सरकार प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींचे कर्ज नव्याने घेणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील ३१३ बांधकामाधीन पाटबंधारे प्रकल्पांपैकी ५२ प्रकल्पांसाठी १५ हजार कोटी रूपयांची गरज आहे. हे कर्ज घेण्यासाठी आझ झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
सद्यस्थितीत राज्यातील ३१३ बांधकामाधीन प्रकल्पांवर आहेत. या प्रकल्पांवर ८३ हजार ३०० कोटी रूपयांचा खर्च झालेला आहे. उर्वरित कामासाठी ९३ हजार ५७० कोटी रूपयांची गरज लागणार आहे. राज्य शासनाकडून दरवर्षी १० हजार कोटी रूपयांचा निधी जलसंपदा विभागास उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र हा निधी कमी पडत असल्याने अतिरिक्त १५ हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यासाठी नव्याने कर्ज घ्यावे लागणार आहे. त्यामुळे हे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.
हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील २.८९ लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
या ५२ प्रकल्पांमध्ये विदर्भातील १६ प्रकल्प, मराठवाड्यातील ७ प्रकल्प आणि उर्वरित महाराष्ट्रातील २९ प्रकल्पांचा समावेश राहणार आहे.

About Editor

Check Also

महिला आरक्षण आणि डिलिमीटेशन विधेयकावरून किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांच्यात शाब्दिक चकमक कायद्यांना विनाकारण एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येतोय

महिला आरक्षण विधेयकाला प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (डीलिमिटेशन) प्रक्रियेशी जोडण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या कोंडीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *