Tag Archives: bjp

सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना सल्ला, …भाजपापासून सांभाळून रहा मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्यावा

जालन्यात अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. तसंच, पुण्यात कोयता गँग सक्रीय आहे. ड्रग्ज माफियांचं साम्राज्य या राज्यात आहे. इतकचं काय तर राज्यातील मराठा, धनगर, लिंगायत हे समाज आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यांना आरक्षण दिलं जात नाही. महाराष्ट्र आज पेटला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे गृहखात्याचं अपयश असल्यानं, …

Read More »

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत “या” मुद्यावर एकमुखी ठराव राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. तसेच या सर्व …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्री- दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार उपमुख्यमंत्र्यानी राजीनामे द्यावे

राज्यातील सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणावरून सध्या राज्यामध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठा आंदोलक …

Read More »

कमी पावसामुळे राज्यातील ४० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे. राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, राज्य- केंद्राने लवकर निर्णयाची आवश्यता, पण आता… विलासराव देशमुख यांचे मित्र विनायकराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

लातूर जिल्ह्यातील भाजपाचे नेते तथा पूर्वाश्रमीचे स्व.विलासराव देशमुख यांचे घनिष्ट मित्र विनायकराव पाटील यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आज देशाच्या समोर अनेक प्रश्न उभे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न या आरक्षणाच्या प्रश्न आधी देखील चर्चा झालेली आहे. मी स्वतः जरांगे पाटलांची …

Read More »

फडणवीस यांचे ते वक्तव्य आणि विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा दिल्ली दौरा अॅटर्नी जनरल तुषार मेहता यांच्या भेटीसाठी गेले दिल्लीला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांनी मुळ शिवसेनेत बंडखोरी करत शिवसेना पक्षचिन्ह आणि पक्ष नावावर दावा केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या अपात्र आमदारांच्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला. मात्र मे महिन्यात यासंदर्भातील निकाल दिलेला असतानाही अद्याप अंतिम निर्णय दिला नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, बोलायला येत तोपर्यंतच या… फडणवीस यांनी कानात बोळे घातले होते का

मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपली. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी विना औषध उपचार आणि पाणी न घेता उपोषणाला सुरुवात केली. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशीच मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळायला सुरुवात झाली असून आता जरांगे पाटील यांना फार …

Read More »

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर राज्य सरकार थोडेसे नरमले सोमवारी सकाळी १० वाजता मंत्रालयात बैठक

मराठा आरक्षण प्रश्नी मराठा आंदोलनकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीच्या घोषणा देत २९ नोव्हेंबरपासून गावागावात सामूहिक आमरण उपोषणाचे आवाहन केले. तसेच या आमरण उपोषणाच्या कालावधीत कोणाला काही झाले तर त्याची जबाबदारी सरकारवर राहणार असल्याचा इशारा दिला. तसेच आगामी काळात आणखी आंदोलन तीव्र करणार असल्याचे अंतिम इशारा दिला. त्यानंतर …

Read More »

पीक विमा योजनेवरून नाना पटोले यांची टीका, तर मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी फडणवीस व भाजपा जनतेच्या मनातूनच डिलीट झाले, त्यांना पुन्हा संधी नाही

राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते खरे नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र व राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच पैसा असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सरकारने हजारो कोटी रुपये भरले आहेत. आज राज्यात दुष्काळी …

Read More »

शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर, कदाचित नीट ब्रीफींग झाले नसावे मोदी सरकारने साखरेची निर्यात बंद केली, आंतरराष्ट्रीय बाजारात जाऊ नये म्हणून निर्यात बंद

दोनच दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत. ते शेतकऱ्यांसाठी फार केले अशा पध्दतीने वावरतात. मात्र ते देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी फार काही करू शकले नाहीत असा आरोप शरद पवार यांचे नाव घेता शिर्डी येथील जाहिर कार्यक्रमात केला. त्यावर काल रायगड येथे झालेल्या एका बँकेच्या कार्यक्रमात …

Read More »