छत्तीसगड मध्ये सध्या विधानसभा निवडणूकांत काँग्रेस विरूध्द भाजपा असा सामाना दिवाळीतही चांगलाच रंगलेला असताना भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील प्रचार सभेत काँग्रेस मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना महादेव बेटींग अॅपकडून ५०० कोटी रूपये देण्यात आल्याचा आरोप करत तसा व्हिडिओही व्हायरल केला होता. त्यावरून काँग्रेसनेही एक भूपेश बघेल यांचाच एक व्हिडिओ …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राहुल गांधी यांच्यावर “मुर्खों के सरदार ” म्हणून टीका
मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणूकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचाराच्या निमित्ताने भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे सातत्याने प्रचारसभा घेत आहेत. तर काँग्रेसकडून राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, प्रियंका गांधी वड्रा यांच्या प्रचारसभा होत आहेत. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रत्युत्तर, काही काळ जाऊ द्या वडेट्टीवारच सांगतील वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर बोलताना बावनकुळे यांचे प्रत्युत्तर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर एकाबाजूला आजारी असल्याचे ट्विट करत कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे ट्विटद्वारे अजित पवार यांनी जाहिर केले. मात्र त्यास ४८ तासांचा अवधी लोटत नाही. तोच अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटी घेऊन दिल्लीला भाजपाचे नेते अमित शाह …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांच्या खात्याचे कौतुक
पीएम कुसुम योजनेत देशात पहिले स्थान पटकावून महाराष्ट्राने शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीतील आपली बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला आहे. हे राज्य बळीराजाचे असून त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त करून राज्याच्या ऊर्जा विभागाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राने सुमारे ७१ हजार ९५८ सौर पंप …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावेळेचा तेलंगणातील तो व्हिडिओ व्हायरलः काँग्रेसची टीका
तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत माढिगा समाजाच्या आरक्षण वर्गिकरणाच्या मागणीसह तेलंगणाच्या विकासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत होते. नेमके त्याच वेळी एका तरूणीने सभास्थळी असलेल्या वीजेच्या खांबावर चढून पंतप्रधान मोदी यांचे खऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय …
Read More »विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सुतोवाच; जनतेला अपेक्षित निर्णय देणार… सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही विधानसभाध्यक्षांची सूचक विधान
राज्यातील शिवसेनेतील फुटीनंतर दाखल झालेल्या अपात्र आमदार याचिकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जवळपास दोनवेळा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारत त्यांच्या कामाच्या जबाबदारीची आठवण करून दिली. परंतु विधानसभाध्यक्ष तथा कुलाब्याचे आमदार असलेल्या राहुल नार्वेकर यांनी जनतेला अपेक्षित असलेला निर्णय देणार असल्याचे सांगत शेवटी लोकशाहीत बहुमताला महत्व असल्याचे सांगत अपात्र आमदार याचिकेप्रकरणी निकाल काय …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन, SC मध्ये मादिगा समाजाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार
सध्या पाच राज्यांपैकी एक राज्याच्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर दुसऱ्याबाजूला चार राज्यांमधील निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या चार पैकी तेलगंणा राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचारासाठी भाजपाच्या विश्वरूप महासभेला संबोधित करताना राज्यघटनेच्या समितीत दलित अर्थात अनुसूचित जाती (SC) च्या आर्थिक उन्नतीसाठी योग्य त्या सुधारणा करण्यात येणार …
Read More »उद्धव ठाकरे यांची टीका, खोकं रिकामं झालं असेल म्हणून डबड आणून ठेवलं
ठाणे शहरालगत असलेल्या मुंब्रा येथील शिवसेना शाखेची इमारत शिंदे गटाने पाडल्यानंतर त्या जागेवर शिंदे गटाने त्या जागेवर दावा करत तेथे कंटेनर ठेवत शिंदे गटाची शाखा सुरु केली. मुंब्र्यातील जागा परत मिळविण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दौरा केला. मात्र निर्माण झालेल्या तणावानंतर पोलिसांच्या विनंतीवरून उद्धव ठाकरे यांनी …
Read More »ऐन दिवाळीच्या धामधुमीत बारामतीत शरद पवार-अजित पवार आणि दिल्लीत ?
राज्यातील राजकिय वजनदार घराणं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवार कुटुंबात सध्या काय सुरु आहे याची भणकच विविध राजकिय पंडितांना लागत नाही. त्यातच नुकतेच डेंग्युचा आजार झाल्याने अजित पवार हे राजकियदृष्ट्या सक्रिय राहण्याऐवजी घरीच आराम करणे सध्या पसंत केले आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी तब्येत बरी होत असल्याचे ट्विट करत पुढील काही दिवस …
Read More »अशोक चव्हाण यांची मागणी, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा
बिहार राज्याने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के केली आहे, बिहार भाजपानेही याला पाठिंबा दिला असून आता महाराष्ट्रात देखील बिहारप्रमाणे आरक्षण मर्यादा वाढवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. अशोक चव्हाण म्हणाले, बिहार विधानसभेने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक कालच मंजूर केल्यानंतर आता महाराष्ट्रात देखील ही मागणी होवू लागली …
Read More »
Marathi e-Batmya