Tag Archives: aslam shaikh

मत्स्य व्यवसायात उपाय सुचविणाऱ्यांसाठी ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ मंत्री नवाब मलिक, अस्लम शेख यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ उपक्रमाचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते आणि मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. मत्स्य व्यवसाय विभागातील समस्या …

Read More »

दररोज १५ लाख लोकांना लस देण्याची तयारी नागरिकांच्या आरोग्याच्या हित जपले जाईल कोणतीही उणीव भासू देणार नाही- मुख्यमंत्री ठाकरे

 मुंबई : प्रतिनिधी तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे, जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्णसंख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज १५ लाख लसीकरणाची तयारी असल्याचे स्पष्ट केले. …

Read More »

मुंबईतल्या मच्छीमार बांधवांसाठी जीआर बदला पण मदत करा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांचा आक्रोश सरकारने समजून घेऊन सध्याच्या जीआर मध्ये बदल करून मच्छिमार बांधवांना मदत करणे आवश्यक आहे, असे मत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ देऊन हा मच्छीमारांचा आक्रोश समजून घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. चक्रीवादळामुळे …

Read More »

… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द खरे ठरतायत : मल्लीकार्जून खरगे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसाच देशाला तारणार : नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवसरात्र एक करून देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले. परंतु आज लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. विद्यमान सत्ताधा-यांकडून लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून राज्य कारभार सुरु आहे. मागील काही वर्षात दलित, अल्पसंख्यांकांवर अत्याचार वाढले आहेत. प्रसार माध्यमांनाही बोलण्याची मोकळीक नाही. सीबीआय, ईडी, निवडणूक …

Read More »

१ फेब्रु.पासून या वेळेतच सर्वांना लोकल प्रवास करता येणार कार्यालयीन वेळा बदलण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सूचना

मुंबई : प्रतिनिधी कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यानुसार सर्वसामान्य नागरीकांसाठी लोकलने प्रवास करण्याच्या वेळा निर्धारीत करण्यात आल्या असून तीन टप्प्यात …

Read More »

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांचे घुमजाव म्हणे प्रसारमाध्यात आलेल्या बातम्यांवर प्रतिक्रिया देत नाही

मुंबईः प्रतिनिधी आगामी मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस एकट्याने लढविणार असल्याची घोषणा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी काँग्रेसच्या स्थापना दिन आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष अशोक भाई जगताप यांच्या पदग्रहणानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली होती. मात्र त्याबाबत आज पुर्णतः घुमजाव करत प्रसारमाध्यमात आलेल्या वृत्तावर आपण भाष्य करत नसल्याचे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. …

Read More »

काँग्रेसचा महाविकास आघाडीपासून फारकतीचा शिवसेना-राष्ट्रवादीला इशारा स्वतंत्र निवडणूकीचा नारा देत सरकार पडले तर जबाबदारी आमची नाही

मुंबई : प्रतिनिधी एकाबाजूला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणूका आघाडी एकत्रितपणे लढवेल असे जाहीर केलेले असताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी काँग्रेस स्वतंत्र लढविणार असल्याची घोषणा केली. तर माजी आमदार नसीम खान यांनी सरकार पडले तर जबाबदारी आमची नसल्याचे सांगत महाविकास आघाडीतून फारकत घेण्याचा इशारा शिवसेनाला …

Read More »

राज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट कौशल्य विकास दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

मुंबई : प्रतिनिधी मत्स्य कातडीपासून वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन उद्योग सुरू करण्याला प्रोत्साहन देण्याचा राज्यात पहिल्यांदाच प्रयोग करण्यात येत असून फिश- ओ-क्राफ्टद्वारे रोजगार निर्मिती हा राज्यातील पहिला अभिनव उपक्रम आहे. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विकास विभागाने उचललेले हे क्रांतीकारी पाऊल आहे. यामुळे नवयुवक आणि मच्छिमार महिलांना नवीन उद्योग व रोजगार प्राप्ती …

Read More »

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभुमीवर गर्दी नको, घरातूनच अभिवादन करा अभिवादन, मानवंदनेचे थेट प्रक्षेपण; ऑन-लाईन माध्यमातून दर्शन

मुंबई : प्रतिनिधी महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून या अनुयायांनी आपल्या कृतीतून …

Read More »

सरकार देणार मच्छिमारांना १० ते ३० हजाराचे आर्थिक सहाय्य राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या “क्यार”  व  “महा” या दोन चक्रीवादळामुळे मच्छीमारांना मासेमारी न करता आल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल ६५ कोटी १७ लाख इतके विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. रापणकार संघाचे सभासद असणाऱ्यांना प्रति सभासद १० हजार रुपये असे ४ हजार १७१ सभासदांना ४ …

Read More »