Tag Archives: मुंबई महानगरपालिका

उद्धव ठाकरे- राज ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे राजकारणाची समिकरणे बदलणार ? आज उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर

राज्यातील राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळणार असल्याची चर्चा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या भूवया उंचावल्या आहेत. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. या राजकीय …

Read More »

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची २१ नेत्यांची टीम शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आलेली आहे. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २१ शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ही मुख्य कार्यकारी समिती पुढीलप्रमाणे असेल. आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात …

Read More »

आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपा अध्यक्षपदी नियुक्ती पक्ष नेतृत्वाने विश्वास दाखवल्याबद्दल आणि संधी दिल्याबद्दल मानले आभार

बीएमसी निवडणुकीपूर्वी अंधेरी (पश्चिम) येथील भाजपा आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईसाठी पक्षाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे आमदार अमित साटम यांनी सांगितले. आमदार अमित साटम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

मंगलप्रभात लोढा यांचे आदेश, मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे आपत्ती व्यवस्थापन विभागात घेतला मुंबईतल्या स्थितीचाआढावा

गेले तीन दिवस मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाचा वाढता जोर पाहता, आपत्ती विभागाने सज्ज राहावे असे निर्देश त्यांनी या यावेळी विभागाला दिले. मंत्री मंगलप्रभात …

Read More »

सचिन सावंत यांची मागणी, मुंबई महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या निविदांची चौकशी करा मुंबई महापालिकेतील जलशुद्धीकरण प्रकल्प निविदा प्रक्रिया म्हणजे भ्रष्टाचाराचा महाघोटाळा

मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांतील निविदा प्रक्रियेमध्ये भीषण भ्रष्टाचार घडत असून, ही संपूर्ण यंत्रणा दलालांच्या प्रभावाखाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. विशेषतः भांडुप कॉम्प्लेक्स (२००० MLD) व पांजापूर (९१० MLD) जलशुद्धीकरण प्रकल्पांसंदर्भातील निविदा प्रक्रियेतील धक्कादायक बाबी सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. भ्रष्टाचाराचे अड्डे– मंत्रालय आणि मनपा कार्यालये? सचिन …

Read More »

आशिष शेलार यांचा आरोप, उबाठाकडून मुंबईकरांशी १ लाख कोटींची बेईमानी मुंबई महापालिका आयुक्तांना भेटून श्वेतपत्रिकेची मागणी

गेल्या २० वर्षात मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पुर परिस्थिती नियंत्रण, नाले बांधकाम, ब्रिमस्टोवँड यासाठी सुमारे १ लाख कोटी खर्च केले तरीही मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही? याचे उत्तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी द्यावे अशी मागणी करत ही १ लाख कोटींची मुंबईकरांशी उबाठाने केलेली बेईमानी आहे, असा थेट आरोप …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची आशा, उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून ‘बेस्ट’ व्हावे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठक

मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून ‘बेस्ट’ची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होण्यासाठी ‘बेस्ट’ने अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरविण्यासोबत स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर …

Read More »

उच्च न्यायालयाचे आदेश, जैन मंदिराच्या उर्वरित बांधकामावर कारवााई नको महापालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती

विर्लेपार्ल्यातील जैन मंदिराचे उर्वरित बांधकामावर पाडकाम कारवाई करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच मुंबई महानगरपालिकेला दिले. श्री १००८ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने महानगरपालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ट्रस्टने महानगरपालिकेच्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात दोन अपील दाखल केली असून न्या. गौरी गोडसे यांच्या एकलपीठापुढे त्यावर नुकतीच सुनावणी झाली. …

Read More »

समुद्राच्या गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

समुद्राच्या पाण्याचे विलोपन (Desalination) हा प्रकल्प मुंबईसाठी हाती घेतला असून या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य राजहंस सिंह यांनी उपस्थित केलेल्या मुंबई शहर व उपनगरातील पाणीपुरवठाविषयी लक्षवेधीला सूचनेला उत्तर देताना उदय सामंत बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले,मुंबईतील वाढत्या पाणीटंचाईला …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या २ लाख कोटींच्या प्रकल्पांचा घेतला आढावा हाजीअली येथे २ हजार क्षमतेचे वाहनतळ उभारा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सुमारे १ लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या नाले सफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विधानभवनात झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ …

Read More »