राजकारण

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरून प्रकाश आंबेडकर यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सवाल महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० हून अधिक !

महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० पेक्षा जास्त आहे आणि काही मृत भाविकांची वाहने अजूनही अनेक दिवसांपासून पार्किंगमध्ये पडून आहेत, कदाचित योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रशासन ही वाहने लपवायला विसरले असतील असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे विचारला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर …

Read More »

भाजपाच्या विजयासाठी महाकुंभमधील मोदी-शाह-रामदेव यांची डुबकी कामाला आली अमेरिकेने भारतीय नागरिकांना दिलेल्या अपमानजनक वागणूकीचा मात्र दिल्लीतील मतदारांवर कोणताच परिणाम नाही

मागील महिनाभर दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा माहोल दिल्लीसह संपूर्ण देशभरात भाजपाने उभारण्यात यशस्वीरित्या निर्माण करण्यात नेहमीप्रमाणे यश मिळवले. या माहौलमध्ये भाजपाची आघाडी आणि निवडणूकीच्या दृष्टीकोनातून दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना लीकर पॉलीसी प्रकरणी तुरुंगात टाकण्यापासून ते त्यांच्या शासकिय निवासस्थानी आणि बँक खात्यांची झाडा झडती …

Read More »

पंकजा मुंडे यांचे बीड प्रशासनाला आदेश, राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करा जप्त केलेली वाळू शासकीय घरकुलासाठी उपलब्ध करून द्या

प्रदूषणाच्या नियमाचा भंग होत असल्याने औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बीडच्या जिल्हा प्रशासनाला दिले. जप्त केलेली वाळू शासकीय घरकुलाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही देत प्रदुषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष करत असलेल्या अधिकाऱ्यांची …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मोठ्या गुंतवणुकीमुळे विदर्भ उद्योगाच्या केंद्रस्थानी येणार अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ २०२५- खासदार औद्योगिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन

गडचिरोलीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण होत असून गुंतवणूक आकर्षित होत आहे. यामुळे नवनवे उद्योग येथे आकाराला येत आहेत व रोजगार निर्मितीही होत आहे. पर्यटन, उद्योग व दळण-वळण अशा अनेक क्षेत्रात विदर्भ पुढे जात असून मोठ्या गुंतवणुकीमुळे तसेच ‘ॲडव्हांन्टेज विदर्भ’ या महोत्सवाच्या आयोजनामुळे येत्या काळात विदर्भ उद्योगक्षेत्राच्या केंद्रस्थानी येणार …

Read More »

सामाजिक न्याय विभागाच्या रिक्त पदाच्यासाठीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर ४ मार्चे ते १९ मार्च या कालावधीत ऑनलाईन परिक्षा होणार

सामाजिक न्याय विभागांतर्गत समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. या भरती प्रक्रियेचे ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. कॉम्प्युटरबेस ऑनलाईन परीक्षा ४ मार्च २०२५ ते १९ मार्च २०२५ रोजी विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उदघाटन आदर्श राज्याचा वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला

जलव्यवस्थापन, पर्यावरण रक्षण, कायदा व सुव्यवस्था, महिलांचे संरक्षण, सर्व जातीधर्माचा सन्मान असा आदर्श वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभाराच्या माध्यमातून दिला आहे. हा समृद्ध वारसा जपण्यासह तो नव्या पिढीपर्यंत प्रवाहित होण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर कविवर्य सुरेश भट सभागृह …

Read More »

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना गुंडाळण्याची शक्यताः महिलांकडून पैसे परत राज्य सरकारकडून अपात्र महिलांची शोध घेण्याचे काम सुरु

लोकसभा निवडणूकीत महायुतीचा लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर लगेच पाच महिन्यानंतर राज्यात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला मतदारांना आणि ज्येष्ठ नागरिकांना चुचकारण्यासाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. त्यावेळी या योजनेत एका महिलेला दोन योजनांचा लाभ घेता येणार नाही आणि या योजनेत जर अपात्र ठरल्याच लाडकी बहिण योजनेतंर्गत मिळालेली लाभाची रक्कम …

Read More »

सुप्रिया सुळे यांची मागणी, बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळे यांनी केली मागणी

मतदार, चिन्ह आणि पक्ष फोडण्याचा हा विषय आहे. आमच्यावर सतत वार होत आहे. लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी फेअर निवडणुका व्हाव्यात. आम्ही मतदार यादी मागत आहोत त्या द्या. महाराष्ट्रामध्ये अचानक मतदारांची संख्या अचानक वाढली कशी असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. दिल्लीत लोकसभेचे विरोधी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, महायुती सरकारचा कृषी विभाग भ्रष्टाचाराचे कुरण… बॅटरी स्प्रेअरचा दर २४५० रुपये असताना ३४२५.६० रुपयाने खरेदी, मर्जीतील अपात्र कंपन्यांना पुरवठ्याचे कंत्राट बहाल

महायुती सरकारमध्ये कृषी विभाग भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचे प्रकार उघड होत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या योजनांमधून पैसा खाऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा उद्योग महायुती सरकारने केला आहे. कापूस साठवणूक बॅग पुरवठ्याच्या घोटाळ्यासारखाच शेतकऱ्यांना बॅटरी स्प्रेअर पुरवण्यातही भ्रष्टाचार करण्यात आला आहे. महायुती सरकारच्या आशिर्वादाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील अधिकारी व कृषी विभागाने …

Read More »

अजित पवार यांचा छगन भुजबळ यांना फोन मंत्री पदासाठी फोन केल्याची चर्चा

राज्यातील भाजपा आणि महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना फोन केल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. दरम्यान अजित पवार यांनीच फोन केल्याने भुजबळांची नाराजी कमी झाल्याची माहिती राष्ट्रवादीतील …

Read More »