राजकारण

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पदाचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपविला पुढी सरकार अस्तित्वात येई पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान पदाची जबाबदारी

केंद्रीय मंत्रिमंडळाने १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून रोजी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली आणि केंद्रीय मंत्रिमंडळासह राजीनामा दिला. राष्ट्रपतींच्या विनंतीनुसार नवे सरकार स्थापन होईपर्यंत नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहतील, असे राष्ट्रपती भवनाने सांगितले. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, टीडीपी- जेडीयूशी संपर्क साधण्याबाबत कोणतीही चर्चा नाही इंडिया आघाडीकडून अद्याप सरकार स्थापनेबाबत चर्चा नाही

लोकसभा निवडणूकीचे निकाल नुकतेच जाहिर झाले. या निकालाने एनडीएला बहुमत दिलेले असले तरी भाजपाचे संख्याबळ कमी झाले आहे. तर संपूर्ण इंडिया आघाडीला २३५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला केंद्रातील सरकार स्थापन करण्यासाठी आणखी दोन-तीन मित्र पक्षांची आवश्यकता आहे. यापार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाच्या …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली, राजीनामा स्विकारा पक्षात काम करण्याची पूर्ण मोकळी द्यावी केंद्रातल्या नेत्यांना भेटून सांगणार

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी नुकतीच झाली. या निकालात महाराष्ट्रातील लोकसभेच्या २३ जागांवर असलेली भाजपा अवघ्या ९ जागांवर आली. या पार्श्वभूमीवर या पराभवाची जबाबदारी स्विकारत भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला मिळालेल्या कमी जागांची जबाबदारी स्विकारत राजीनामा स्विकारण्याबाबात केंद्रीय नेतृत्वाला सांगणार असल्याचे सांगत पूर्ण वेळ पक्षाचे काम करण्यासाठीची जबाबदारी …

Read More »

बीडात तणावः ईशान्य मुंबईत वायकर आणि किर्तीकर यांच्यात चुरसीची लढत अखेर रविंद्र वायकर १ मतांनी विजयी

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून बीड लोकसभा मतदारसंघात कधी भाजपाच्या पंकजा मुंडे या पुढे तर कधी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे पुढे असे चित्र पाह्यला मिळत होते. तर अशीच काहीशी परिस्थिती ईशान्य मुंबईत शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर आणि शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर …

Read More »

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी अधिसूचना जारी १३ जून पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार

राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून एका सदस्याची निवडणूक घेण्यासाठीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयामार्फत जारी करण्यात आली आहे. यानुसार उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला १३ जून पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून निवडणूक लढविली गेल्यास २५ जून २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल, स्ट्रॅटेजी कशी जाहिर करणार आम्ही उद्या सर्वांशी चर्चा करून निर्णय जाहीर करू

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार असल्याच्या एक दिवस आधी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत चर्चा करून एक्झिट पोलचे आकडे खोटे असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. तसेच २९३ जागा इंडिया आघाडीला मिळणार असल्याची घोषणाही त्यावेळी करण्यात आली. मात्र आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर त्यानंतर भाजपा प्रणित एनडीला मिळालेल्या लोकसभेच्या जागा आणि …

Read More »

नाना पटोले यांचा टीका,… जनतेने अहंकारी, तानाशाही व्यवस्थेला धडा शिकवला राहुल गांधींच्या पदयात्रेने देशातील चित्र बदलले, ‘हम करे सो कायदा’ वृत्तीला चोख उत्तर मिळाले

लोकशाहीमध्ये जनता हीच सर्वश्रेष्ठ असते. जनतेपेक्षा कोणीही मोठा नाही, जे लोक स्वतःला सर्वात मोठे मानत होते, ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने वागत होते, अशा प्रवृत्तीला जनतेने लोकसभा निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असून देशात परिवर्तनाचा संदेशही महाराष्ट्रानेच दिला आहे. केंद्रातील १० …

Read More »

भाजपा बहुमतापासून दूरः नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू इंडिया आघाडीचे किंगमेकर? सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीकडून पत्ते पिसायला सुरुवात

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश आणि इतर हिंदी भाषिक राज्यांमध्ये इंडिया आघाडी आणि घटकपक्षांना मतदारांना चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. मात्र ज्या भाजापाने ४०० पारचा नारा दिला होता. त्या भाजपाला ४०० काय आता २५० जागा मिळणेही अवघड होऊन बसला आहे. तर इंडिया आघाडीच्या विजयी …

Read More »

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे हे उमेदवार विजयी काँग्रेसचे ३, अजित पवार गटाचा एक, एकनाथ शिंदे गटाचा दोन, उबाठा गटाला २, शरद पवार गटाला ४

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर दुपारपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचे कल जाहिर होण्यास सुरुवात झाली. साधारणतः दिड वाजल्यापासून विजयी उमेदवार घोषित होण्यास सुरुवात झाली. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील आणि भाजपाचे संजय काका पाटील आणि शिवसेना उबाठा गटाचे पैलवान उमेदवार …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या निकालात इंडिया आघाडीने एनडीएचा कल तोडला अनेक राज्यात एनडीए पिछाडीवर, उत्तर प्रदेशात मोदींचा लीड घटला

लोकसभा निवडणूक २०२४ साठी सात टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर जाहिर करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपा प्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच तिसऱ्यांदा भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए बहुमतात येईल आणि पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा विराजमान होतील असाही अंदाज व्यक्त करण्यात येत होता. …

Read More »