मुंबई : प्रतिनिधी प्लास्टिक बंदीनंतर शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत गांभिर्याने विचार सुरु असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित जागतिक पर्यावरण दिन सोहळ्यातील पर्यावरण विषयक पारितोषिक वितरण कार्यक्रमात श्री. कदम बोलत होते. यावेळी राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, अपर मुख्य सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण …
Read More »मंत्रालयासमोर न्याय मागण्यांसाठी निदर्शने करणाऱ्या अंधानाही पोलिसी खाक्या सरकार दाद देईना आणि पोलिस आंदोलन करू देईना अशी अंधाची अवस्था
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या गलथान आणि ढिसाळ कारभारामुळे मंत्रालयात येवून किंवा मंत्रालयाच्या समोर निदर्शने आपल्या न्याय मागण्यांच्या प्रश्नी दाद मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता अंध व्यक्तींनीही न्याय मागण्याच्या प्रश्नी दाद मागण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हे आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर …
Read More »शिपाईच्या सेवानिवृत्तीला राज्याच्या माजी मुख्य सचिवांसह आजी-माजी सनदी अधिकारी हजर गृहनिर्माण विभागातील आजी-माजी उपसचिव, कक्ष अधिकाऱ्यांचीही उपस्थिती
मुंबई : प्रतिनिधी राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयात एखादा सनदी अधिकारी, मुख्य सचिव अथवा अप्पर मुख्य सचिव सेवानिवृत्त होत असेल तर त्या अधिकाऱ्याला निरोप देण्यासाठी सर्वच कर्मचारी आणि अधिकारी एकत्र येतात. मात्र ज्या व्यक्तीने ३४ वर्षे एकाच विभागात शिपाई पदी काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या प्रामाणिक सेवेची पोचपावती म्हणून निवृत्तीच्या दिवशी राज्याच्या …
Read More »मंत्र्यांच्या पार्थिवाला अग्नीही मिळत नाही तोच कार्यालय रिकामे करून देण्याचा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठोपाठ त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाचा प्रताप
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या निधन होवून त्यांच्या पार्थिवाला अग्नीही मिळत नाही. तोच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने कालच अर्थात गुरूवारी दुपारनंतर त्यांचे कार्यालय तातडीने रिक्त करून विभागाकडे सुपुर्त करावे असे आदेश कृषी मंत्र्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बजाविल्याची धक्कादायक माहिती नुकतीच उघडकीस …
Read More »अपात्र झोपडीचा पुरावा द्या आणि घर मिळवा राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी
मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणावर अनेक सर्वसामान्य नागरीकांना हक्काचे घर नसल्याने रस्त्याच्या कडेला, शासकीय जमिनीवर अथवा खाजगी व्यक्तीच्या जमिनीवर झोपड्या घालून रहात असल्याचे दिसून येते. यातील अनेक झोपडीधारक अपात्र ठरत असल्याने त्यांच्या घराचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा अपात्र ठरणाऱ्या झोपडीधारकांना हक्काचे मिळणार असून फक्त अपात्र झोपडीचा पुरावा …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच मोठे खिंडार माजी मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक आणि भास्कर जाधव यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश
मुंबई : प्रतिनिधी देशातील लोकसभा निवडणूकांना एक वर्ष तर विधानसभेच्या निवडणूकांना दिड वर्षे अद्याप राहीलेली असतानाच सर्वच राजकिय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची आणि नेत्यांची पळवा पळवी सुरु केली आहे. या पळवा पळवीत आता शिवसेनेने पुढाकार घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, नवी मुंबईतील वजनदार नेते गणेश …
Read More »सरकारकडून जलयुक्त शिवार योजना राबवूनही मराठवाडा सर्वाधिक तहानलेला १४७० टँकर्सने केला जातो पाणी पुरवठा : तर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात ५५० टँकरचा वापर
मुंबई : प्रतिनिधी सततच्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पावसाळी पाण्याची साठवून आणि त्याचा पुर्नवापर करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे ही योजना राबविण्यास सुरुवात केली. मात्र मागील तीन वर्षात राज्यातील जवळपास १६ हजार गावे जलयुक्त शिवार योजनेमुळे दुष्काळमुक्त झाल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत असला तरी मराठवाड्यातील …
Read More »मुंबई महापालिकेच्या विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांकडून म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा शहरातील पायाभूत सुविधा निर्मितीत अडचण येण्याची मुंबई महापालिकेला भीती
मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील परवडणाऱ्या घरांचा प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने आणि म्हाडा इमारतींच्या पुर्नविकास प्रकल्पांना गती देण्यासाठी म्हाडा प्राधिकरणास नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई शहरातील पायाभूत सुविधांबरोबरच महसूलावर परिणाम होणार असल्याची मत व्यक्त करत म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यास विरोध दर्शविला. तसेच …
Read More »महाराष्ट्रातील कृष्णा, मुळा-मुठा नद्या होणार स्वच्छ केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या पुढाकाराने देशातील ४८ नद्या व समुद्र किनारे होणार स्वच्छ
नवी दिल्ली : प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील १९ राज्यातील ४८ नद्या व समुद्र किना-यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कृष्णा, मुळा-मुठा नद्या आणि मि-या व गणपतीपुळे समुद्र किनारे यांचा समावेश या मोहिमेत आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने यावर्षी जागतिक पर्यावरण …
Read More »मिशन शौर्य मधील आदिवासी विदयार्थ्याकडून एव्हरेस्टवर महाराष्ट्राचा झेंडा आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील सोनेरी क्षण
मुबंई : प्रतिनिधी आकांक्षापुढे जिथे गगन ठेंगणे…या काव्य ओळींची आठवण यावी असे धाडस करण्यात आज चार आदिवासी विदयार्थी यशस्वी ठरले आहेत. जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणा-या माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आज मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे यशस्वी ठरले आहेत. एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपुर , जिल्हा प्रशासन चंद्रपुर आणि …
Read More »
Marathi e-Batmya