राजकारण

जितेंद्र आव्हाड यांची अजित पवार यांच्यावर टीका, स्वतःचा वेगळा पक्ष काढून… खोचक टीकेवरून अजित पवार समर्थकांचा आव्हाडांना प्रत्युत्तर

विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तसेच या दोन्ही बाजूच्या आमदारांकडून प्रचाराच्या निमित्तानेही प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका-टीपण्णी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंब्रा-खळव्याचे आमदार तथा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी काल एका प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले …

Read More »

नाना पटोले यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घाला कापूस आयातीचा निर्णय व्यापाऱ्यांच्या फायद्याचा, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हित पहावे

कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत. शेतकऱ्यांचे …

Read More »

राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरात ‘संविधान संमेलन’ विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची माहिती

भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरुच आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी लढा उभारणे काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थानी नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात संविधान संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानसभा …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची माहिती, उमेदवार आणि मतदारसंघ जाहिर करणार मराठा समाजाच्या उमेदवार आणि मतदारसंघ उद्या जाहिर

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाला धडा शिकविण्याचा चंग बांधलेल्या मराठा आरक्षण समर्थक आणि आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज्याच्या विविध भागात मराठा समाजाचे उमेदवार उभे कऱण्याचे आदेश दिले. त्यानंतर निवडणूकीचे गणित म्हणून दलित मुस्लिम मराठा समाजाच्या धर्मगुरुंची आणि प्रभावशाली व्यक्तींची बैठकही घेतली. त्यानंतर उमेदवारी माघारी घेण्याच्या दिवशी …

Read More »

बंडखोरीबाबत बोलताना गोपाळ शेट्टी म्हणाले, पक्षहितासाठी जे करावं लागेल ते करेन देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर गोपाळ शेट्टी यांची स्पष्टोक्ती

लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न देता त्या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. तसेच त्यावेळी गोपाळ शेट्टी यांना त्यांचे राजकीय पुर्नवसन करण्यात येणार असल्याचे आश्वासनही भाजपाने दिले. त्यानंतर राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी आणि राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवरील नामनिर्देशित जागा आणि निवडणूकाही झाल्या. मात्र गोपाळ शेट्टी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन,ओबीसींसाठी ही निवडणूक महत्वाची तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येईल

मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी दोन्ही झालेले आहे. डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले आहे. निवडणुकीला सुद्धा सुरुवात झाली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित …

Read More »

शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, बाकी सर्वजण आले अजित पवार आले नाहीत कदाचित…. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पोलिस वाहनातून रसद-शरद पवारांचा गंभीर आरोप

बारामती तालुक्यावर एकमेव प्रभाव असलेले आणि मागील अनेव वर्षापासून प्रत्येक दिवाळी पाडव्याचा पवार कुटुंबियांचा एकमेव कार्यक्रम होत होता. मात्र यंदाच्या वर्षी अजित पवार यांनी स्वतंत्र दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम घेतल्याने बारामतीत दोन वेगवेगळे दिवाळी पाडव्याचे कार्यक्रम झाल्याचे दिसून आले. दरम्यान शरद पवार यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाबाबत सूचक …

Read More »

बारामतीत दोन दिवाळी पाडवा कार्यक्रमावर अजित पवार यांचे स्पष्टीकरण,… म्हणून ही विभागणी लोकांना ताटकळत बसायला लागू नये म्हणून दोन कार्यक्रम

राज्यातील शिवसेनेचा दसरा मेळावा, मनसेचा गुढी पाडवा मेळावा तर पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा आदी गोष्टी दरवर्षी सातत्याने आयोजित करण्यात येतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याकडून मागील अनेक वर्षापासून दिवाळी पाडव्याच्या दिवशी संपूर्ण पवार कुटुंबिय बारामतीकरांसह राज्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या या कार्यक्रमाचे …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा आरोप, जनतेचे दिवाळे काढून शिंदे भाजपाची दिवाळी माजी मंत्री अनिस अहमद यांचा वंचितमधून काँग्रेस पक्षात प्रवेश

भाजपा शिंदे अजित पवारांच्या शेतकरी विरोधी आणि केंद्राच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. एकीकडे महागाई प्रचंड वाढली असून सोयाबीन, कापूस आणि कांदा या शेतीमालाला रास्त भावही मिळत नाही. शेतकरी, कष्टकरी, गृहिणी यांचे दिवाळं काढून शिंदे भाजपाची दिवाळी सुरु आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, पिछेहाटीला भाजपाच जबाबदार तर अजित पवार म्हणाले, अहवाल बघतो विकासाचे घोंगडं पांघरून बसलेल्यांनी हे लक्षात घ्यावं की कोंबडं कितीही झाकलं तरी आरवायचं राहत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीने दिलेल्या अहवालात महाराष्ट्र मागील १० ते १२ वर्षात आर्थिक परिस्थितीत घसरण झाल्याचा आणि जीडीपी दरात २ टक्के कपात झाल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक घसरणीला भाजपाचा जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यावर अजित पवार …

Read More »