राजकारण

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, दीडपट हमीभाव देणे दूरच GST च्या माध्यमातून शेतक-यांची लूट कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का?, मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना समज द्यावी

केंद्रातील भाजपा सरकार शेतमालाच्या हमी भावात वाढ करून शेतकऱ्यावर उपकार केल्याचा अविर्भाव आणत आहे. परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. काँग्रेसप्रणित डॉ. मनमोहनसिंह सरकारने २००४ ते २०१४ या १० वर्षात हमीभावात १२० ते १५० टक्के वाढ दिली तर २०१४ ते २०२४ काळात मोदी सरकारने …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे आदेश, नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा ५१५० ईलेक्ट्रीक बसेस भाडे तत्वावर घेण्याबाबत करार

प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करीत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून ५१५० ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत …

Read More »

एकनाथ शिंदे यांची माहिती, वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ याहीवर्षी वैद्यकीय सुविधा पुरवणार, वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोल माफी

आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, कृषि विद्यापीठांनी उत्पादन वाढीसाठी एआय मॉडेल तयार करा संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या ५३ व्या बैठकीचे उद्घाटन

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. राज्यातील कृषि विद्यापिठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचे मॉडेल तयार करण्याबाबत संशोधन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वातावरणीय बदल, कीड व्यवस्थापन, तसेच पावसाचा खंड पडल्यानंतरही तग धरू शकणारे वाण शेतकरी बांधवांना उपलब्ध देण्याबाबतचे संशोधन अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, युती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? नगरविकास मंत्री शिंदे एकनाथ यांनीच मुंबई केली अनाथ, आपत्ती व्यवस्थापन विभाग, बीएमसी झोपले होते का ?

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे पण भाजपा युती सरकारच्या अव्यवस्थापनामुळे पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असतानाही आपत्ती व्यवस्थापन विभाग अथवा बीएमसीने कोणतीच पूर्व तयारी का केली नाही. भुयारी मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, वांद्रे, जुहू भागही जलमय झाला होता. भाजपा युती सरकारचा भ्रष्टाचार …

Read More »

बांग्लादेशी नागरिकांची भाजपाकडून शोधाशोधा, पण त्यांच्याच आमदाराचा मतदारसंघ दिसेना आवाज उठविणाऱ्या कारकून दर्जाच्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांलाच गुंतविण्याचा वरिष्ठांकडून प्रयत्न

काही दिवसांपूर्वी मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातील ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविली. मात्र त्या मतदारसंघात बांग्लादेशी मुस्लिमांची संख्या वाढल्याने निकम यांचा पराभव झाला अशी आवई भाजपा नेत्यांनी उठविली. त्यानंतर भाजपाच्या मुंबईतल्या माजी खासदाराने अशा बांग्लादेशी नागरिकांची आणि त्यांच्या जन्म दाखल्याची शोध मोहिम हाती घेत मुंबईसह मालेगांव …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजूरी धारावीचा पुर्नविकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करणार, स्थानिक कारागिरांच्या पुर्नवसनाला सर्वोच्च प्राधान्य

धारावी हे देशातील महत्वाचे आर्थिक केंद्र आणि वैशिष्टपूर्ण उद्योग समूहाचे विस्तीर्ण क्षेत्र आहे. त्यादृष्टीने धारावीच्या मूळ संकल्पनेचे जतन करत स्थानिक कारागिरांच्या, व्यावसायिकांच्या पूनर्वसनाला धारावी पुनर्विकास प्रकल्पात सर्वोच्च प्राधान्य देऊनच प्रकल्प राबवण्याचे निर्दैश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. सह्याद्री अतिथी गृह येथे धारावी पुनर्विकास प्रकल्प आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  …

Read More »

राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासू, शिवसेना उबाठाला काँग्रेसचे चोख प्रत्युत्तर सोम्या गोम्याच्या धमक्यांना राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष भीक घालत नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळ फासू, त्यांच्या ताफ्यवर दगडफेक करू अशी धमकी शिवसेना उबाठाचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी इशारा दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही. मविआ गेली खड्ड्यात, आमच्यासाठी आधी सावरकर आणि हिंदुत्व असे वादग्रस्त वक्तव्य करत राहुल गांधी यांना बाळा दराडे …

Read More »

संजय राऊत यांचा सवाल, मंत्र्याचा मुलगा सिद्धांत शिरसाटकडे ६७ कोटी आले कोठून? महागडी मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, अमित शाह यांनी लुटीला परवानगी दिली का

राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या कौटुंबिक वादळाला आता पूर्णविराम मिळाला. पण आता शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी दुसर्‍या एका प्रकरणाचा गौप्यस्फोट करत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या कमाईचे साधन काय असा सवाल करत, महागडी मालमत्ता खरेदीसाठी त्यांच्याकडे इतका पैसा आला कुठून, …

Read More »

बंधपत्रित सेवेतून आता डॉक्टर झाले मुक्तः धोरणास वैद्यकीय शिक्षण विभागाची स्थगिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

शासकीय, निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणाची अट शिथील करून या धोरणास स्थगिती देण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. शासकीय, महानगर पालिका यांच्या वैद्यकीय महविद्यालयातून एमबीबीएस अभ्याक्रम पूर्ण केल्यानंतर विहीत कालावधीची शासनाची बंधपत्रित सेवा पूर्ण …

Read More »