बारसूतील रिफायनरी प्रकल्पाचा विरोध वाढत जात आहे. सरकारने जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही तेथील एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर टीका केली. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हणाल्या की, कोकणातील …
Read More »अजित पवार म्हणाले, चार-पाच लाख जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे बाजूने तर…. वेळ पडल्यास मीही आंदोलकांच्या भेटीला जाईन
बारसू येथील रिफायनरीवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेले आहे. यावरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज अप्रत्यक्ष ठाकरे गटाच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत आंदोलनकर्त्यांच्या भेटीसाठी गरज पडल्यास जाईन असे सांगत आपली भूमिका …
Read More »संजय राऊत यांची खोचक टीका, मोगलाईचे आदेश देऊन देवेंद्र फडणवीस मॉरिशसला… दिल्लीतील मोगलांच्या आदेशानुसार बारसूत घडत आहे
नाणारमध्ये रद्द केलेला तेलशुद्धीकरण प्रकल्प बारसूमध्ये आणण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सर्वेक्षण आणि माती परीक्षण सुरू असून, त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. याठिकाणी ४ दिवसांपासून स्थानिकांचं आंदोलन सुरू आहे. अशातच आज २८ एप्रिल रोजी आंदोलकांनी सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, बारसू भागात शिंदे-फडणवीसांचा ‘रावणराज’ महाराष्ट्र अस्थिर असताना मुख्यमंत्री सुट्टीवर तर उपमुख्यमंत्री मॉरिशिअसमध्ये..
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू भागात रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापले असताना शिंदे-फडणवीस सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. बारसूचा प्रश्न पोलीस बळावर हाताळला जात असून परिस्थिती चिघळलेली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे रावणराज आहे. महाराष्ट्र अस्थिर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर तर उपमुख्यमंत्री मॉरिशिअसला गेले असून दोघांची अवस्था ही बादशाह-ए-बेखबर अशी आहे, असा घणाघाती …
Read More »आधी लाठीचार्ज नंतर आंदोलनकर्त्यांशी मखलाशीः जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक चर्चेसाठी येताच पाठ जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी बोलण्यास सुरुवात करताच आंदोलनकर्त्ये उठून गेले
मागील तीन-चार दिवसांपासून राजापूर येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प उभारणीला स्थानिकांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पासाठी जमिन परिक्षणाच्या कामासही स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवित रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शविला. मात्र राज्य सरकारकडून स्थानिकांचा विरोध डावलून सातत्याने जमीन परिक्षणाचे काम तसेच सुरु ठेवले. त्यामुळे प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून सातत्याने आंदोलन करण्यात येत …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, जनतेची डोकी फोडून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करु नका अन्यथा… सरकारने बारसुजवळची जमीन परप्रांतीय व जवळच्या लोकांना कमी भावाने मिळवून दिली
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसु रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध असताना भाजपाप्रणित शिंदे सरकार हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात असून काँग्रेस पक्ष स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सरकारने जनतेची डोकी फोडून, खोटे गुन्हे दाखल करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर सरकारलाही जशास …
Read More »शिंदे गटाच्या नेत्यांच्या विरोधात सुषमा अंधारे यांनी ठोठावला ३ रूपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात केला दावा दाखल
शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शिरसाट अलिकडेच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंबद्दल बोलत असताना त्यांनी एक बेताल वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी आज २७ एप्रिल रोजी संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात सुषमा अंधारे यांनी शिरसाटांविरोधात तीन रुपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला. सुषमा …
Read More »विनायक राऊत यांचा हल्लाबोल, माळरानाच्या दगडाची अन् करवंदीच्या…. महिला आंदोलकांना हाकलून लावले
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू गावात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी कठोर विरोध केला. माती परिक्षणाकरता अधिकारी आले असता त्यांनी या सर्वेक्षणाला विरोध केला. यावेळी ग्रामस्थांनी तेथे आंदोलन छेडले. मात्र, यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच, या आंदोलकांना अटकही करण्यात आली होती. याप्रकरणी कोकणातील खासदार विनायक …
Read More »राज ठाकरेंच्या त्या सल्ल्यावर अजित पवार यांचे प्रत्युत्तर, काकाकडे जसं लक्ष… शरद पवारांच्या त्या वक्तव्याचा अर्थ नव्या चेहऱ्यांना संधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची नुकतीच मुलाखत घेतली. यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांना काय सल्ला द्याल असा सवाल केला. यावर राज ठाकरेंनी अजित पवारांना …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, कर्नाटक मुख्यमंत्रीपदासाठी २५०० कोटींचा लिलाव, मोदीजी उत्तर द्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर काँग्रेसचे सर्व प्लॅन तयार, योग्य वेळी निर्णय घेऊ
केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने मागील ९ वर्षात जनतेसाठी काहीही केलेले नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असून देशाची संपत्ती विकून देश चालवणारा पंतप्रधान देशाने पहिल्यांदाच पाहिला. नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा देशातील जनतेला आता कळाला असून नरेंद्र मोदी हे, ना हिंदूंचे आहेत, ना मुस्लीमांचे, …
Read More »
Marathi e-Batmya