राजकारण

मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा, …एक ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचा मार्ग बळकट होणार महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे अनावरण

राज्याची प्रगती तेथील ‘ईज ऑफ लिव्हींग’ वर अवलंबून असते. त्यामुळे शासनही राज्यातील ‘ईज ऑफ लिव्हींग’ सुधारण्यासाठी प्राधान्याने काम करीत आहे. नागरिकांना विविध सेवा विनाविलंब मिळतात की नाही, यावरून राज्यातील सुशासन लक्षात येत असते. सुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलीयन अर्थव्यवस्था करण्याचा मार्गही बळकट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडून परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न भाजपा सरकार वस्तुस्थितीच मान्य करण्यास तयार नाही, चौकशीतून उत्तर काय मिळणार हे स्पष्ट आहे.

परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना भाजपा युती सरकार मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहे. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाही, त्यामुळे चौकशीतून उत्तर काय मिळणार हे माहित आहे, असे सांगून बीड व परभणी हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न होत …

Read More »

धनंजय मुंडे यांचा हाती पिस्तुल… अंजली दमानिया म्हणाल्या, यातून काय आदर्श घेणार अंजली दमानियांकडून धनंजय मुंडे यांची नवी माहिती बाहेर

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिकी कराड यांचे नाव पुढे येत आहे. त्यातच धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्यातील संबधही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उघडकीस आणले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी हाती पिस्तुल …

Read More »

मनोज जरांगे पाटील याचे, आता ते आरक्षण देणार की…. मुख्यमंत्री फडवणीस यांची स्पष्टोक्ती मराठा आरक्षणानंतर धनगर आणि मुस्लिम आरक्षण व शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार

मागील एक वर्षापासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या मराठा समाजाचे नेते तथा समर्थक मनोज जरांगे पाटील यांच्या सततच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अर्थात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जाहिर केला. मात्र प्रत्यक्षात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत महायुती? चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत स्थानिक नेतृत्वच घेणार निर्णय

लोकसभा निवडणूकीत सपाटून मार खाल्यानंतर महायुतीने विधानसभा निवडणूकांची तयारी जोरात सुरु केली. तसेच महिला मतदारांना आकर्षित करणाऱ्या विविध योजनाही यावेळी जाहिर केल्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांना देणाऱ्या मासिक हप्त्यातही वाढ करत शेतकऱ्यांची फार काळजी करत असल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विधानसभा निवडणूकीत भाजपा आणि महायुतीच्या विरोधात वातावरण असतानाही भाजपा महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या …

Read More »

बाळासाहेब थोरात यांनी घेतली स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट संतोष देशमुखच्या मारेक-यांना व सुत्रधारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या हत्याकांडातील आरोपी आणि सुत्रधारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात केली. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, राज्याचे …

Read More »

आरएसएसशी बिघडलेले संबध सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून ख्रिसमस गोवा, केरळ आणि ईशान्य भारतातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकिय पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील मुख्यालयात ख्रिसमस सेलिब्रेशनच्या कार्यक्रमात ख्रिश्चन समुदायाच्या कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) ला केलेले संबोधन लक्षणीय आहे. जर्मनीतील अलीकडील ख्रिसमस मार्केट हल्ल्याचा आणि श्रीलंकेतील २०१९ च्या इस्टर बॉम्बस्फोटांचा निषेध करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमाचा वापर केला आणि “सबका साथ, सबका विकास” ही त्यांची घोषणा ख्रिश्चन …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केन बेतवा राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी वाघांच्या जंगलातून जात धरणाचे काम, काँग्रेसची टीका

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (२५ डिसेंबर) केन-बेतवा रिव्हर लिंकिंग राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे पन्ना व्याघ्र प्रकल्पाला धोका असल्याचे सांगत काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका केली. केबीएलबी KBLP ने केन नदीचे पाणी यमुनेच्या दोन्ही उपनद्या बेतवा नदीत सोडण्यात येणार असल्याची कल्पना केली …

Read More »

राज्यातील या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनिल डिग्गीकर बेस्टचे महाव्यवस्थापक तर डॉ हर्षदीप कांबळे यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी

राज्यातील १२ आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. यात काही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्यासह मंत्रालयातील विभागाच्या प्रधान सचिव पदाची धुरा वाहत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात अनिल डिग्गीकर यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचे अतिरिक्त …

Read More »

नो बॅनर साठी आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध

२०२५ मध्ये पदार्पण करताना तसेच, लोकसेवेचा संकल्प करताना, पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून; नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेऊ अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आदित्य ठाकरे पुढे लिहिलेल्या …

Read More »