी धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रात भाजपा मराठी विषयी प्रेम व्यक्त करते मात्र आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सावरकरप्रकरणी हिंदीमध्ये बॅनर झळकवण्यात आले …

Read More »