लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्येही शिवसेनेचा स्ट्राइक रेट भक्कम राहिला असून, आम्ही जनतेसमोर विकासाचा अजेंडा घेऊन गेलो, स्थानिक प्रश्नांवर भर दिला आणि कोणावरही टीका केली नाही, त्यामुळेच जनतेने आम्हाला भरभरून यश दिले, असे ठाम मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना …
Read More »रविंद्र चव्हाण म्हणाले, विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला दणदणीत यश देऊन मतदारांनी विकास, सेवा, सुशासनला कौल दिला आहे. १२५ पेक्षा अधिक जागांवर भाजपाचा विजय आणि ११०० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून दिले आहेत. भाजपावर मोठा विश्वास दाखविल्याबद्दल जनतेचे आभार मानतो असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी रविवारी केले. भाजपा …
Read More »रामदास आठवले यांची माहिती, रिपब्लिकन पक्षाला नगरपालिका निवडणुकीत राज्यभरात घवघवीत यश वर्धा ; सोलापूर; सातारा; रायगड; यवतमाळ; कोल्हापूर आदी जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विजयी
राज्यात नगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला राज्यभरात घवघवीत यश प्राप्त झाले आहे. कोल्हापुरातील हुपरी नगराध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे मंगलाराव माळगे हे बहुमताने विजयी झाले आहेत. हुपरी मध्ये शीतल कांबळे; पन्हाळा नगर परिषद मध्ये प्रतीक्षा योगेश वराळे; आजरा नगर परिषद मध्ये कलावती कांबळे हे रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. सातारा जिल्ह्यात प्रतीक …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, राष्ट्रवादीच्या विकासात्मक भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट...
आज जाहीर झालेल्या नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुक निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे राष्ट्रवादीच्या विकासात्मक, सर्वधर्मसमभावाच्या भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब झाल्याचे या निकालांवरून स्पष्ट झाले आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जनतेने केवळ आश्वासनांना नाही, तर प्रत्यक्ष …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार, बोगस मतदान, पैसा व सत्तेचा निवडणुकीत प्रचंड गैरवापर
नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधिरेखीत झाला आहे. मतदान प्रक्रियेचा पुरता गोंधळ घातला गेला, तारिख पे तारिख चा खेळ केला. ही निवडणूक फ्रि अँड फेअर अशी झाली नाही. सत्ताधारी पक्षाकडून साम, दाम, दंड, भेद या नितीचा मुक्तपणे वापर करण्यात आला. निवडणुकीत बोगस मतदार, दडपशाही, सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, राज्यात भ्रष्टाचार बोकाळला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी टिळक भवन येथे आढावा बैठक संपन्न
राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. काँग्रेस पक्षाने निवणुकीसाठी सर्व तयारी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरु असून जेथे गरज असेल तेथे आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे …
Read More »रमेश चेन्नीथला यांची घोषणा, मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार समविचारी पक्षांना सोबत घेऊ, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांना मुंबईकर धडा शिकतील – खासदार वर्षा गायकवाड
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्या अशी कार्यकर्त्यांची भावना आहे म्हणून मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले. मुंबई काँग्रेसच्या पॉलिटीकल अफेअर्स कमिटीची बैठक आज पार पडली. …
Read More »इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन १ ली ते १० वी पर्यंतच्या शाळांना विभागाचे आवाहन
राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांनी महाडीबीटी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, दि. बा. पाटील यांच्या नावाशिवाय दुसरे नाव खपवून घेणार नाही सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या!
नवी मुंबई विमानतळाला भूमीपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची लोकांची तीव्र भावना आहे, या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे. भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ करत आहेत, परंतु कोणत्याही परिस्थितीत दुसरे नाव खपवून घेतले जाणार नाही, वेळ प्रसंगी रस्त्यावर …
Read More »घाईघाईत विधेयक मंजूर करणे चुकीचे आणि संशयास्पद : काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा
प्रियांका गांधी यांनी मनरेगा नाव बदलण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की इतक्या घाईघाईत विधेयक मंजूर करणे चुकीचे आहे आणि त्यात काहीतरी गोंधळ आहे असे दिसते. संसदेत प्रदूषणाच्या मुद्द्यावर चर्चा न झाल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रियांका गांधी आणि इतर विरोधी नेत्यांचे म्हणणे आहे की …
Read More »
Marathi e-Batmya