Tag Archives: bjp

नाना पटोले यांची टीका, अत्याचाराला सरकारच जबाबदार, बहिणींना सुरक्षेची गरज सावित्रीबाईंच्या कर्मभूमीतच महिला असुरक्षित, महिला सुरक्षा वाऱ्यावर आणि शासन व प्रशासन भ्रष्टाचारात मग्न

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेलेली आहे. शासन व प्रशासनात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे, त्यांना फक्त मलई खाण्यात जास्त रस असल्याने जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही. राज्यात मुली व महिला सुरक्षित नाहीत हे सातत्याने होत असलेल्या घटनांवरून दिसत आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे महिला असुरक्षित आहेत पण सरकारने याची जबाबदारी घेऊन गुन्हेगारांवर कडक …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेला मंजूरी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेला (PM-RKVY) मंजुरी दिली, ज्याचे उद्दिष्ट शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि कृषोन्नती योजनेला (KY) स्वयंपूर्णतेसाठी अन्न सुरक्षा प्राप्त करण्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या एकत्रित प्रस्तावित खर्चासह आहे. कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, दोन योजना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देतील ज्यात …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, आचारसंहिता, ..नाहीतर गणितं बिघडवणार मराठा समाजाला डावलू नका नाही तर पश्चाताप करायची वेळ येईल

राज्यातील मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाबाबत विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी निर्णय घेण्याचे आवाहन मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना केले. जर राज्य सरकारने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर तुमची सगळी गणितं बिघडवणार असल्याचा इशाराही आज मनोज जरांगे पाटील …

Read More »

गोंडवाना विद्यापीठाची सुधीर मुनगंटीवार यांना मानद डी. लिट. पदवी प्रदान गोंडवाना विद्यापीठाचा ११ वा व १२ वा दीक्षांत सोहळा संपन्न

शिक्षण ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षांत सोहळा राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर …

Read More »

सनातन रक्षक दलाने मंदिरातून साईबाबाच्या मुर्ती हटवल्या साई बाबाची पूजा म्हणे शास्त्रानुसार निषिध्द

‘सनातन रक्षक दल’ या गटाने सुरू केलेल्या मोहिमेनंतर मंगळवारी वाराणसीतील अनेक मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या. यापैकी या गटाने येथील बडा गणेश मंदिरातील साईबाबांची मूर्ती काढून मंदिराच्या आवाराबाहेर ठेवली. मंदिराचे मुख्य पुजारी राममू गुरू म्हणाले, साई बाबांची योग्य ज्ञानाशिवाय पूजा केली जात होती, जी शास्त्रानुसार निषिद्ध आहे. त्याचप्रमाणे, अन्नपूर्णा मंदिराचे …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा टोला, भाजपाने लढण्याआधीच हार मानली… २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मविआचेच सरकार येणार-नाना पटोले

धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांनी गांधी विचार व गांधीजींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करावा. सर्वांनी आपापसात न भांडता भाईचारा जपावा. इराण व इस्राईलमध्ये आज जे सुरु आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अशावेळी गाधींजींनी घालून दिलेला आदर्श व अहिंसेचा मार्गच महत्वाचा ठरतो, जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गांधींजींनी घालून …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, क्रिमीलेयरच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा डाव आरक्षण वाचवायचे असेल, तर 'वंचित'ला सत्तेत निवडून द्या

शिकलेल्या वर्गाला मग तो डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, वकील किंवा खासगी कंपनीत काम करणारा असेल यातील ज्यांनी लाभ घेतला आहे, त्यांना आरक्षण या पुढे मिळणार नाही. या मताचे आपण आहात का ? नसाल, तर या निवडणुकीत जोरदारपणे मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला मत द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष …

Read More »

पूरग्रस्त राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार

पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने आज जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला १४९२ कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या १४ राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या …

Read More »

भाजपातर्फे मुंबईत यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन पारंपरिक मराठी पेहरावात मराठी दांडीयाचा आनंद घ्यायला सर्वांनी आवर्जून हजेरी लावा

भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही सलग तिस-या वर्षी भव्य मराठी दांडीयाचे काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा,महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ आणि सुप्रसिद्ध गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये …

Read More »

हक्क मागतोय महाराष्ट्र… राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मोहीम महायुती सरकारच्या गलथान कारभारांची चार्जशीट तयार, ती लोकांमध्ये मांडू-जयंत पाटील यांची माहिती

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षातर्फे ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, आ. सुनील भुसारा, मा. आ. पांडुरंग बरोरा व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी या मोहिमेबाबत अधिक …

Read More »