माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावरील अंत्यविधी आणि त्यांचे स्मारक उभारण्यासाठी दिल्लीतील यमुना नदीच्या काठावर, जिथे अनेक माजी पंतप्रधानांचे स्मारक आहेत, तेथे वेगळी जमिन मिळावी यासाठी काँग्रेसने केंद्र सरकारला पत्र लिहीत मागणी केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवल्याचे सूत्रांनी सांगितले. …
Read More »सुरेश धस यांचा सवाल, “आका” कडे एवढे पैसे कुठून आले? वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केली टीका
बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने निशाणा साधला आहे. शुक्रवारी त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले. यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की, ‘आका’कडे १०० ते …
Read More »सैनिक कल्याण विभागाकडून कंत्राटी तत्वावर या पदासाठी मागविले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडून आवाहन
सैनिकी मुलींचे वसतिगृह कलिना, सांताक्रुज पूर्व, मुंबई येथे अतिरिक्त सहाय्यक अधिधिका पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी १५ जानेवारी, २०२५ रोजीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रां.प्र.जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या पदासाठी अर्जदार ही युध्द विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या …
Read More »माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावावर शासकिय इतमामात उद्या अंत्यसंस्कार डॉ मनमोहन सिंह यांचे पार्थिव काँग्रेस कार्यालयात ठेवण्यात येणार
माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. मागील काही महिन्यांपासून डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृत्ती वयोमानानुसार अस्वस्थ होत होती. काल त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने एम्समधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री ९ वाजून ३० च्या सुमारास डॉ मनमोहन सिंह यांचे निधन …
Read More »माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग एम्समध्ये दाखल प्रकृत्ती बिघडल्याने एम्समध्ये अॅडमिट केले
माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गुरुवारी दिल्लीतील एम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे. डॉ मनमोहन सिंग हे ९२ वर्षाचे असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आज त्यांची प्रकृत्ती बिघडल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली. तथापि, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागील कारण अद्याप कळलेले नाही. …
Read More »नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, प्रशिक्षण आणि वाचन संकल्पावर विशेष लक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पदभारानंतर माहिती
देशाच्या विकासात उच्च शिक्षणाचे सर्वाधिक महत्त्व आहे. यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व देऊन विद्यार्थी हिताला प्राधान्य देत राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी,वाचन चळवळ वाढविणे आणि प्राध्यापकांचे प्रशिक्षण यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. उच्च व …
Read More »धनंजय मुंडे यांची मागणी, स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी… या घटनेच्या आडून मला सामाजिक व राजकीय आयुष्यातून उठवायचा डाव
मागील जवळपास १५ दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिकी कराड याच्यावर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत हात असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच याप्रकरणी धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्या कथित संबधावर दररोज नव नवी माहिती उघडकीस येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडचे …
Read More »भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा विस्तार तालुकास्तरावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केला असेल परंतु वसतिगृह प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची व्यवस्था व्हावी याकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत निर्वाह भत्ता देण्यात येतो तालुकास्तरावरील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून स्वाधार योजनेचा विस्तार (व्याप्ती)तालुकास्तरावर करण्यात येत असल्याची …
Read More »महाराष्ट्राच्या करीना थापा आणि केया हटकर ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
महाराष्ट्राच्या दोन धाडसी आणि प्रेरणादायी मुलींच्या शौर्य आणि प्रतिभेचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला. अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी तर मुंबईच्या केया हटकरला तिच्या साहित्य व सामाजिक कार्यासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण …
Read More »१०० दिवसांच्या आराखड्याबाबत अधिकारीच गोंधळात तर मुख्यमंत्री म्हणतात ठोस कामगिरी करा लोककेंद्रित योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा
साधारणतः मुंबईतील राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या राज्य सरकारचे विशेष अधिवेशन पार पडले या अधिवेशनात सरकार स्थापनेनंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र त्यानंतर लगेच आठच दिवसात नागपूरात हिवाळी अधिवेशन पार पडले. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयाच्या प्रशासनात महत्वाची कामगिरी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि १०० दिवसाचा कार्यक्रम जाहिर तयार …
Read More »
Marathi e-Batmya