राजकारण

भारताने अमेरिकेचा धार्मिक आयोगाचा अहवाल फेटाळला

भारताने गुरुवारी यूएस सरकारच्या आयोगाने – आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील आयोग (यूएससीआयआरएफ) – धार्मिक स्वातंत्र्यावर जारी केलेल्या अहवालाचे निष्कर्ष नाकारून म्हटले आहे की ती “राजकीय अजेंडा असलेली पक्षपाती संस्था” आहे. भारताचे वैविध्यपूर्ण, बहुलवादी आणि लोकशाही आचारसंहिता समजून घेण्यासाठी यूएस सरकारच्या आयोगाची गरज नसल्याचे मत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या खुलाशात नमूद केले. …

Read More »

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी त्यांच्या जर्मनी दौऱ्यासाठी राजकीय मंजुरी घेतली नाही. साप्ताहिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना, MEA चे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “उक्त खासदाराच्या जर्मनीच्या प्रवासासंदर्भात MEA कडून कोणतीही राजकीय मंजुरी मागितली गेली नाही किंवा जारी केली …

Read More »

ब्रिजभूषण शरण सिंह यांना भाजपाने डावलत त्यांच्या मुलाला दिली उमेदवारी

महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केलेले कैसरगंजचे विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना भाजपाने डावलून त्यांचा मुलगा करण याला उमेदवारी दिली. करण भूषण सिंग हा ब्रिजभूषण सिंग यांचा धाकटा मुलगा आहे, ज्यांनी सलग तीन वेळा उत्तर प्रदेशची जागा जिंकली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ब्रिजभूषण कैसरगंजमधून दोन लाख मतांनी विजयी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, सहा हजार कोटी पंतप्रधान कार्यालयाकडून वसूल

साडे सहा हजार कोटी रुपये पंतप्रधान कार्यालयाने वसूल केले आहेत. मी स्वतःचे काहीच बोलत नाही. त्यांनी मला अटक करावी, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उस्मानाबाद येथे दिले. ते वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आयोजित उस्मानाबाद येथील जाहिर सभेत बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १९८० पासून …

Read More »

शरद पवार यांनी सांगितला आर आर पाटील यांच्या राजकिय प्रवेशाचा किस्सा

देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. एक वेगळी विचारधारा देशात निर्माण झाली आहे. ज्यांना स्वातंत्र्य चळवळशी देणे घेणे नाही, त्यांचा हातात देशाची सत्ता आहेत. त्यांचे नाव नरेंद्र मोदी आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. सांगलीचे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित आज महाविकास आघाडीच्या …

Read More »

दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचाऱ्यांना नायब राज्यपालांकडून नारळ

दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचाऱ्यांना नायब राज्यपाल व्ही. सक्सेना यांनी २ मे रोजी दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) माजी अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी परवानगीशिवाय त्यांची नियुक्ती केल्याचा आरोप केला. दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास (WCD) विभागाने DCW ला “योग्य प्रक्रियेचे पालन न करता” कामावर घेतलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे निर्देश …

Read More »

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना ४८ तास प्रचार करण्यास बंदी

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख के चंद्रशेखर राव यांना लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने ४८ तासांच्या प्रचारापासून बंदी घातली होती. आयोगाने केसीआर यांना पक्षाविरोधात केलेल्या कथित “अपमानजनक” टिप्पण्यांबाबत काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीवर नोटीस बजावली. ६ एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, केसीआर यांनी पत्रकार …

Read More »

अखेर नाशिकची उत्सुकता संपुष्टातः शिंदे गटाचे हेमंत गोडसेच लोकसभेचे उमेदवार

मागील अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आणि शिवसेना शिंदे गटाकडून तर कधी भाजपाकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. त्यातच लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहिर केले होते. मात्र …

Read More »

सेक्स स्कँडल आरोपी प्रज्वल रेवन्ना मोदीशहांच्या नाकाखालून परदेशी पळाला

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले. रेवन्नाने ब्लॅकमेल करुन महिलांवर अत्याचार केले व त्यांचे व्हिडिओही बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नराधमासाठी मते मागितली तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याचा उल्लेख श्री. रेवन्ना असा केला. प्रज्वल रेवन्नाने केलेले गुन्हे अत्यंत …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा,….तर संविधान व आरक्षणही संपवणार

काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची कामे केली. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण, जलसंपदा सह सर्वच क्षेत्रात प्रगती केली. काँग्रेसने ६० वर्षात जे उभे केले ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकून टाकले. देश विकून देश चालवला आणि २०५ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर …

Read More »