देवस्थान जमिनी या इनाम वर्ग ३ च्या जमिनी असून त्या अहस्तांतरणीय आहेत. या जमिनीच्या प्रश्नासंदर्भात सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी प्रधान सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर यासंदर्भात कायदा करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. देवस्थान इनाम जमीन संदर्भात सदस्य गोपीचंद पडळकर …
Read More »पंकजा मुंडे यांचे आश्वासन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योग घटकावर कारवाई करणार सना मलिक यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले आश्वासन
औद्योगिक प्रकल्पांनी पर्यावरणीय व सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. जे उद्योग घटक नियमांचे उल्लंघन करतील त्या उद्योग घटकांवर कारवाई केली जाईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सदस्य सना मलिक यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी सांगितले. मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की, आरएनसी प्लांटच्या संदर्भातही …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? परभणी प्रकरणी पोलीसांना कोंबिंग ऑपरेशन व लाठीहल्ल्याचे आदेश कोणी दिले? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाला वाचवत आहेत ?
परभणीतील आंबेडकरी विचारांचा सुशिक्षित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळे झाला असताना त्याची आकस्कित मृत्यू अशी नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. हा मृत्यू कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असा शवविच्छेदन अहवाल असतानाही सरकारने ते गांभिर्याने घेतले नाही. आता न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालातही सोमनाथ सुर्यंवंशी यांचा मृत्यू मारहणीमुळेच झाल्याचे उघड …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, गो हत्येचा वारंवार गुन्हा करणाऱ्यांवर मकको खाली कारवाई करणार राज्यमंत्री डॉ पंकज भोयार यांच्या उत्तराला सुधारीत उत्तर
कायद्यानुसार गो हत्या करणे गुन्हा आहे. मात्र गो हत्तेचा वारंवार गुन्हा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिला. श्रीगोंदा येथील कायदा सुव्यवस्थेच्या बाबत सदस्य संग्राम जगताप यांनी लक्षवेधी सूचना …
Read More »विधानसभेत नितेश राणे यांची आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी तर गृह राज्यमंत्री म्हणाले… दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे पडसाद
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचे पडसाद गुरुवार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. विधानसभेत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सालियन मृत्यू प्रकरणी आरोप असलेल्या माजी मंत्र्यांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी त्यांचा रोख शिवसेना …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या आश्वासनांची पूर्तता कधी ? दावोस मधून महाराष्ट्रात किती गुंतवणूक आली आणि नेमके किती रोजगार निर्माण झाले यावर श्वेतपत्रिका काढा
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या निधीपैकी ४० टक्के निधी सुद्धा वापरला गेला नाही. सरकारने मते मिळवण्यासाठी अनेक घोषणा केल्या. लाडक्या बहिणींना भाजपा युती सरकार २१०० रुपये देणार होते पण आज सरकारला १०० दिवस उलटून अद्यापही ते पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत. उलट भाजपा युती सरकार लाभार्थी बहिणींची संख्या कमी करत …
Read More »आदित्य ठाकरे यांच्या आरोपाप्रश्नी उद्धव ठाकरे यांची मोठी प्रतिक्रिया,… मला आश्चर्य औरंगजेबाबात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने मांडलेल्या भूमिकेबद्दल धन्यवाद
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावरून सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी आज एकच गदारोळ विधानसभा आणि विधान परिषदेत केला. तसेच या याचिकेत शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आल्याचे कारण पुढे करत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल …
Read More »विमानतळ वापरकर्ता विकास शुल्क (UDF) च्या नावाखाली प्रवाशांची लूट खासदार प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड यांचा लोकसभेत तारांकित प्रश्न
विमानतळ विकास शुल्क (UDF ) आणि इतर प्रवासी शुल्कांचा उपयोग सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी व्हायला हवा, खासगी नफ्यासाठी नाही. परंतु विमानतळावर विविध शुल्क आकारून प्रवाशांची लूट केली जात आहे, ही लूट थांबवावी व यात पारदर्शकता वाढवून प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा देण्यावर भर द्यावा, अशी मागणी खासदार, प्रा. वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत केली आहे. खासदार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ याचा आरोप, पालघर ते सिंधुदुर्ग पट्टा अदानी, अंबानीला आंदण देण्याचा भाजपाचा घाट राज्यातील विदारक परिस्थितीला फडणवीस सरकारच जबाबदार, महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या वाढल्या, वेगवेगळ्या गँग बनल्या
भारतीय जनता पक्षाचे सरकार लाडका उद्योगपती अदानीसाठी रेट कार्पेट टाकत आहे. मुंबईतील धारावी अदानीला विकली आहे, मुंबईतील महत्वाचे भखंड अदानीच्याच घशात घातले आहेत. नवी मुंबई विमानतळही अदानीलाच दिलेले आहे आणि आता पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचा मोठा सागरी पट्टा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अदानीच्या घशात टाकण्याचा घाट घातलेला आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »द्राक्ष शेतावरील प्लास्टिक आवरणावर अनुदान देण्यास शासन सकारात्मक मंत्री दादाजी भुसे यांची विधानसभेत माहिती
द्राक्ष फळ पीके संवेदनशील आहे. अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळ वारा यामुळे द्राक्ष फळ पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. द्राक्ष फळ पिकाच्या शेतीवर प्लास्टिक आवरण असल्यास होणारे नुकसान टाळता येऊ शकते. यासाठी शासन प्लास्टिक आवरणासाठी अनुदान देण्यास सकारात्मक आहे, असे मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. द्राक्ष उत्पादकांच्या …
Read More »
Marathi e-Batmya