भविष्यात येणाऱ्या ८ हजार नवीन बसेस साठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने १७४५० चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबविण्यात येणार असून येत्या २ ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण -तरुणींना …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणा-या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांवरच हल्ला
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर गुंडांकडून झालेला अमानुष हल्ला हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार आहे. जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य करून करण्यात आलेली ही मारहाण म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा थेट हल्ला आहे, सरकारने या हल्लेखोर गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, दसऱ्याला सीमोल्लंघन करत मोहन भागवतांनी आरएसएस बरखास्त करावा रामराज्याची भाषा करता तर अग्निपरिक्षेला का घाबरता?
आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षात देशाला नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांसारखी भ्रष्ट माणसे दिली. जातीवाद व भांडवलशाहीचा विळखा आणखी घट्ट झाला आहे, ही मनुवादाची देण आहे. आता १०० वर्ष होत असताना पंचागानेही चांगला मुहूर्त दिला असून २ ऑक्टोबर रोजी दसरा, गांधी जयंती व रा. स्व. संघाची शंभरी असा …
Read More »अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रु.च्या निधीस मान्यता नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा व मदत देण्यासाठी शासन संवेदनशील असून जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय …
Read More »आदिती तटकरे यांची माहिती, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी ई-केवायसी सुरू संकेतस्थळावरच ई-केवायसीची सुविधा
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी ची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल, तसेच पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, अमली पदार्थ संबंधी गुन्ह्यांत झीरो टॉलरन्स कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देशाची महासत्तेकडे वाटचाल
कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करताना अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्ये हे पोलीस दलासमोर आव्हान ठरत असून यासाठी झीरो टॉलरन्स धोरण राज्याने अवलंबले आहे. तसेच बदलत्या काळानुसार सायबर क्षेत्रातील गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »रोहित पवार आमसभेतच अधिकाऱ्यावर संतापले, आतापर्यंत गोट्या खेळत होतास? जामखेड मध्ये नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आयोजित कार्यक्रमातच संतापले
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नागरिक आपापल्या भागातील समस्या मांडत होते. त्यावेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले अधिकारीही नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देत समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र एका नागरिकांने उपस्थित केलेल्या प्रश्नावर एका अधिकाऱ्याने उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता …
Read More »त्या वक्तव्यावरून शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन, व्यक्त केली नाराजी भाजपा आमदार पडळकर यांच्या विधानावरून नाराजी
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ शरद पवार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) ने पडळकर यांच्या विरोधात निदर्शने केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या विधानाशी असहमती व्यक्त केली. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर चर्चा केली. जयंत पाटील हे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, परवाने कमी करून नवीन उद्योगासाठी लागणारा वेळ कमी करावा संपन्न औद्योगिक महाराष्ट्रासाठी ' इज ऑफ डूइंग बिजनेस'
देशात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक खेचून आणणारे आपले राज्य आहे. कमी कालावधीत या गुंतवणुकीचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी सुधारणा करण्यात येत आहेत. नवीन उद्योग उभारणीसाठी लागणारे परवाने कमी करून वेळेची बचत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’ वॉर रूम बैठकीत सुधारणांचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन, शंभरी पूर्ण करणाऱ्या रा. स्व. संघाने संविधान व गांधी विचार स्विकारावा २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दिक्षाभूमी ते सेवाग्राम संविधान सत्याग्रह यात्रा; रा. स्व. संघाला संविधान भेट देणार
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून हा नियतीचा एक संकेत आहे. १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या रा. स्व संघाने आता तरी नथुराम व विखारी विचार सोडून समता, बंधुता व सामाजिक न्यायाचे संविधान व गांधी विचार स्विकारावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »
Marathi e-Batmya