Tag Archives: bjp

उध्दव ठाकरेंचे खुले आव्हान: हिंदूत्वावरून होऊनच जाऊ द्या, या एका व्यासपीठावर शिंदे गटासह भाजपालाही दिले आव्हान

माझी शस्त्रक्रिया झाला. माझी बोटंही हालत नव्हती. त्यावेळी ज्यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यांनीच गद्दारी करत पाठीत खंजीर खुपसला आणि ज्यांच्यावर लक्ष ठेवत होतो. त्यांनी मात्र सोबत केली. मी काँग्रेस, राष्ट्रीवादीसोबत आघाडी केली म्हणून मला हिंदूत्व सोडलं म्हणता. या एकदा हिंदूत्वावरून होवूनच जाऊ द्या तुम्ही सगळे जण एका व्यासपीठावर या असे खुले …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, माझ्या मात्या-पित्याची शपथ घेवून सांगतो ते तसंच आहे अमित शाह, नरेंद्र मोदी यांच्यासह बंडखोरांवर सोडले टीकास्त्र

काही दिवसांपूर्वी अमित शाह आले होते. ते म्हणाले आम्हाला जमिन दाखवायची आहे. मी तर म्हणतो खरेच दाखवाच आम्हाला जमिन. आम्ही जमिनीवरचेच आहोत. या इथे बघा असे सांगत अमित शाह म्हणतात तसे काही ठरले नव्हते. मी माझ्या मात्या-पित्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी जे सांगतोय ते तसेच …

Read More »

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी संघर्षाला घाबरत नाही, थकणार नाही… भगवान गडावरील दसरा मेळाव्यात आगामी निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत

माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचं रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, कधीही कुणासमोर झुकणार नाही असा निर्धार भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. भगवान भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुडे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर …

Read More »

दिपक केसरकर म्हणाले, भाजपा आमच्यासाठी मोठं पद सोडू शकते तर आम्ही का नाही?

शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईतील अंधेरी विधानसभेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या निवडणूकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यातील पहिली लिटमस टेस्ट होणार असल्याची चर्चा रंगली होती. तसेच अंधेरीचा जागा शिवसेनेची असल्याने त्यावर शिंदे गटाकडूनही दावा केला जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच ही निवडणूक शिंदे गटाकडून …

Read More »

राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सरस्वती पूजन हे उशीरा सुचलेले शहाणपण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला असल्याने त्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयातील सरस्वती पूजन हे मनापासून झाले की, संपूर्ण राज्यातील हिंदू समाजाने टीका केल्यामुळे उशीरा सुचलेले शहाणपण आहे, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी …

Read More »

‘वंदे मातरम्’ला विरोध करून काँग्रेसने देशविरोधी मानसिकता दाखवली भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करून काँग्रेसने आपली देशविरोधी मानसिकताच दाखवली आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. ‘वंदे मातरम्’ला विरोध करणारे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरम् …

Read More »

नाना पटोले म्हणाले, पोकळ चिंता व्यक्त करण्यापेक्षा आरएसएसने मोदी सरकारलाच सांगा सामाजिक विषमतेचे बीज राष्ट्रीय स्वसंयेवक संघानेच पसरवले

केंद्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे भाजपाचे सरकार आल्यापासून देशात महागाई, गरिबी व बेरोजगारीची स्थिती चिंताजनक बनलेली आहे. यावर विविध स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर आसूड ओढले जात आहेत, लोकांमध्ये प्रचंड संताप असूनही मोदी सरकार त्याकडे लक्ष देत नाही. आज राष्ट्रीय स्वसंयेवक संघाला त्याची जाणीव झाली हे विशेष म्हणावे …

Read More »

शिंदे गटाच्या खासदारापाठोपाठ आशिष शेलार म्हणाले, सचिन वाझे ठाकरेंचा माणूस कागदोपत्री सिध्द झाले आहे

शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हणाले की, ‘मातोश्री’वर दर महिन्याला १०० खोके पाठवले जात होते. ते बुलढाण्यातील शिंदे गटाच्यावतीने आयोजित ‘हिंदू गर्व गर्जना’ कार्यक्रमात बोलत होते.  यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली असून सचिन वाझे हे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी …

Read More »

‘धन्यवाद मोदीजी’ अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांना राज्यातून पंधरा लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठविणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेल्या योजनांचा लाभ झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली पंधरा लाख पत्रे पंतप्रधानांपर्यंत पोहचविण्याचे भारतीय जनता पार्टीचे ‘धन्यवाद, मोदीजी’ अभियान रविवारी सुरू झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अभियानात मुंबईत गोरेगाव मतदारसंघात पन्नास लाभार्थ्यांशी संपर्क साधला. बावनकुळे यांनी पत्रकारांना अभियानाची माहिती दिली. …

Read More »

नाना पटोलेंचा टोला, ‘भारत जोडो’ यात्रेच्या प्रचंड प्रतिसादाने भाजपाचे संतुलन बिघडले भाजपाच्या टीकेचा ‘भारत जोडो’ यात्रेवर काहीही फरक पडत नाही

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्षाचे नेते बिथरले आहेत. भाजपाच्या नेत्यांचे संतुलन बिघडले असून त्याच निराश मानसिकतेतून पदयात्रेवर टीका केली जात आहे. परंतु भाजपाच्या या टीकेचा पदयात्रेवर तसूभरही परिणाम होणार नसून ही पदयात्रा जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादासह काश्मीरपर्यंत मार्गक्रमण करत …

Read More »