राजकारण

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, जागवाटपाची चर्चा अद्याप नाही, पण मुख्यमंत्री पदाचा… काहीही झालं तरी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूकांना सामोरे जाणार

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा लढविण्यावरून रस्सीखेच सुरु असतानाच मुख्यमंत्री पदावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहिर करण्यावरून शिवसेना उबाठा गटाकडून आग्रह असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत सावध भूमिका मांडली …

Read More »

राहुल गांधी यांचा विश्वास, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देणार जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेसच्या प्रचारसभेत बोलताना दिला विश्वास

स्वतंत्र भारताच्या इतिहासात एखाद्या राज्याचा असलेला राज्याचा दर्जा काढून घेऊन त्याला केंद्रीय प्रदेश बनविण्याचा प्रयत्न सुरु असून हा प्रयत्न हाणून पाडू आणि जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देऊ असा विश्वास काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज व्यक्त केला. जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा आपदग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात यावी

मागील दोन दिवस विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, हॉस्पिटलची ५०० कोटींची जमीन ७० कोटीत… मविआ सरकार असताना एस. टी. संप चिघळवणारे भाजपाचे तीन हस्तक आता गप्प का ?: विजय वडेट्टीवार

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली असून हत्या, खून, दरोडो, बलात्कार यांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात नुकतेच दिवसाढवळ्या दोन खून झाले. राज्यात शांतता राखण्यात भाजपा युती सरकार अपयशी ठरली आहे. कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असून सरकारचे सर्व लक्ष मात्र घोटाळे करून पैसा वसुल करण्याकडे आहे, असा घणाघाती हल्लाबोल …

Read More »

संरक्षण मंत्रालयाने दिली १ लाख ४४ हजार कोटीं रूपयांच्या १० प्रस्तावाला मंजूरी १० संरक्षण विषयक वस्तूंची खरेदी करणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण संपादन परिषदेने (DAC), मंगळवारी १० भांडवल संपादन प्रस्तावांसाठी आवश्यकतेची स्वीकृती (AoN) मान्य केली. भविष्यातील तयार लढाऊ वाहनांसाठी (FRCVs) जुन्या सोव्हिएत-ओरिजिनल T-92 टँक, एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार, डॉर्नियर-२२८ विमाने, नेक्स्ट जनरेशन फास्ट पेट्रोल आणि ऑफशोर पेट्रोल व्हेसल्स बदलण्यासाठीचे प्रस्ताव आहेत, ज्यांची एकत्रित रक्कम …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, महाराष्ट्राची विकासयात्रा वेगाने पुढे जात राहील 'उत्कृष्ट संसदपटू' आणि 'उत्कृष्ट भाषण' पुरस्कारांचे वितरण

महिलांच्या सहभागा शिवाय कोणतेही राष्ट्र, राज्य गतीमान प्रगती करु शकत नाही, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) महाराष्ट्राचं देशात पहिलं स्थान असून महाराष्ट्राची विकासयात्रा अशीच वेगाने पुढे जात राहील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त …

Read More »

अमित देशमुख यांची मागणी, अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांना तातडीने मदत करा नांदेड, हिंगोली जिल्हयातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्या नंतर माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांची मागणी

अतिवृष्टी आणि नंतर आलेल्या पुरामुळे मराठवाड्यात उभ्या शेती पिकाचे आणि जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, शासनाने आपतग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नांदेड, हिगोली जिल्हयात अनेक ठिकाणी अतीवृष्टी आणिपूरग्रस्त भागाच्या पाहणी नंतर केली. मागच्या तीन-चार दिवसात …

Read More »

सुनिल तटकरे यांची माहिती, जनसन्मान यात्रेचा तिसरा टप्पा… राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक मुंबईत पार

जनसन्मान यात्रेचा नुकताच दुसरा टप्पा संपला असून आता तिसरा टप्पा कधी घ्यायचा याच्या नियोजनावर चर्चा झाली. शिवाय महायुतीच्या नेत्यांची जी बैठक पार पडली त्याअनुषंगाने मतदारसंघनिहाय आढावा घेणे आणि त्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा, डीजीपी रश्मी शुल्कांना निलंबित करा बदलापूर प्रकणातील आपटे व महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटे अजून मोकाट कसे?

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फेल झाले आहेत तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बदलापूर घटनेतील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बदलापूर घटनेतील आरोपी आपटे व शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अजून अटक का झाली नाही? ते पाकिस्तानात पळून गेले काय? असा …

Read More »

ई गव्हर्नन्समुळे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण’ योजनेची रक्कम कमी वेळेत थेट खात्यात जमा ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा मुंबईत शुभारंभ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ई-गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचे माध्यम आहे. यामुळे पारदर्शकता येत असून सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत विश्वास निर्माण होतो. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याची रक्कम अतिशय कमी वेळेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात केवळ ई-गव्हर्नन्समुळे थेट जमा होणे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ई-गव्हर्नन्सविषयक २७ …

Read More »