भाजपाच्या विचाराचे जे मुळ आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा सातत्याने अपमानच केला आहे. हा प्रकार पूर्वीपासून आजपर्यंत चालत आला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर कारवाई केली जाते मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहूल सोलापुरकरवर सरकार कारवाई का करत नाही? छत्रपतींचा …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार मुख्यमंत्री फडणवीसांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी माहिती लपवली, राज्य सरकारलाही सहआरोपी करा
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रुरपद्धतीने केली, याची गृहखात्याकडे माहिती नव्हती का? असा संपप्त सवाल करत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती लपवली आणि आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता थेट प्रसार माध्यमांना दिली, हा सभागृहाचा अपमान आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर उद्या हक्कभंग आणू, असा इशारा ज्येष्ठ काँग्रेस नेते …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, आरोग्यप्रमाणेच इतर घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? भाजपा युती सरकारमध्ये ६५ टक्के मंत्री दागी; सर्वांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांनी धमक दाखवावी
भाजपा युती सरकारमध्ये तिघांची तीन तोंडे आहेत, हे तिघेजण मलईसाठी व पालकमंत्रीपदासाठी भांडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागातील कंत्राटाला स्थगिती देऊन घोटाळ्याची चौकशी करत असल्याचे समजते. शिंदे सरकारच्या काळात असे अनेक घोटाळे झाले आहेत, त्या सर्वांना स्थगिती देऊन चौकशी करण्याची धमक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावी, असे आव्हान …
Read More »नवनियुक्त प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा उद्या मंगळवारी पदग्रहण सोहळा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता सोहळा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा उद्या मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ हे नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतील. या कार्याक्रमात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय …
Read More »नाना पटोले यांची टीका, शेतकऱ्यांना म्हणणारे भाजपा युतीचे सरकारच भिकारी एक रुपयात पीक विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करते काय?
भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे वारंवार उघड झाले आहे. शेतकऱ्याला अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून त्यांचा अपमान केला आता राज्यातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. कोकाटे यांचे शेतकऱ्यांबद्दलचे विधान सत्तेचा माज आल्याचे दर्शवते. शेतकरी भिकारी नाही तर शेतक-यांसह सर्वसामान्य …
Read More »महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी सर्वोदयी हर्षवर्धन सपकाळः कोण आहेत सपकाळ तर विधानसभेच्या काँग्रेस गटनेते पदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने या पराभवाची जबाबदारी स्विकारून नाना पटोले यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरु झाली होती. तसेच नाना पटोले यांच्याऐवजी यापुढे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी नव्य़ा व्यक्तीची निवड केली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. आज अखेर बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार आहे? महिनाभरात ८ मृत्यू होऊनही राज्य सरकारला जीबीएस आजाराचे गांर्भीय नाही
राज्यात जीबीएस GBS चा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आणि या एका महिन्यात या आजाराने ८ मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडू लागले आहे परंतु राज्य सरकार मात्र या आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, कृषी मंत्रालयाचा आणखी एक घोटाळा महायुती सरकारमधील कृषी खात्यातील घोटाळ्यावर सरकार गप्प का?
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काळातील कृषी विभाग हा शेतकऱ्यांसाठी नाही तर अधिकारी व मंत्री यांचे खिसे भरण्यासाठीच काम करत होता असे विविध घोटाळ्यांवरून दिसत आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानावर पुरवल्या जाणाऱ्या कीटकनाशक खरेदीतही गैरव्यवहार करण्यात आला आहे. २५.१२ कोटी रुपयांच्या खरेदीत २०.६७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. …
Read More »नाना पटोले यांची मागणी, सोमनाथ सुर्यवंशींची हत्या करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करुन गुन्हे दाखल करा परभणीत कोंबिंग ऑपरेशनचे आदेश मंत्रालय व पोलिस महासंचालकांच्या कार्यालयातून कोणी दिले त्याची चौकशी करून कारवाई करा
परभणी व बीड प्रकरणी पोलिसांच्या मदतीने लोकांचे जीव घेतले गेले. परभणीतील आंबेडकरी अनुयायी सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांच्या मारहणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सरकारने अजून त्या पोलिसांवर कठोर कारवाई केलेली नाही. संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीत कोंबिंग ऑपरेशन करून निरपराध लोकांना बेदम मारहाण करण्यात आली. या कोंबिंग ऑपरेशनचे आदेश कोणी दिले? मंत्रालय …
Read More »नाना पटोले यांनी कागदपत्रे दाखवत मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले चौकशीचे आव्हान कृषी विभागातील भ्रष्टाचारांची सखोल चौकशी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवावे.
देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना भाजपा युतीचे सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवर मात्र कृषी विभागातील अधिकारी व मंत्री संगनमताने खिसे भरत राहिले. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने नॅनो युरीया व नॅनो डीएपी …
Read More »
Marathi e-Batmya