मुंबईतील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमधून मुंबईकरांना होणारा त्रास हा महायुती सरकारच्या धोरण लकव्यातून होत असून निवडणुकीपूर्वी मतदानाचा रतीब मिळवण्यासाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले आहे हे दिसत येत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन न करता अविचाराने निवडणुकीपूर्वी लोकांना भुलवण्यासाठी घेतलेले निर्णय आता सरकारला पूर्ण करता येत नसल्याने तिकडमबाजीचा वापर …
Read More »सचिन सावंत यांचा सवाल, १०० स्मार्ट सिटी कुठे आहेत दाखवा स्वप्नांचे व्यापारी देवेंद्र फडणवीस- दुबई सारखे शहर बनवण्याआधी १०० स्मार्ट सिटी कुठे आहेत ते दाखवा
काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले होते की मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेसारखे आहेत. नुकतेच केंद्रीय मंत्री @nitin_gadkari जी म्हणाले की दोन वर्षांमध्ये भारतात अमेरिकेसारखे रस्ते होतील. आता मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी म्हणतात की एमएमआर मध्ये दुबई पेक्षा मोठे सुंदर शहर वसवू. भाजपा नेत्यांना माहीत आहे की महाराष्ट्रातील ९०% …
Read More »सचिन सावंत यांची राज्य सरकारवर टीका, मनोरंजक निर्णय पशुवाहतूकी विरूद्ध फक्त पोलिसच कारवाई करू शकतात, नागरिक तक्रार करू शकतात
कुरेशी समाजाने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अत्यंत मनोरंजक निर्णय घेण्यात आला आहे की यापुढे बेकायदेशीर पशुवाहतूकीविरुध्द केवळ पोलिसच कारवाई करु शकतात. दुसरीकडे नागरिक तक्रार करु शकतात असेही म्हणतात. याचा अर्थ वाहतूक थांबवण्याचा किंवा तक्रारी व्यतिरिक्त कोणतीही कारवाई करु शकणार नाहीत. पण पोलिसांव्यतिरिक्त जर कोणी व्यक्ती किंवा संस्था तक्रारी व्यतिरिक्त इतर …
Read More »सचिन सावंत यांची मागणी, मुंबई महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या निविदांची चौकशी करा मुंबई महापालिकेतील जलशुद्धीकरण प्रकल्प निविदा प्रक्रिया म्हणजे भ्रष्टाचाराचा महाघोटाळा
मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांतील निविदा प्रक्रियेमध्ये भीषण भ्रष्टाचार घडत असून, ही संपूर्ण यंत्रणा दलालांच्या प्रभावाखाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. विशेषतः भांडुप कॉम्प्लेक्स (२००० MLD) व पांजापूर (९१० MLD) जलशुद्धीकरण प्रकल्पांसंदर्भातील निविदा प्रक्रियेतील धक्कादायक बाबी सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. भ्रष्टाचाराचे अड्डे– मंत्रालय आणि मनपा कार्यालये? सचिन …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीने काँग्रेसच्या नेत्यांकडून आश्चर्य आणि समाधानही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मी तर सतेज पाटील यांचे नाव सुचविले होते
राज्यातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांच्या जागी नव्या व्यक्तीची निवड करण्याची चाचपणी काँग्रेसकडून करण्यात येत होती. मात्र राज्याच्या राजकारणात फारसे परिचित नसलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांची निवड काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदी केली. त्यामुळे काँग्रेसमधील मुरब्बी नेत्यांबरोबरच तरूण नेत्यांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष पदासाठी …
Read More »सचिन सावंत यांचा सवाल,…निवडणूक आयोग काय झोपला आहे का? भाजपा युतीकडून साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर, प्रचार संपल्यानंतरही भाजपा नेते विरारमध्ये काय करत होते
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. लोकशाही व संविधानाचा गळा घोटून सत्ताधारी पक्ष साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर खुलेआमपणे करत आहेत. सर्वात आश्चर्याची व गंभीर बाब म्हणजे हे सर्व घडत असताना पोलीस दल व निवडणूक आयोग काय झोपा काढत आहे का? असा सवाल करून भाजपा नेते विनोद …
Read More »पवन खेरा यांची टीका, …धोकेबाजी केलेल्या खोके व धोके सरकारचे शेवटचे १५ दिवस काँग्रेसच्या योजनांबद्दल खोटी जाहिरबाजी करणाऱ्या भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारने अडीच वर्षात महाराष्ट्राची लूट केली आहे. भाजपा सरकारचे भ्रष्टाचाराचे विक्रम पाहता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डलाही लाज वाटेल. टक्केवारी व कमीशनखोरी करुन खिसे भरण्याचे काम या सरकारने केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला धोका देणाऱ्या धोकेबाज व खोकेबाज सरकारचे शेवटचे १५ दिवस …
Read More »सचिन सावंत यांचा सवाल, शेलार व फडणवीसजी, मुंबईला दुसरे वित्तीय केंद्र आणण्याचे काय झाले? केंद्र सरकारसाठी फक्त गुजरातच ‘लाडके राज्य’, नरेंद्र मोदींच्या आदेशाला शिंदे व फडणवीसांची साथ
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण मागील १० वर्षांपासून केंद्र सरकारसाठी एकमेव लाडके राज्य गुजरात आहे. मोदी शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला पळवले व त्याला शिंदे, फडणवीस या नेत्यांनी साथ दिली. शिंदे, फडणवीसांनी गुजरातसाठी काम करून महाराष्ट्राचे हित उद्धवस्त करण्याचे पातक केले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या टाटा एअर बस …
Read More »काँग्रेसची ४थी यादी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणाः काँग्रेस-शिवसेना उबाठा समोरासमोर सोलापूरात शिवसेनेचा उमेदवार आणि काँग्रेसचाही उमेदवार
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने काल जाहिर केलेल्या यादीनंतर आज संध्याकाळी पर्यंत चवथी यादी जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. त्यानुसार १४ उमेदवारांची यादी रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान काँग्रेसने जारी केली. काँग्रेसने यावेळी अंमळनेरमधून डॉ अनिल नाथू शिंदे यांना उमेदवारी जाहिर केली असून …
Read More »काँग्रेसची १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहिर माणिकराव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी तर प्रवक्ते सचिन सावंत यांना संधी
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून रात्री उशीरा १६ उमेदवारांची यादी जाहिर केली. या उमेदवारी यादीत माजी मंत्री तथा आमदार माणिकराव ठाकरे यांना पुन्हा एकदा विधानसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांना पहिल्यांदा अंधेरीतून उमेदवारी जाहिर करण्यात आली. याशिवाय असिफ झकेरीया, दिलीपकुमार सानंदा यांनाही उमेदवारी जाहिर करण्यात …
Read More »
Marathi e-Batmya