राजकारण

सुजात आंबेडकरांचे राज ठाकरेंना आवाहन, अमित ठाकरेंनी पहिल्यांदा हनुमान चालिसा म्हणावी आम्हाला ''बी टीम'' म्हणणाऱ्यांनी पहाटेचे सरकार स्थापन करून स्वतःची विश्वसाहार्ता धोक्यात आणली

अलीकडेच मी एक वक्तव्य ऐकलं मशिदीवर मोठे भोंगे लावले तर त्याठिकाणी हनुमान चालीसा वाचली जाईल. मी या विधानाला १०० टक्के पाठिंबा देतो फक्त अमित ठाकरे यांनी पहिल्यांदा हनुमान चालीसा म्हणत त्याचा शुभारंभ करावा याकरिता एकाही बहुजन माणूस नको, जानवे घालून हनुमान चालीसा म्हणण्याला माझी हरकत नाही असा उपरोधिक टोला वंचित …

Read More »

शरद पवार म्हणाले, गुजरातमध्ये भयाण हिंसा झाली, पण तेव्हाचे राज्य प्रमुख पुढे… काश्मीर फाईल्स, वाढती महागाईवरून पवारांचा पुन्हा केंद्रावर निशाणा

महागाई कमी करण्याऐवजी सामाजिक ऐक्य धोक्यात येईल अशी वक्तव्ये केली जात असून तशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली असल्याचे दिसून येत आहे. जनमाणसात विषारी भावना वाढवण्यावर त्यांचा भर आहे. गुजरातमध्ये यापेक्षा भयाण हिंसा झाली होती, रेल्वेचे डबे पेटवले होते, शेकडो लोकं मृत्यूमुखी पडले होते. त्यावेळी त्या राज्याचे प्रमुख कधी पुढे आलेले आमच्या …

Read More »

केवळ मुसलमानांचा सन्मान करायचा अनं हिंदूंचा नाही, हे चालणार नाही: राजचे भाषण सुखावणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

बाकी सर्व धर्मांचा सन्मान करायचा आणि केवळ हिंदूंवर बंधने लादायची असे चालणार नाही. सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले. देशात सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता यांचे इतके स्तोम वाढले की हिंदूंना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटू लागली. …

Read More »

मंत्री आव्हाडांचे राज ठाकरेंना निमंत्रण वजा आव्हान, सकाळी लवकर उठून या मुंब्राला मदरशावरून आव्हाडांचे आव्हान

गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबईसह मुंब्र्यातील अनेक मदरशामध्ये एकदा जाऊन बघा तिथे फार गंभीर प्रकार सुरु आहेत. त्यांच्यावर धाडी घाला असे आवाहन करत. एकेक आवरता आवरता असा नाकीनऊ येवू शकेल असे सूचक वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली. त्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड …

Read More »

शरद पवार म्हणाले, राज ठाकरेंचे एक वैशिष्ट आहे… राजच्या आरोपांना पवारांचे उत्तर

मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांनी महाराष्ट्रात जाती-पातीचे राजकारण सुरु केल्याचा आरोप जातीतील भांडणे त्यांना हवी आहेत असा गंभीर आरोप शरद पवारांवर केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, राज ठाकरे यांचे एक वैशिष्ट आहे ते तीन चार महिने कुठे तरी गायब होतात …

Read More »

राज ठाकरेंच्या टीकेला शिवसेनेचे उत्तर, भाजपाचा लाऊडस्पीकर काल शिवतीर्थावर वाजला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना पलटवार

गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसे मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत महाराष्ट्रातील जाती-पातीला शरद पवार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. तर ईडीने नोटीस बजावली म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी सांगितले की मला अटक करा पण कुटुंबियांना हात लावू नका …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, पहिल्यांदा घरच्यांना सांग… शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र

ईडीची नोटीस आम्हालाही आली मग आम्हीही गेलोच ना, मग यांना मिळाली. त्यावर विधानसभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ठणकावून सांगत होते माझ्या घरच्यांना हात लावाल तर खबरदार मला सर्वात आधी अटक करा, पहिल्यांदा घरच्यांना सांग मुंबई महापालिकेत जावू नको म्हणून असा थेट निशाणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर …

Read More »

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ३०% टक्के जागेवर चार्जिंग बंधनकारक: इंधनापेक्षा स्वस्तच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

कोरोना काळापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रीक वाहनांच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन वर्षात चार्जिंग स्थानके उभी करण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्याच्या एकात्मिक बांधकाम नियमानुसार सरकारी कार्यालये, मॉल, व्यापारी संकुले आणि गृहनिर्माण सोसयट्यांमधील एकूण जागेच्या ३० टक्के जागेवर चार्जिंगची सुविधा बंधनकारक करण्यात आले …

Read More »

फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला, निमंत्रण दिले नाहीतरी चालेल पण…. मेट्रो उद्घाटन सोहळ्यावरून लगावला टोला

मुंबईतील मेट्रोल मार्ग २ आणि मेट्रो मार्ग ७ च्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले नाही. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टोला लगावला असून मेट्रो उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण दिलं नाही तरी चालेल मात्र प्रकल्प मार्गी लावा असा खोचक टोला लगावत याचबरोबर मेट्रो-३ सुरू …

Read More »

शरद पवारांचा मोदींवर निशाणा, दुर्दैवाने “त्यात” धन्यता मानणारे नेतृत्व पहायला मिळतेय… भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची पुन्हा घरवापसी

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू ही त्या काळातली नेतृत्वाची पिढी होती. त्यांनी स्वातंत्र्यासाठी कष्ट केले. त्यानंतर देश उभा करण्यासाठी प्रचंड योगदान दिले. देशासाठी जे खपले, त्यांच्याबद्दलचा आदर, सन्मान ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टीका-टिप्पणी करणे, यातच धन्यता मानणारे नेतृत्व आज दुर्दैवाने आपल्याला देशात पाहायला मिळतेय अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …

Read More »