राजकारण

भिवंडीचे आमदार रईस शेख यांचा आरोप, महायुती सरकारने केला आश्वासनाचा भंग अल्पसंख्याक समाजाच्या संस्थाना सरकार सापत्न वागणूक देतेय

राज्य उर्दू साहित्य अकादमी यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत असून सुवर्ण महोत्सवी वर्षात फक्त १ कोटी २० लाख इतक्या अत्यल्प निधीवर बोळवण करत महायुती सरकारने वचनभंग केला. राज्य सरकार अल्पसंख्याक समाजाच्या संस्थांना जाणिवपूर्वक भेदभावाची वागणूक देत आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी केला. तसेच उर्दू …

Read More »

लाडक्या बहिणीना आता ई-केवायसी बंधनकारक-२महिन्यात करणे आवश्यक केवायसी केली तरच महिन्याचा निधी मिळणार

राज्यातील लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना लाभ मिळविण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. जर त्यांनी दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी पूर्ण केले नाही तर त्यांना लाभ मिळू शकणार नसल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. गुरुवारी, महिला आणि बालविकास विभागाने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले. मंत्रिमंडळाच्या …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करा किंवा त्यात आवश्यक त्या सुधारणा करा मराठा समाजाला ज्या प्रमाणात निधी दिला जातोय त्याच प्रमाणात इतरानाही द्या

हैदराबाद गॅझेट जीआरविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळल्याच्या बातम्या येत आहेत.परंतु ती जनहित याचिका होती,कोर्टाने रिट याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. आपण अभ्यासपूर्वक रिट याचिका दाखल केलेल्या असून तिथे आपल्याला नक्की यश मिळणार आहे. त्यामुळे कुणीही गैरसमज पसरवू नवे असे आवाहन त्यांनी केले. हा काढलेला जीआर रद्द करा किवा आवश्यक त्या सुधारणा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘केंब्रिज’सोबत सामंजस्य करार जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा नवा टप्पा शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हरसिटी सोबत करार

महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया कडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट …

Read More »

भरत गोगावले म्हणाले, बांबू लागवडीमुळे पर्यावरण विकासासह ग्रामीण व हरित महाराष्ट्राला चालना जागतिक बांबू दिनानिमित्त येथे परिषद

पर्यावरणाचे संतुलन राखायचे असेल, पृथ्वीचा ऱ्हास टाळायचा असेल तर वृक्ष लागवडीबरोबर बांबू लागवड हाच मुख्य पर्याय आहे. बांबू लागवड ही शाश्वत पर्यावरण विकासासह शेतकऱ्यांसाठी नफा देणारी आणि ग्रामीण भागासाठी रोजगार निर्मिती करणारी ठरणार आहे. राज्य शासन हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी २१ लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्यास कटिबद्ध असल्याचे रोजगार हमी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांनी तात्काळ राजानीमा द्यावा

भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन सत्ता हस्तगत केली आहे. हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केले. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात ६८५० मत चोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून मतचोरी झाली नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करुन पहावे. फडणवीस यांच्याच पोलिसांनी …

Read More »

केशव उपाध्ये यांचा आरोप, राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह मतचोरीच्या खोट्या आरोपांबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी

उठसूठ मतचोरीचा डांगोरा पिटणारे राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह आहेत. गवगवा करून पत्रकार परिषदा घ्यायच्या, व्हिडिओ सादरीकरण करायचे, काँग्रेसच्या इको सिस्टिमने मतचोरीचा खोटा मुद्दा उचलून धरायचा आणि कोणताही पुरावा सादर न करता केवळ हवा निर्माण करायची हा सध्या काँग्रेसचा धंदा झाला आहे. मतचोरीचा खोटा आरोप करण्याबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी. …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, गणपतीसाठी तब्बल ६ लाख कोकणवासियांनी केला एसटीने प्रवास एसटीला मिळाले २३ कोटी ७७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले

गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातुन एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. तथापि, आप-आपल्या गावी, वाडया-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी दिलेली माहितीच शिष्यवृत्तीला ग्राह्य धरावी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी अर्ज स्वीकृती प्रक्रियेत सुलभता

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान उत्पन्नांचा दाखला, वैयक्तिक माहिती व कागदपत्रे सादर केलेली असतात. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने पडताळणी केलेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदा उत्पन्नाचा दाखला दिल्यानंतर पुन्हा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यत शिष्यवृत्तीसाठी तीच माहिती देण्याची आवश्यकता नसून हीच माहिती ग्राह्य …

Read More »

डॉ नरेंद्र जाधव यांची माहिती, त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेऊन शिफारस विद्यार्थी हिताच्या दृष्टीने उत्तमोत्तम शिफारस करणार

महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य आहे. इतर राज्ये महाराष्ट्राचे अनुकरण करतात. त्यामुळे त्रिभाषा धोरण लागू करण्याबाबत, राज्यातील एक लाख आठ हजार शाळांमधील दोन कोटी १२ लाख विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने, जनमनाचा कानोसा घेऊन उत्तमोत्तम अहवाल तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी गठित समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र जाधव यांनी सांगितले. …

Read More »