राजकारण

जगन रेड्डी यांचा पलटवार, एन चंद्रबाबू नायडू खोटारडे… तिरूमला तिरुपती लाडू प्रकरणातील आरोप खोटे

मागील काही दिवसांपासून आंध्र प्रदेशातील तिरूमला तिरूपती देवस्थानातील लाडू बनविण्याच्या कामात भेसळ केली जात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी करत याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन रेड्डी यांच्यावर आरोप केला. या आरोपानंतर एकच खळबळ निर्माण झाली. त्यानंतर आज वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, महायुतीकडून जातीय फूट पाडण्याचा प्रयत्न ओबीसी - मराठा दंगल घडवून आणण्यात शरद पवार अपयशी

ओबीसी आणि मराठा यांच्यात यशस्वीपणे दंगल घडवून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अपयशी ठरले असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी करत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने जातीय फूट पाडून मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा निर्धार केला असल्याचा आरोपही एक्सवर ट्विट करत यावेळी केला. ॲड. प्रकाश …

Read More »

राज ठाकरे यांचा इशारा,… औदार्य महागात पडेल हे विसरू नये ? लिजेंड ऑफ मौला जट सिनेमाला मनसेचा विरोध

काही वर्षापूर्वी भारतातील टीव्ही निर्मात्यांकडून पाकिस्तानी कलाकारांना घेऊन केलेल्या कार्यक्रमाला विरोध करत पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यकाक्रमाला मनसेकडून जाहिर विरोध करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानी कलावंताना भारतीय सिनेमात संधी देत त्यांना भारतीय चित्रपटात स्थान दिल्याप्रकरणीही राज ठाकरे यांच्या मनसेने अनेक चित्रपट निर्मात्यांच्या चित्रपटाच्या विरोधात आंदोलन केले. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पाकिस्तानी अभिनेत्याचा …

Read More »

दिल्लीला जाण्यासाठी भिमनवार यांनी बैठक सोडली: २४ पासून आरटीओ कर्मचारी संपावर मागण्यांसाठी संघटना आक्रमक

राज्य सरकारने आरटीओतील रिक्त पदे आकृती बंध नुसार भरण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यासाठी शासन निर्णयही जारी केला. मात्र त्याच दोन वर्षे उलटून गेले तरी आकृती बंध नुसार रिक्त पदांची भरती तर सोडाच त्याची साधी जाहिरातही काढली नाही की, त्याबाबतची माहिती एमपीएसी अर्थात राज्य सेवा आयोगालाही कळविली नाही. त्यामुळे संतापलेल्या आरटी …

Read More »

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी तरूण अतिशी विराजमान तिसरी महिला मुख्यमंत्री म्हणून घेतला शपथविधी

तुरुंगातून जामीन मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आम आदमी पार्टीच्या मंत्री आणि केजरीवाल यांच्या सहकारी आतिशी यांची मुख्यमंत्री पदासाठी नाव सुचविले. त्यानुसार आतिशी यांचा आज मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सर्वात तरूण वयात आतिषी यांच्यावर आम आदमी पार्टीने सोपविली …

Read More »

केंद्रीय मंत्री सी आर पाटील म्हणाले, देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यामध्ये 'नाम' फाउंडेशनचा मोठा वाटा

प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र शासन ‘हर घर जल’ राबवित आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील २० नद्या एकमेकांशी …

Read More »

नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती , रस्ते राज्य सरकारकडे आणि शिव्या मी खातो… नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याकरीता प्रयत्न करणार-

साधारणतः १०-१२ वर्षापूर्वी केंद्राच्या अखत्यारीत असलेले पुणे-मुंबईचे रस्ते राज्य सरकारने मागून घेतले. मात्र या रस्त्याची व्यवस्था राज्य सरकारकडून नीट राखली जात नसल्याने त्या बदल्यात मला शिव्या खावाव्य लागतात अशी स्पष्टोक्ती केंद्रीय रस्त महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देत राज्य सरकारला नोटीस काढायला सांगितल्याचे सांगितले. पुढे बोलताना नितीन गडकरी …

Read More »

मराठा-ओबीसी कार्यकर्त्ये एकमेकांच्या आमने-सामनेः पुढील अनर्थ टळला वढगुद्री आणि अंतरावली सराटीतील कार्यकर्त्ये आले समोरासमोर

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरावली सराटी येथे आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा एकदा उपोषणाचे आंदोलन सुरु झाले. मात्र अंतरावली सराटी येथे जाण्यासाठी वढगुद्री येथूनच पुढे जावे लागते. नेमक्या वढगुद्री येथे ओबीसी समाजाचे गणेश हाके आणि प्रा. लक्ष्मण वाघमारे यांचेही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको या मागणीवरून आंदोलन सुरु …

Read More »

काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट विदर्भ आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान;शेतकऱ्यांना भरीव मदत करावी

राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय व सामाजिक अस्थैर्य निर्माण झाले आहे. विदर्भ आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु मदत मिळाली नाही. यामुळे जनतेमध्ये, शेतकरी वर्गात प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे. ही सर्व परिस्थिती राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या निदर्शनास आणण्यासाठी आज काँग्रेसच्या …

Read More »

वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जाहिर जाहीरनामाही लवकरच प्रसिद्ध , युतीचे अधिकृत नावही जाहिर करणार

विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु होण्याला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना राज्यातील प्रमुख राजकिय पक्षांकडून आघाडी, जागा वाटप आदी प्रश्नांमध्ये व्यस्त आहेत. तसेच एकाही राजकिय पक्षाने किंवा महायुती-आघाडीने अधिकृत जागावाटपाची चर्चा जाहिर केलेली नसताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मात्र विधानसभा निवडणूकीचे उमेदवार जाहिर करण्यात आघाडी घेतली …

Read More »