Tag Archives: bjp

आशिष शेलार यांची खोचक सवाल, उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पहायला गेलेत का? उद्धव ठाकरे यांच्या परदेश वारीवरून केली टीका

पश्चिम उपनगरातील नालेसफाईची आज तिसऱ्या दिवशी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचे यावेळी नमूद करत उध्दव ठाकरे कुठे आहेत? लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का? असा खोचक सवाल अॅड आशिष शेलार यांनी केला. मुंबईतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, पुणे नंतर आता नागपूरात ड्रंक अँड ड्राईव्ह, कडक कारवाई करा आरोपीच्या गाडीत दारूच्या बाटल्या आणि अंमली पदार्थ

पुणे येथील कल्याणीनगर येथे दाऊ पिऊन पोर्शे कार सुसाट चालवित दोघांचा निष्पाप बळी घेतल्याचे प्रकरण अद्याप ताजे असताना आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरातच आणखी एक ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल,… गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का नाही? देवेंद्र फडणविसांच्या सत्ताकाळात महाराष्ट्र, राज्यातील जनता व कायद्याचे रक्षकही असुरक्षित

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. २०१४ पासून गृहमंत्रालय सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याला लाभलेले सर्वात निष्क्रीय व बेजबाबदार गृहमंत्री आहेत. पुण्यात दोन तरुणांना कारखाली चिरडून मारले जाते, जळगावातही तसाच प्रकार घडतो आणि आता कायद्याचे रक्षक असलेले तहसिलदार यांच्यावर भरदिवसा हल्ला होतो, गृहविभाग काय करतो, …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, पुणे आपघातातील आरोपीला कोण वाचवतय? गृहमंत्र्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत

पुणे अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्यांनी फोन केला होता. वकील तिथे कोणी पाठवला, त्या आरोपीला इतक्या पटकन बेल कशी मिळाली, या सगळ्याची उत्तरे राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले पाहिजेत. इतके असंवेदनशील सरकार हे आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी …

Read More »

डोंबिवलीतील बॉयलरच्या लागोपाठ स्फोटात सात जणांचा मृत्यू तर ४८ जण जखमी ठाणे महापालिकेची माहिती

एकाबाजूला वातावरणातील उष्णतेने आधीच हैराण असलेल्या नागरिकांना विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली परिसरातील डोंबिवलीतील एमआयडीसी-२ मधील अनुदान कंपनीच्या बॉयलरच्या झालेल्या स्फोटाच्या घटनेत दोन महिला आणि पाच पुरुष अशा किमान सात जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेने २३ मे रोजी दिली. स्फोटानंतर दुर्घटनेच्या ठिकाणी काही कामगार …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, राज्याची प्रगती, तरुणांचा रोजगार दुसऱ्याच्या घशात महाराष्ट्रात येऊ घातलेला अजून एक प्रकल्प परराज्यात

महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे अनेक प्रकल्प यापूर्वीच परराज्यात गेले असताना आता अजून एक प्रकल्प परराज्यात गेल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमान पत्राने दिलेल्या बातमीने समोर आल्याचे ट्विट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत याबाबत राज्य सरकारला दानवे यांनी जाब विचारला. तसेच राज्यात येणारी गुंतवणूक कमी होत असल्यामुळे राज्य अधोगतीला जाते …

Read More »

आशिष शेलार यांचा सवाल, खाजगी डम्पिंग ग्राउंड आँडिट झाले का? मोगरा आणि इर्ला नाल्याच्या सफाईची पहाणी

नाल्याचा गाळ वसईतील ज्या खाजगी डंम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो आहे, त्याचे ऑडिट करण्यात आले आहे का? असा सवाल करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील नालेसफाई बाबत असमाधानी असल्याचे आज सांगितले. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज दुसऱ्या दिवशी पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाचा …

Read More »

आशिष शेलार यांची मागणी, मुंबईपालिका आयुक्तांनी नाल्यावर येऊन पहावं

मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामात निष्काळजीपणा दाखवत आहे. त्यामुळे पालिकेने ७५ टक्के नालेसफाई कामांबाबत केलेले दावे हे खोटे व रतन खत्रीचे आकडे आहेत. या नालेसफाई कामांबाबत आपण असमाधानी आहोत, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आयुक्तानी नाल्यावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले. नालेसफाईच्या …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना पत्र,.. ४ जूनला जल्लोष करू

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या व महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी (ता.२०) पार पडले. मतदान झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार व्यक्त करणारे पत्र भाजपा कार्यकर्त्यांना लिहिले आहे. घरदार विसरून, अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपा कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात चंद्रशेखर बावनकुळे यांनी, …

Read More »

शरद पवार आणि संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री पदावरून परस्परविरोधी दावे

महाराष्ट्रातील लोकसभा मतदानाची प्रक्रिया संपत येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांसारख्या विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) नेत्यांकडून जाहिरपणे अलीकडच्या राजकीय भूतकाळात मुख्यमंत्री पदावरून परस्पर दावे करण्यात येत आहेत. संजय राऊत यांनी रविवारी दावा केला की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »