संजय निरूपम यांची टीका, काँग्रेस मानसिक दिवाळखोर झालीय निवडणूक निकालांवर टीका करण्यापेक्षा पराभवाचे विश्लेषण करा

एकामागून एक निवडणुकांमध्ये पराभव होत असल्याने काँग्रेस मानसिकदृष्ट्या दिवाळखोर झालीय अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवर काँग्रेस नेत्यांनी संशय व्यक्त केला, त्यावर निरुपम यांनी सडकून टीका केली.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, भारतीय मतदारांचा विश्वास संपादन करण्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे निवडणूक निकालांवर संशय व्यक्त करणे, ईव्हीएमध्ये गडबड झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते करत आहेत. काँग्रेसच्या विरोधात मतदान होत असून तिथं भाजप, शिवसेनेचे उमेदवार विजयी होत आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्लीमध्ये अलिकडे झालेल्या निवडणुकांमध्ये मतदारांनी काँग्रेस आणि विरोधी आघाडीला नाकारले. सातत्याने पराभव होत असल्याने काँग्रेस नेते आता निवडणूक प्रक्रियेवर खापर फोडत आहेत. गडबड निवडणूक प्रक्रियेत नसून तुमच्या मानसिकतेमध्ये आहेत. यातून काँग्रेस नेत्यांची मानसिक दिवाळखोरी दिसून आली, अशी टीका केली.

शेवटी बोलताना संजय निरूपम म्हणाले की, निवडणुकांमध्ये कोणतीही गडबड झालेली नाही हे सत्य काँग्रेस नेत्यांनी आणि राहुल गांधीनी आता स्वीकारायला हवे. त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा पराभवाचे विश्लेषण करायला हवे, असा टोलाही यावेळी लगावला.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *