राजकारण

पेन्शन योजनेवरून मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, यु म्हणजे मोदींचा युटर्न नव्या युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजनेवरून सोडले टीकास्त्र

केंद्र सरकारने काल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजना जाहिर केली. या योजनेवरून काँग्रेसने टीकेची झोड उठविली. युपीएस मधील यु म्हणजे मोदी सरकारचा यु टर्न असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केली. केंद्र सरकाच्या काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध विभागात काम करणाऱ्या सरकारी …

Read More »

संजय राऊत यांची टीका, मोडतो़ड तांब्या-पितळ सारखी आमची आघाडी नाही महाविकास आघाडीत जागा वाटपांवर ९९ टक्के सहमती

महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली असून या जागा वाटपाबाबत ९९ टक्के सहमती झाली आहे.  मुंबईतील जागांबाबतही प्राथमिक स्तरावर कालच्या बैठकीत चर्चा झाली असून तसेच पुढेचा मुख्यमंत्री कोण असावा यावरूनही आमच्यात वाद नाही की जागा वाटपांबाबतही वाद नसल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. बदलापूर येथील दोन चिमुरडींवर झालेल्या …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची माहिती, … महिलांना आता ई-तक्रारही दाखल करता येणार लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला फाशीची आणि जन्मठेपेची शिक्षा

मागील काही दिवसांपासून माझ्याकडे पत्र येत होती, महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी दाखल करून घेण्यात येत नाहीत, जर तक्रार लिहून घेतली तर न्यायालयात त्यावर जलद सुनावणी होत नाही. मात्र आता महिलांवरील अत्याचारा प्रकरणातील आरोपीच्या विरोधात पोलिस स्थानकात न जाता घरूनच पोलिस तक्रार दाखल करता येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाने विज्ञान धारा योजनेला दिली मंजूरी १० हजार ५७९ कोटी रूपयांचा निधीही मंजूर

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘विज्ञान धारा’ योजना सुरू करून विज्ञान आणि तंत्रज्ञान निधीमध्ये मोठ्या फेरबदलाला मंजुरी दिली. हा नवीन उपक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षमता, संशोधन आणि नवकल्पना वाढविण्याच्या उद्देशाने तीन विद्यमान छत्री योजनांचे एका एकीकृत केंद्रीय क्षेत्रातील कार्यक्रमातंर्गत विलीनीकरण करण्यात येणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या योजनांचे एकाच योजनेत विलीनीकरण …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, मिस इंडियात एकही दलित आदिवासी ओबीसी महिला नाही जणगणना करण्याची गरज

मिस इंडिया ब्युटीसाठी निवड झालेल्यांची यादी मी पहात होतो, पण त्या स्पर्धेत एकही दलित, आदिवासी किंवा ओबीसी समाजातील एकही महिलेची निवड करण्यात आली नव्हती असा हल्लाबोल काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी करत केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, मिस इंडियाची यादी तपासली की …

Read More »

सुनिल तटकरे यांचा टोला,… ठाकरेंना दिलेली सुरक्षा पाळत ठेवण्यासाठी होती का? महिलांवर होणारे अत्याचार हे अत्यंत निंदनीय आणि दुर्देवी

महिलांवर होणारे अत्याचार हे अत्यंत निंदनीय आणि दुर्देवी आहेत. अत्याचार करणार्‍या नराधम विकृत प्रवृत्ती ठेचून काढल्या गेल्या पाहिजेत हे पक्षाचे आणि वैयक्तिक मत आहे आणि सरकारमधील सर्व नेत्यांचेही तेच मत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना आपला संताप व्यक्त केला. पुढे बोलताना सुनिल तटकरे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विकसित भारतासाठी एमएमआर प्रदेश पॉवर हाऊस नागरी विकास, पायाभूत सुविधांमुळे गुंतवणूक येणार

भारताच्या ‘फाईव्ह ट्रिलीयन डॉलर्स’ अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकारण्यात मुंबई महानगर प्रदेशाचा सिंहाचा वाटा राहणार आहे. या प्रदेशातील महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले. मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले, एमएमआर प्रदेश २०४७ मधील विकसित भारतातील अर्थव्यवस्थेसाठी ‘पॉवर हाऊस’ ठरणार असून, यातील दळणवळण, शाश्र्वत …

Read More »

आशिष शेलार यांचा सवाल, नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्याशी काँग्रेस, उबाठा सहमत आहे का? काश्मीरसाठी स्वतंत्र झेंडा, ३७० वे कलम पुन्हा लागू करू

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरसाठी वेगळा झेंडा निर्माण करू, ३७०, ३५ (अ) कलम पुन्हा लागू करू आदी आश्वासने दिली आहेत. या आश्वासनांशी काँग्रेस, उबाठा सहमत आहेत का असा सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशीष शेलार यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल, सरकार अडचणीत…वकील कोर्टात, हा काय नेक्सस आहे? महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था अधोगतीकडे

राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारच्या घटना तसेच बदलापूरमधील शाळेत चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज राज्यभरात महाविकास आघाडी आणि इतर पक्षांतर्फे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्य़ातील वाळवा तहसील कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर बसून तोंडाला काळी …

Read More »

महाविकास आघाडीच्या आंदोलना विरोधात भाजपाचे ‘जागर जाणीवेचा’ प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात अमरावती आणि मुंबईत भाजपाचे आंदोलन

बदलापूर घटनेतील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच महिला अत्याचार प्रकरणात महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुटप्पी भूमिका उघड करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ,आ. प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड आदी …

Read More »