काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने बहाल केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहेच पण देशातील जनतेच्याही आशा पल्लवित झालेल्या आहेत. देशात सध्या हुकूमशाही कारभार सुरु असून या तानाशाहीविरोधात इमानदारीने लढाणारा नेता अशी राहुल गांधी यांची प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण झाली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी …
Read More »जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत, अंबादास दानवे आणि मंत्री भुमरे आणि सत्तार भिडले पालकमत्री म्हणजे जहागीरी आहे का? अंबादास दानवे यांचा सवाल
छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या दोन गटात जोरदार राडा पाहायला मिळाला. जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना निधी वाटपावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना भिडले. मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे!घाबरणार नाही तर नडणार …
Read More »भाजपाशी सलगीच्या चर्चा? म्हणजे आमचा मोठा अपमान जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली खंत
जयंत पाटील आणि मी शरद पवारांसोबत आहोत. मी मरेपर्यंत त्यांच्यासोबतच राहीन. मात्र जयंत पाटील आणि माझ्याविषयी भाजपाशी सलगीच्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न होतोय. तशा चर्चा होणे म्हणजे आमचा मोठा आपमान आहे, असे शरद पवारांच्या विश्वासातले असणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. केंद्रीय सहकार विभागाच्या कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्री …
Read More »बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी नाना पटोले म्हणाले, जातनिहाय जनगणना गरजेची जातनिहाय जनगणनेला मोदी सरकारचा विरोध, भाजपा व मोदी बहुजन समाजविरोधी..
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बहुजन समाजाचेही मोठे योगदान आहे पण आजची परिस्थिती वेगळी आहे, जे लोक स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हते त्यांच्या हातात सत्ता गेली असून हेच लोक संविधान संपवण्याचे काम करत आहेत. भाजपा व मोदी सरकार हे बहुजन समाजाला फक्त मतांसाठी वापरून घेतात, अधिकार मात्र काहीच देत नाहीत. बहुजन समाजाला न्याय …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले, नकारात्मक विचाराच्या बाहेर…. देशभरात पाचशे आठ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कोनशीला बसवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले. २४,४७० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या पुनर्विकासात २७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 508 स्थानकांचा समावेश आहे. यात इतर काही राज्यांसह उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील प्रत्येकी 55, बिहार मधील ४९, महाराष्ट्रातील …
Read More »अमित शाह यांना गुपचूप भेटल्याची जोरदार चर्चा; जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती,… त्यात काय विशेष आपण शरद पवार यांच्या बंगल्यावर होतो; गेलो तर तुम्हाला सांगणारच
नुकतेच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले. या अधिवेशनाच्या शेवटच्या एक दिवस किंवा त्या आधी भर विधानसभेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक नंबर आणि दोन नंबर उपमुख्यमंत्री कोण असा सवाल करत दोन्ही उपमुख्यमंत्ऱ्यांचे लक्ष नसन्यावरून अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. त्याच ४८ तासही …
Read More »अमित शाह म्हणाले, अजितदादा हीच तुमची योग्य जागा, तर अजित पवार म्हणाले, …जरा जास्त प्रेम सहकार विभागाच्या पोर्टलच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकाच मंचावर
समस्त भारतीय आणि विशेषत: भारतीय राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांचा आज पुणे जिल्ह्यात केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था (CRCS) कार्यालय या पोर्टलचे अनावरण करण्यासाठी पुण्यात आले. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आवर्जून उल्लेख …
Read More »नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, ‘इंडिया’च्या बैठकीच्या तयारीसाठी प्रत्येकी ५ नेत्यांचा गट मुंबईतील ‘इंडिया’ची बैठक विशेष महत्वाची, बैठकीच्या तयारीवर चर्चा
काँग्रेस पक्षासह देशातील महत्वाच्या पक्षांनी स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत ही बैठक होत असून राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर होत असल्याने या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. बैठकीच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रत्येकी ५ …
Read More »सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज रहा महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे दीक्षांत संचलन संपन्न: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी ही देशातील उज्ज्वल नावलौकिक असलेली प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशसेवेत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांसमोर सायबर व आर्थिक स्वरूपाच्या गुन्हेगारीची आव्हाने असल्याने ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज रहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आज महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक सत्र …
Read More »पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना तीन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाचा निर्णय
तेहरीक ए-पाकिस्तानचे प्रमुख तथा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखान प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावली. या शिक्षेच्या विरोधात इम्रान खान यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची संधी आहे. इम्रान खान यांचे वकील तातडीने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी पोहोचले. तोशाखान …
Read More »
Marathi e-Batmya