मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होवून ६ दिवस झाले तरी महायुतीतील सत्ता स्थापनेवरून सुरू असलेला घोळ काही केल्या संपेना. त्यातच आता भाजपाने १३ मंत्रीपदासह उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव शिवसेनेला पाठविल्याची माहिती भाजपा सूत्रांनी दिली. परंतु अशा कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव शिवसेनेकडे आला नसल्याची स्पष्टोक्ती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्याने …
Read More »युती सरकारला मदत करण्यासाठी १५ बंडखोर संपर्कात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी निवडणूकीच्या निकालावर आता काही बोलणार नाही. त्याचे विश्लेषण नंतर करणार आहे. मात्र राज्यात पुन्हा युतीचे सरकार स्थापन करण्याइतके संख्याबळ भाजपा-शिवसेनेला मिळाले आहे. तरीही आमच्याविरोधात बंडखोरी करून विजय मिळविलेल्या १५ बंडखोर विजयी उमेदवारांकडून सरकार स्थापनेसाठी मदत करणार असून ते संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निकालानंतर संध्याकाळी भाजपा …
Read More »उध्दव ठाकरे म्हणतात, भाजपाबरोबर फॉर्म्युल्यानुसार पुढे जाणार आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या निकालाने राज्यातील सरकार स्थापनेसाठी शिवसेनेची मदत घेण्याशिवाय भाजपाला पर्याय राहीला नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीवेळी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार पुढे जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने ठाकरे घराण्याचा वारस असलेल्या आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात कोणीही सत्तेवर आले तरी …
Read More »भाजपा-सेनेचे मंत्री पराभूत मुंडे, भेगडे, शिवतारे, शिंदे, खोतकर,बोंडे, फुके यांचा पराभव
मुंबईः प्रतिनिधी अब की बार २२० पारचा नारा देत भाजपा-शिवसेनेने निवडणूकीची घोषणा होण्याआधीच प्रचारात आघाडी घेतली. तसेच मागील पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशोब देण्यासाठी महाजनादेश, जनआर्शीवाद यात्रा काढल्या. मात्र या यांत्रांचा परिणाम काही राज्यातील जनतेवर झालेला नसून यात भाजपा-शिवसेनेचे ५ विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे दिसून येत आहे. राज्य …
Read More »उदयनराजे भोसलेंचा ८३ हजाराने लोकसभा पोटनिवडणूकीत पराभव माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील ४ लाख ८३ हजार मतांनी विजयी
मुंबईः प्रतिनिधी सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करत पोटनिवडणूक लढविली. मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशाने नाराज झालेल्या सातारकरांनी उदयनराजेंना पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना विजयी केले. या पोटनिवडणूकीत श्रीनिवास पाटील यांना ४ लाख ८२ हजार ९४७ …
Read More »भाजपा-सेनेच्या सत्ता उन्मादाला जनतेने नाकारले विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
मुंबईः प्रतिनिधी या निवडणुकीत दिसलं की भाजप – सेनेच्या लोकांचा सत्तेचा उन्माद जनतेला पसंद पडला नाही.मुळात जमिनीवर पाय ठेवून चालले की, त्यांचे स्वागत होते. परंतु त्यांनी सीमा ओलांडली होती अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. विधानसभा निवडणूकांचे निकाल दुपारपर्यंत स्पष्ट झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत …
Read More »वंचितमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १२ जागा धोक्यात ९ हजाराहून अधिकचे मतदान घेतल्याने महाआघाडीच्या जागा घटल्या
मुंबईः प्रतिनिधी राज्यात लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणूकीतही वंचित बहुजन आघाडी आपली किमया दाखविणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून दुपारपर्यंत वंचितने आपली जादू दाखवित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ जागा धोक्यात आणल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवार अरविंद भातंबरे यांना १४ हजार ८६३ …
Read More »नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मा पिछाडीवर क्षितीज ठाकूर विजयाच्या उंबरठ्यावर
मुंबईः प्रतिनिधी चकमेकफेम माजी पोलिस अधिकारी प्रदिप शर्मा हे निवडणूकीच्या रिंगणात उतरून राजकारणात आपले नशीब अजमावत होते. परंतु त्यांना पोलिसीगिरीतील दंबगशाही काही राजकारणात सध्यातरी दाखविता आली नाही. त्यांना ३६ हजार ७८० मते मिळून पिछाडीवर आहेत. तर तेथील विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांना ५९ हजार ९१३ मतांनी आघाडीवर असून त्यांचा विजय …
Read More »वंचित आघाडीने रिसोडमध्य़े खाते उघडले अकोट, मुर्तिजापूरात आघाडीवर वंचित
मुंबईः प्रतिनिधी राज्यात लोकसभेनंतर विधानसभेसाठी रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीने रिसोडमध्ये आपले खाते उघडले आहे. वंचितचे उमेदवार दिलीप जाधव हे विजयी झाले असून शेजारील मुर्तिजापूर येथेही वंचितच्या उमेदवार प्रतिभा अवचार या ५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तसेच अकोटमध्ये संतोष रहाटे हे ही आघाडीवर आहेत. Share on: WhatsApp
Read More »पंकजा मुंडे, राम शिंदे, मेहता पराभवाच्या छायेत धनंजय मुंडे, राम शिंदे, गीता जैन यांचा विजय निश्चित
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतमोजणीची सुरु आहे. या मतमोजणीत परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे १२ हजारहून अधिक, तर कर्जत-जामखेडमधून रोहीत पवार हे १३ हजारहून अधिक आणि मीरा-भाईंदरमधून अपक्ष उमेदवार गीता जैन या १२ हजारहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपाचे पंकजा मुंडे, राम शिंदे, नरेंद्र मेहता …
Read More »
Marathi e-Batmya