Tag Archives: वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड यांची टीका, ८० कोटी लोकांना मोफत धान्य, भाजपा सरकारने कोणाचा विकास केला? मागील ११ वर्षात देशात गरिब व श्रीमंत दरी वाढली; भाजपा सरकारचा विकास फक्त मुठभर श्रीमंतांसाठी

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशात ८० कोटी तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ७६.३२% आणि शहरी भागात ४५.३४% लोकसंख्या लाभार्थी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गरिब लोक आहेत तर मग ११ वर्षात कोणाचा विकास झाला? असा प्रश्न उपस्थित करत भाजपा सरकारच्या काळात फक्त मुठभर लोकांचा विकास झाला असून बहुसंख्य जनता ही गरिबीचे जीवन जगत आहे, विकासाच्या फक्त …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी , फ्रेंच कंपनी सिस्ट्राने एमएमआरडीएवर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करा पारदर्शक चौकशीसाठी महानगर आयुक्तांसह वरिष्ठ एमएमआरडीए अधिकाऱ्यांची बदली करा

भाजपा युतीच्या काळातील भ्रष्टाचाराचे विक्रम दररोज उघड होत आहेत. आता फ्रेंच अभियांत्रिकी कंपनी सिस्ट्राने मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणातील (MMRDA) अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एमएमआरडीएवरील हे आरोप अत्यंत गंभीर असून यामुळे मुंबईची जगभरात नाच्चकी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारावर खुलासा करावा व  आरोपांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी …

Read More »

१० वीचा पेपर फुटला, पुणे मंडळ म्हणते, वृत्त चुकीचे बोर्डाच्या परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यात सरकार व शालेय शिक्षण विभाग अपयशी?

१० वी च्या परिक्षेला आज सुरुवात झाली,मात्र या १० वी परिक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची घटना घडली. पेपर सुरु झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तर पत्रिकेच्या छायाकिंग प्रत काढून विद्यार्थ्यांना पुरविल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. जालन्यात हा प्रकार घडल्यानंतर यवतमाळ येथेही असाच प्रकार घडला. त्यामुळे विद्यार्थी आणि …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, राहुल गांधी, सुनिल केदार आणि माणिकराव कोकाटेंना वेगवेगळा न्याय का? कोकाटेंची आमदारकी तात्काळ रद्द करा

भारतीय जनता पक्ष लोकशाही व संविधानाला डावलून काम करत आहे. स्वतःला एक न्याय व विरोधकांना दुसरा न्याय अशी भाजपाची लोकशाहीविरोधी भूमिका आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी व सुनील केदार यांच्या बाबतीत जो न्याय लागू केला गेला तोच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत लागू केला पाहिजे. न्यायालयाने दोषी ठरवल्याने माणिकराव कोकाटे …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, रेल्वे तिकिटातील ज्येष्ठ नागरिकांची सवलत पुन्हा सुरु करा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून निवेदनाचे दिले पत्र

भारतीय रेल्वेमध्ये मार्च २०२० पर्यंत ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत मिळत होती मात्र ही सवलत कोरोना काळात बंद करण्यात आली. आता कोरोनाचे संकट संपून तीन वर्षे झाली तरी अद्याप ही सवलत सुरु केलेली नाही. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात दिलेली सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, ४०० वर्षांचे चिंबई गावठाण झोपडपट्टी कसे? मुंबईच्या गावठाण आणि कोळीवाड्यांची ओळख नष्ट करण्याचे भाजपा युती सरकाचे षडयंत्र

राज्यातील भाजपा युती सरकार हे लाडक्या बिल्डर मित्रांसाठी काम करते हे नवे नाही पण उद्योगपती, बिल्डर धार्जिणे भाजपा युती सरकार आता भूमिपुत्रांच्या हक्कावर गदा आणत आहे. एका बिल्डर मित्राच्या फायद्यासाठी वांद्र्यातील ४०० वर्षे जुन्या चिंबई गावठाणला झोपडपट्टी घोषित करण्यात आले आहे. मुंबईच्या भूमिपुत्रांना बेदखल करण्याचे हे षडयंत्र असून बिल्डर मित्रांच्या …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी,… गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांचे पूनर्वसन वांद्र्यातच करा वांद्र्यातील रहिवाशांचे मालाड-मालवणीत पुनर्वसन का? ३०५ चौरस फुटांची घरे देण्याच्या हमीचे काय झाले?

मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन वास्तूचा प्रकल्प वांद्रे शासकीय वसाहतीत उभारला जात आहे. या प्रकल्पाला कुठलाही विरोध नाही. मात्र, गेल्या ५० वर्षांपासून येथे राहणाऱ्या रहिवाशांवर आणि व्यावसायिकांवर अन्याय करु नका. स्थानिकांचे पुनर्वसन वसाहतीतच किंवा जवळच्या परिसरातच करावे आणि या मागणीवर निर्णय होईपर्यंत PAP सदनिकांची वाटप प्रक्रिया आणि सोडत कार्यक्रमाला स्थगिती द्यावी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अर्थसंकल्पात बिहारचा उल्लेख पण मुंबई व महाराष्ट्राच्या… भाजपा सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प आघाडी सरकार वाचवण्यासाठी केलेली धडपड

भाजपा आघाडी सरकारचा अर्थसंकल्प हा आघाडी सरकार वाचवण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आला आहे. संपूर्ण अर्थसंकल्पात फक्त बिहारचीच चर्चा करण्यात आली असून मुंबई व महाराष्ट्राचे नाव एकदाही घेतले गेले नाही. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी निराशाजनक असून मुंबई व महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, … काम सुरु नाही, पुलाचे काम तातडीने सुरू करा मुंबईची लाईफलाईन बनली 'डेथलाईन', लोकल अपघातात दररोज होणारे मृत्यू थांबवण्यासाठी तत्काळ पावले उचला

भाजपा युती सरकारचा सर्वसामान्य मुंबईकरांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे. पुनर्बांधणीसाठी सायन पूल बंद करून ५ महिने उलटले तरी अजून काम सुरू झालेले नाही, त्यामुळे स्थानिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक व शाळकरी मुलांना अरुंद आणि असुरक्षित पदपथावरून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. स्थानिक मुंबईकरांचे होणारे हाल रेल्वे प्रशासन, बीएमसी व …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, … शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही याची जबाबदारी कोणाची?

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्याच पक्षाच्या माजी मंत्र्याने घेतलेले निर्णय रद्द करण्याची कृती हे उशिरा आलेले शहाणपण आहे. दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी होते. केसरकरांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ हा हट्ट कशासाठी धरला होता? कोणाच्या फायद्यासाठी? यामागील ‘अर्थपूर्ण’ कारण काय? असे सवाल …

Read More »