सरकार प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींचे कर्ज नव्याने घेणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील ३१३ बांधकामाधीन पाटबंधारे प्रकल्पांपैकी ५२ प्रकल्पांसाठी १५ हजार कोटी रूपयांची गरज आहे. हे कर्ज घेण्यासाठी आझ झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
सद्यस्थितीत राज्यातील ३१३ बांधकामाधीन प्रकल्पांवर आहेत. या प्रकल्पांवर ८३ हजार ३०० कोटी रूपयांचा खर्च झालेला आहे. उर्वरित कामासाठी ९३ हजार ५७० कोटी रूपयांची गरज लागणार आहे. राज्य शासनाकडून दरवर्षी १० हजार कोटी रूपयांचा निधी जलसंपदा विभागास उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र हा निधी कमी पडत असल्याने अतिरिक्त १५ हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यासाठी नव्याने कर्ज घ्यावे लागणार आहे. त्यामुळे हे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.
हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील २.८९ लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
या ५२ प्रकल्पांमध्ये विदर्भातील १६ प्रकल्प, मराठवाड्यातील ७ प्रकल्प आणि उर्वरित महाराष्ट्रातील २९ प्रकल्पांचा समावेश राहणार आहे.

About Editor

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचा हल्लाबोल, भाजपाकडून संविधानावरील हल्ला अव्यातपणे सुरु इंडिया ब्लॉकच्या बैठकीत म्हणाले सर्व विरोधी पक्षांनी एकजूटी राहणे आवश्यक असल्याचे आवाहन

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी भाजपप्रणीत केंद्र सरकारवर हल्लाबोल करत लोकशाही संस्थांना कमजोर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *