राजकारण

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले “हे” महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय घेतले

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्याच्या कार्यकक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय राज्यातील चिटफंड न्यायलयीन प्रकरणांचा वेगाने निवाडा यासाठी कायद्यातील जून्या कायद्यातील तरतूदींचा समावेश करण्यात येणार आहेत. याशिवाय चेंबूर येथे नवबौध्द मुलां-मुलींसाठी आयटीआय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे पीएम मित्रा पार्कच्या जमिनीसाठी देण्यात …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्री- दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार उपमुख्यमंत्र्यानी राजीनामे द्यावे

राज्यातील सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणावरून सध्या राज्यामध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठा आंदोलक …

Read More »

सुनिल तटकरे म्हणाले, आता राजकारण करायची ही वेळ नाही… सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने सहकार्य करण्याची आवश्यकता

समाजात अस्वस्थता निर्माण होते त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीचा राजकीय फायदा घेणे योग्य ठरु शकत नाही. सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने आज ज्या परिस्थितीतून महाराष्ट्रातील स्थिती जातेय त्यामध्ये सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. राजकारण करायचे असते त्यावेळी करता येते परंतु आता राजकारण करायची ही वेळ नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे …

Read More »

नाना पटोले यांचे आश्वासन, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर आरोग्य व शिक्षणाचा कायदा करू पेटता महाराष्ट्र नको तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा

राज्यातील आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरु आहे, अपुरे कर्मचारी असल्याने त्याचा सार्वजिनक आरोग्य सेवेवर काय परिणाम होतो ते ठाणे, नाशिक, नांदेड व नागपूरमध्ये मागील महिन्यात झालेल्या घटनांवरून दिसले आहे. आरोग्य विभागात कर्मचारी व अधिकारी यांची हजारो पदे रिक्त आहेत पण सरकार या पदांची भरती करत नाही. आरोग्य विभाग व शिक्षण …

Read More »

कमी पावसामुळे राज्यातील ४० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे. राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते …

Read More »

मोठी बातमीः कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला

मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची स्पष्टोक्ती, सर्वसामान्य मराठा असे करू शकत नाही मराठा शांततेत आंदोलन करा

मराठा आरक्षण प्रश्नी आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावित चर्चा करण्यात आली. त्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने ठोस निर्णय न झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले. त्यानंतर राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आमदारांची घरे जाळण्याचे प्रकार करण्यात आले. तर काही आमदारांच्या …

Read More »

मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळणः आमदारांच्या घरांची जाळपोळ तर शिंदे गटाच्या खासदार आमदारांचे राजीनामे

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज सोमवारी सकाळी बैठक झाली. मात्र या बैठकीत मराठा आरक्षणच्या सध्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताच तोडगा निघाला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतून दिसून आले. त्यामुळे सहनशीलता संपलेल्या मराठा आंदोलकांनी मराठवाड्यातील अजित पवार गटाचे प्रकाश सोळंकी, तर शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागर …

Read More »

अशोक चव्हाण यांची मागणी, मराठा आरक्षणाबाबत सरसकट निर्णय घ्या राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीनंतर केली मागणी

राज्य सरकारने राज्यातील सरसकट सर्व मराठा समाजाला न्याय मिळेल, अशा पद्धतीने मराठा आरक्षणाबाबत सरसकट निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. मराठा आरक्षण व राज्यातील इतर ज्वलंत प्रश्नांसंदर्भात आज दुपारी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. यावेळी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, मराठा आरक्षण प्रश्नी “टीकणारे आरक्षण देणार” ते “प्रयत्न करणार” आधी एकल शिंदे आयोगाचा निर्णय आता तीन न्यायमुर्तींची समिती निर्णय देणार

राज्यात मराठा आरक्षण प्रश्नी गावागावात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राजकिय नेत्यांना गावबंदी केली. त्यातच मराठा आरक्षणाचे कार्यकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आत ६ वा दिवस असून त्यांचा आवाज अत्यंत क्षीण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने …

Read More »