राजकारण

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४२ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले आहे. आज तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. आज सकाळपासून वातावरणात उष्मा राहिला असल्याने मतदार धीम्या गतीने बाहेर …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, जर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन दिला तर…

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन द्यायचा की नाही यावर सर्वोच्च न्यायालय विचार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने मंगळवारी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांना अंतरिम सवलत फक्त त्या अटीवरच दिली जाईल की ते कोणतेही अधिकृत कर्तव्य …

Read More »

पालघरचे खासदार डॉ राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश

पालघरचे विद्यमान खासदार डॉ राजेंद्र गावित यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खा राजेंद्र …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, ….संरक्षण मंत्र्याचे खोटे विधान

चीनमधील शक्सगाम खोऱ्यात घुसखोरी सुरू आहे. असे असताना आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य आले आहे की, तेथील लोक भारतात यायला तयार आहेत. हे प्रचंड मोठे फसवे वक्तव्य आहे. सियाचीनला लागून असलेल्या शक्सगाम खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भारतविरोधी कारवाया सुरू झाल्या आहेत आणि त्या लोकांसमोर येऊ नये म्हणून संरक्षण मंत्र्यांनी …

Read More »

फारूख अब्दुल्ला म्हणाले, पीओके बाबत राजनाथ सिंह यांना कोणी अडवलेय…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान ऑक्युपायड जम्मू काश्मीर अर्थात पीओके संदर्भात मोठे विधान करत पीओकेचे भारतात विलिनीकरण होईल असा आशावाद एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना केला. त्यावर जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (NC) नेते फारूख अब्दुल्ला यांनी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की, पीओकेचे विलिनीकरण पाकिस्तान शांतपणे …

Read More »

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देत उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र आज अखेर माजी आमदार नसीम खान यांनी आपली नाराजी दूर झाल्याचे सांगत पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात सक्रिय होत …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची टीका,…म्हणून नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लिम, पाकिस्तानची भाषा

लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. देशात व राज्यातही परिवर्तन करण्याची जनतेची भावना आहे. नरेंद्र मोदी व भाजपाला जनतेचा कौल लक्षात आला असून पराभव होणार व आपली खुर्ची जाणार या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषेचा स्तर खालावला आहे. पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदी …

Read More »

झारखंडमध्ये मंत्री सचिवाच्या नोकराच्या घरून सापडली बेहिशोबी रोकड

ईडी अर्थात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने ६ एप्रिल रोजी झारखंडच्या एका मंत्र्याच्या सचिवाशी कथितरित्या संबंधित असलेल्या घरगुती नोकऱाच्या घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात “बेहिशेबी” रोखड मिळाल्याचा दावा ईडीने केला. तसेच ही बेहिशेबी रोकड जप्त केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये केंद्रीय तपास एजन्सीचे अधिकारी एका …

Read More »

संजय राऊत यांची माहिती, हेमंत करकरे आणि आरएसएसमध्ये संघर्ष…

मुंबईवर २६/११रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ल्या झाला. त्यास आता जवळपास १५ ते २० वर्षाचा कालावधी उलटून गेले. या हल्ल्यात एकमेक पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब हा अतिरेक्याला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले. मादाम कामा रूग्णालयात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत आयपीएस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळस्कर या तीन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू …

Read More »

तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीचा प्रचार थंडावला

लोकसभा निवडणूकीसाठी तिसऱ्या टप्प्यासाठी सुरु असलेला प्रचार आज थंडावला. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. आज प्रचाराचा शेवटच्या दिवस असल्याने जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी जाहिरसभांच्या माध्यमातून आणि रोड शोच्या माध्यमातून आपापल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार केला. तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, …

Read More »