राजकारण

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा निर्माण करण्यासाठी असून भाजपाचा दारुण पराभव होणार यात तिळमात्र शंका नाही. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनाही त्याची जाणीव आहे. अमरावती लोकसभा मतदारंसघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी जाहीर सभेतच ‘मोदींची हवा नाही, हवेत उडू …

Read More »

ताटकळलेल्या उदयनराजे भोसले यांना अखेर भाजपाकडून उमेदवारी जाहिर

लोकसभा निवडणूक २०२४ सालच्या सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर उदयनराजे भोसले यांच्या यांना भाजपाने उमेदवारी जाहिर केली. विशेष म्हणजे सातारा लोकसभा निवडणूकीसाठी यापूर्वी कधीही उदयनराजे भोसले यांना किंवा त्या घराण्याशी संबधित व्यक्तीला आतापर्यंत निवडणूकीतील उमेदवारीसाठी ताटकळत ठेवले नव्हते. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणूकीसाठी उदयनराजे भोसले यांना भाजपाने बराचकाळ ताटकळत ठेवण्यात आल्याची चर्चा …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोगाने आतापर्यंत जप्त केले ४,६५० कोटी रूपये

केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) १५ एप्रिल रोजी सांगितले की, गेल्या ७५ वर्षांतील निवडणुकीदरम्यान ड्रग्ज आणि रोख रकमेसह प्रलोभनांची सर्वात मोठी रक्कम जप्त करण्याच्या मार्गावर आहोत. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्यापूर्वीच, ₹४,६५० कोटी रूपये जप्त केले आहेत, जे २०१९ च्या निवडणुकीत वसूल केलेल्या रकमेपेक्षा जास्त आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये, केंद्रीय …

Read More »

अरविंद केजरीवाल प्रकरणी सर्वोच्च न्यायालय २९ एप्रिलला सुनावणी घेणार

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी अटक रद्द करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी सक्तवसुली संचालनालयाकडून अर्थात ईडीकडून उत्तर मागितले, परंतु त्यांची “अंतरिम सुटका” करण्याचे आदेश देण्यास नकार दिला. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यासाठी खटला नियोजित …

Read More »

नाना पटोले यांची ग्वाही, आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीनच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध

काँग्रेस व इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आदिवासी, दलित, भटके, विमुक्त जातीच्या लोकांसाठी न्याय पत्रात दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. वन हक्क कायद्याचे सर्व प्रलंबित दावे एका वर्षाच्या आत निकाली काढणे व नाकारलेल्या दाव्यांचे पुनरावलोकन ६ महिन्यांत केले जाणार आहे. जातनिहाय जनगणना करण्याचा संकल्प काँग्रेसच्या न्यायपत्रात असून बहुजनांच्या कल्याणासाठी काँग्रेसने …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोल्हापूरकरांची पूर चिंता कायमची मिटणार

अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला असून त्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे कोल्हापूरकरांची महापुराची चिंता कायमची मिटणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार आणि हातकणंगले मतदार संघाचे उमेदवाराचा अर्ज सादर करण्यापूर्वी आयोजित केलेल्या प्रचार मेळाव्यात ते …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती, NRC आणि CAA कायदा मुस्लिम नव्हे तर VJNT विरोधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, मिलिंद इंगळे, ॲड. नरेंद्र बेलसरे, सचिन शिराळे, पराग गवई आदी उपस्थित होते. यावेळी …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, … लढाई मनुवादी विचारधारेच्या विरोधात

काँग्रेसची लढाई भाजपा, नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरी यांच्या विरोधात नसून मनुवादी विचारधारेच्या विरोधात आहे, देशाचे संविधान व लोकशाही कायम राखण्यासाठी आहे. आम्हाला हिटलर बनायचे नाही, देशात सर्व धर्माचे लोक एकत्र रहावे हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवले आहे. काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, देशासाठी काँग्रेसचे लोक फासावर चढले, नरेंद्र मोदींच्या …

Read More »

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत मोफत उपचार, घराघरात पाईप गॅस जोडणी, गरीबांच्या घरात मोफत वीज, प्रत्येक क्षेत्रात युवकांचे भविष्य उजळणाऱ्या लाखो संधी, महिलांना आर्थिक समृद्धी, समृद्ध, संपन्न भारत हा मोदी सरकारचा संकल्प आहे. यासाठीच मोदी यांना तिसऱ्या वेळी पंतप्रधानपद द्या, …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, आमच्या पक्षाला बदनाम करण्याचे निरर्थक प्रयत्न

भाजपा आणि काँग्रेस दोघांनीही पैसे देऊन पोसलेल्या फेक न्यूज मशिनरीद्वारे माझ्याविरुद्ध खोटा प्रचार चालवल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, मला बदनाम करण्यासाठी ते मुद्दाम चुकीचे कोट केलेले ग्राफिक सगळीकडे फिरवत आहेत. या दोन्ही दलित, आदिवासी, ओबीसी, …

Read More »