नांदगाव – मनमाड विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदारांच्या उमेदवारीला विरोध वाढत असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी थेट अजित पवार यांचे निवासस्थान गाठत आपली कैफियत मांडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा देण्यात यावी या मागणीसाठी जवळपास ४०० ते ५०० कार्यकर्ते देवगिरी या …
Read More »स्वर्गीय माणिकराव गावितांचे सुपुत्र भरत गावित यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिल्या शुभेच्छा...
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नंदूरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित यांनी आज प्रदेश कार्यालयात हा प्रवेश केला. त्यांचे अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पक्षात …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, अर्थव्यवस्थेबाबत गडकरी, मनसे, अर्थतज्ज्ञांकडून चिंता जाहिराती आणि सरकारी कार्यक्रमांवर करदात्यांची करोडो रुपयांची उधळपट्टी
महायुती सरकारने निवडणूकीच्या तोंडावर सुरु केलेल्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर जाहिराती आणि प्रचारासाठी सरकारी तिजोरीतील तकरदात्यांचा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. तसेच तिजोरीकडे न पाहता पुन्हा सत्तेवर येण्यासाठी विविध घोषणा करत जनतेला पैसा वाटत आहे. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था चिंताजनक असल्याचा आरोप करत राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, मनसे आणि …
Read More »काँग्रेसचे बडतर्फ आमदार हिरामण खोसकर यांचा अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश आमदार हिरामण खोसकर प्रचंड मतांनी निवडून येतील - मंत्री छगन भुजबळ
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकूण सहा आमदार आहेत. हिरामण खोसकर आपले सातवे आमदार आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक आमदार असून येणाऱ्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात आठ आमदार निवडून आणू असा विश्वास राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री …
Read More »भाजपाच्या व्होट जिहादमुळे अजित पवार गटाचे उमेदवार धोक्यात निवडणूक आयोगाकडूनही व्होट जिहाद शब्दावर आक्षेप
नवीनकुमार लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रीयस्तरावरील इंडिया आघाडीने भाजपाचा वारू रोखून धरला. त्यामुळे भाजपाने मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी व्होट जिहाद चा मुद्दा निर्माण केला. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला एक गठ्ठा मते दिली. त्याचा फायदा महाविकास …
Read More »आदित्य ठाकरे यांची टीका, महायुतीचे रिपोर्ट नाहीतर गुजरातला पाठवण्याचा डीपोर्ट कार्ड लाडक्या बहिणीला दीड हजारापेक्षा जास्त पैसे देऊ आश्वासन
महायुती सरकारच्या वतीने मागील अडीच तीन वर्षात केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड जाहिर केले. या रिपोर्ट कार्डवरून शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी हे रिपोर्ट कार्ड नसून हे डिपोर्ट कार्ड असल्याची टीका केली. आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभारावर …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा सवाल मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, शिंदे म्हणाले, विरोधी पक्षनेते ठरवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
महायुती सरकार हे काम करणारे सरकार असून महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले आहे. या कामाची पोचपावती आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार महायुतीला देतील,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी व्यक्त केला. मुंबईत बुधवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती ,राष्ट्रवादी महायुतीच्या माध्यमातून निवडणूकीसाठी सज्ज विरोधकांना फक्त टीकाटीपण्णी करण्यात आनंद
निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यातील निवडणूका जाहीर केल्या. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. २०१९ मध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले होते आणि आताही एकाच टप्प्यात महाराष्ट्राचे मतदान होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने… पूर्ण क्षमतेने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट संकेत …
Read More »महायुतीच्या राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला दिलासा देण्यास नकार दिल्याने सर्वोच्च न्यायालयात
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यासंदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही. तसेच याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर निर्णय …
Read More »आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे निर्णय आगरी समाजासाठी महानंडळ, नदी जोड प्रकल्प, शेती महामंडळाची जमिन एमआयडीसीला यासह अनेक निर्णय
राज्यात दसरा सण झाल्यानंतर कधीही विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करणार असल्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. त्यानुसार निवडणूक आचारसंहितेपूर्वीची शेवटची राज्य मंत्रिमंडळाची बैठक असे सांगत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक समाजांना आकर्षित करण्यासाठी नवी …
Read More »
Marathi e-Batmya