Tag Archives: bjp

नाना पटोले म्हणाले, ७५ तही महागाई, बेरोजगारी सारख्या मुलभूत गरजांसाठी झ़ग़डावे लावतेय लोकशाही व संविधान वाचवण्याचा राहुल गांधींचा लढा पुढे नेऊया

देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना महागाई, बेरोजगारी सारख्या मुलभूत गरजांसाठी जनतेला झ़ग़डावे लागत आहे. मोठ्या संघर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ व महान ग्रंथ ‘संविधान’ या देशाला दिले, पण मागील ८ वर्षात लोकशाही व संविधान धोक्यात आले असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी …

Read More »

जून्या पेन्शनवरून काँग्रेसचा सवाल, ‘धमक’ होती तर फडणवीस आतापर्यंत झोपले होते का? विधान परिषद निवडणुकीत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीसांचा ‘जुन्या पेन्शन’चा डाव

जुनी पेन्शन योजना लागू करण्यास साफ नकार देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मात्र योजना लागू करण्याची भाषा करत आहेत. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची ‘धमक’ फक्त आपल्यातच आहे अशी फुशारकी मारायलाही त्यांनी कमी केले नाही. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीस यांनी जुनी पेन्शन …

Read More »

अजित पवारांचे समर्थन करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांकडून आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेची री… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ फडणवीसांकडून जूनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा सुतोवाच

नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यातील शिक्षकांकडून जूनी पेन्शन लागू करण्याची मागणी करण्यात येत असल्याचा मुद्दा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांकडून विधान परिषद आणि विधानसभेत उपस्थित करण्यात आला. या मुद्यावर राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून्या पेन्शन योजनेबाबत अजित पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत ही योजना लागू …

Read More »

सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर, फडणवीसजी मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला अधिकार किती? तुम्हाला माहित फडणवीसांनी केलेल्या आरोपावरून अंधारे यांची टीका

काल मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर गुन्हे दाखल करून तुरूंगात टाकण्याची सुपारी तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिली होती असा आरो केला. फडणवीस यांच्या या आरोप तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावल्यानंतर ठाकरे गटाच्या …

Read More »

फडणवीसांच्या आरोपावर अजित पवार म्हणाले, अशी चर्चा झालीच नाही उभ्या महाराष्ट्राला माहित आहे आम्ही जे बोलतो ते किती स्पष्ट बोलतो

आज सकाळी एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर गुन्हे दाखल करण्याचे आणि तुरुंगात टाकण्याची सुपारी अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आली होती असा खळबळजनक आरोप केला. फडणवीसांच्या या आरोपाला तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्र्यांच्या आरोपातील …

Read More »

माजी गृहमंत्र्यांच्या उत्तरावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी वळसे-पाटलांवर आरोप केलाच नाही माझ्यावरील कारवाईसाठी वरून आदेश आले होते

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार होते. अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच किंवा सुपारी त्यावेळचे मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिलं होतं असा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस …

Read More »

निवडणूकीतील चमत्कारासाठी भाजपा झाली गुरूमीत राम रहिमवर मेहरबान १४४ दिवस पॅरोलखाली मंजूर

बेटी बचाव बेटी पढाओ चा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. मात्र त्यांच्या या घोषणेचा परिणाम भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर किती झाला याची माहिती वेळोवेळी बाहेर आलेली आहे. मात्र हरियाणातील आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याच आश्रमातील मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी २० वर्षाची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, देवेंद्र फडणवीस यांचे आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा भाजपाकडूनच मोठ्या प्रमाणात गैरवापर

भारतीय जनता पक्षाने मागील ८ वर्षांत ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकले आहे. मविआ सरकारमधील दोन मंत्र्यांनाही अशाच पद्धतीने जेलमध्ये पाठवले. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करुन ब्लॅकमेल करण्याचे राजकारणही भाजपानेच केले आहे. विरोधकांना राजकीय वैमनस्यातून जेलमध्ये टाकण्याची परंपरा भाजपाचीच आहे, अशी …

Read More »

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि खत पुरवण्याची जबाबदारी आता सहकारी संस्थांवर सहकारमंत्री अतुल सावे यांचे सहकारी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

कृषी-औद्योगिक अर्थकारण आणि विशेषत: ग्रामीण क्षेत्रात सहकारी संस्थांची महत्वाची भूमिका आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि वेळेत खत पुरवठा व्हावा, यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री अतुल सावे यांनी केले. पणन महासंघ अधिमंडळाची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. त्यावेळी सहकार मंत्री सावे बोलत …

Read More »

उध्दव ठाकरे गैरहजरः विधान मंडळात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित

शिवसेना पक्षप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांचे तैलचित्र विधान मंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आज बसविण्यात आले. या कार्यक्रमाला बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे वगळता इतर ठाकरे कुटुंबिय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे …

Read More »