राजकारण

पंतप्रधान मोदी म्हणाले, युवकांच्या सामर्थ्यावर देशाची आर्थिक महासत्तेकडे

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या युवकांच्या सामर्थ्यावरच भारताची जगातील आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. अमृत काळातील पुढील २५ वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी @२०४७ पर्यंत …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, … भाजपाचे राजकारण धर्माच्या आधारावर

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य स्थापन केले तर संत महंतांनी अध्यात्माचे कार्य केले. शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही. छत्रपतींच्या सुराज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका अशी शिकवण होती पण आज भाजपाच्या राज्यात शेतकरी दररोज मरत आहे आणि सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीच देणेघेणे नाही. अनेक पक्षांची सरकारे आली व गेली पण …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा, मोदींनी कसबा विधानसभा पोटनिवडणूकीचा…

देशातील लोकसभा निवडणूकीला अद्याप दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. त्या पार्श्वभूमी वर काँग्रेस आणि भाजपा नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. तसेच भाजपाला अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी निवडणूक जेवढी सोपी समजतात तेवढी ती सोपी राहिलेली नसल्याचा इशारा देत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची ताकद एकत्र आल्यानंतर काय होते …

Read More »

अजित पवार यांच्या उपस्थितीत जळगांव कोल्हापूर येथील कार्यकर्त्यांनी केला पक्षप्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते रमेश नागराज पाटील, सचिन पाटील यांच्यासह रावेर मतदारसंघातील माजी नगरसेवक, माजी सभापती, सरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, विविध राजकीय पक्षांच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश …

Read More »

छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, नाशिकच्या जागेवर चर्चेनंतर लवकरच निर्णय…

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार हे अजित पवार गटाचे आहे. त्यामुळे नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आपलाही दावा कायम आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चेनंतर कोण उमेदवार असेल ते ठरविले जाईल. कुठली जागा कुणाला मिळेल ते लवकरच कळेल पण महायुतीतील कुठल्याही पक्षाला संधी मिळाली. त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे. आगामी वर्ष हे निवडणुकांचे असून त्यादृष्टीने …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, काँग्रेसची… पुन्हा एकदा तीच मानसिकता

काँग्रेसनं अनेकवेळा हिंदूविरोधी भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांची तीच मानसिकता समोर आली आहे. काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केला आहे. त्यामुळे जो न हित के राम का वह न किसी के काम का! हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी …

Read More »

काँग्रेस म्हणते, भाजपाला फक्त ३० टक्के, तर ७० टक्के मते…..

भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात देशभरात मोठा आक्रोश आहे. देशाची एकता व अखंडता मोडीत काढण्याचे काम भाजपा सरकारने मागील दहा वर्षात केले आहे. जातीय तणाव निर्माण करून भाजपा सामाजिक सौहार्द बिघडवत आहे. विरोधीपक्षांना घाबरवण्यासाठी ईडी, सीबीआयचा गैरवापर केला जात आहे पण भाजपाच्या या दडपशाहीसोर काँग्रेस डगमगली नाही. महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचे …

Read More »

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्यास काँग्रेसचा नकार

मागील दिवसांपासून देशातील तमाम हिंदूधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या राम मंदिराचा उद्घाटन आणि रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना २२ जानेवारी २०२४ रोजी करण्याचा कार्यक्रम अयोध्येत पार पडणार आहे. या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण कोणाला मिळाले कोणाला मिळाले नाही यावरून विविध राजकिय पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर श्वेत पत्रिका काढा

पेपरफुटीची वाढती प्रकरणे लक्षात घेता पारदर्शक पद्धतीने परीक्षा होण्यासाठी टी.सी.एस. व इतर कंपन्यांना देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करावी. पेपर फुटीचा आरोप होत असलेली सध्याची तलाठी पद भरती रद्द करावी. या परीक्षेसंदर्भात होत असलेल्या आरोपांची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. या संपूर्ण पद भरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी. यापुढील सर्वच …

Read More »

शरद पवार यांचा हल्लाबोल, विधानसभा अध्यक्षांचा निवाडा न्यायालयीन नव्हे तर….

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष कोणाचा, हा निर्णय दिला. मात्र हा न्यायालयीन निवाडा नसून राजकीय निवाडा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर आलेल्या निकालानंतर पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, दोन-तीन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि …

Read More »