Tag Archives: bjp

पालघरचे खासदार वनगा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली

नवी दिल्लीः प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशातील आदीवासी समाजबांधवाचे नेतृत्व करणारे पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे आज सकाळी हृदयविकारचा झटका आला. मात्र त्यांना रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. वनगा हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या वनवासी कल्याण केंद्राचे पदाधिकारी होते. तसेच …

Read More »

स्वपक्षात एकटे पडलेले खडसे विस्थापित तर नाही होणार ? भाजपमध्ये एकटे पडलेल्या खडसेंना इतर पक्षात मात्र मुबलक मित्र

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात ४० वर्षे एकाच पक्षात राहून राजकिय विरोधकांशी दोन हात केले. त्याच पक्षाने सत्तेत आल्यानंतर पहिल्या दोन वर्षातच एकनाथ खडसे यांना एखाद्या खड्यासारखे बाजूला सारत स्वपक्षातच एकटे पाडण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खडसे हे भाजपमध्ये एकटे पडल्याचे चित्र पाह्यला मिळत असून त्यांच्यावर विस्थापित होण्याची पाळी …

Read More »

राज्यातील भाजपचे सरकार सर्वसामान्यांचे नव्हे तर धनिकांचे ‘पतंजली’बाबतचे परिपत्रक तातडीने रद्द करण्याची विखे पाटील यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजपचे सरकार हे सर्वसामान्यांचे नसून मूठभर धनिकांचे आहे. त्यामुळेच मुठभर धनिकांच्या फायद्यासाठी अर्थात पंतजलीची उत्पादने विकण्यासंदर्भात राज्य सरकारने शासकीय सेवा क्रेंद्रातून उत्पादने विकण्याचा निर्णय घेण्याची कृती हे स्पष्ट दर्शवित असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करत ते परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली. हे सरकार सर्वसामान्यांचे नसून, …

Read More »

विधान परिषदेचे माजी सभापती ना.स.फरांदे यांचे निधन अभ्यासू नेतृत्व गेल्याची राजकिय पक्षांमध्ये भावना

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या विधान परिषदेचे सभापती ना.स फरांदे यांचे आज सकाळी निधन झाले. तीन-चार दिवसांपूर्वी पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयात उपचार होते. या उपचारा दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. फरांदे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील वाई …

Read More »

नगरपालिकांवरील भाजपाची सत्ता राखण्यासाठी नगराध्यक्षांना विशेष अधिकार आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शंबरहून अधिक नगर पालिकांच्या झालेल्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार नगराध्यक्ष पदावर निवडूण आले. तर नगरपालिका सदस्य म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे सदस्य आले. त्यामुळे सदस्य संख्या नसतानाही भाजपची सत्ता सर्वच नगरपालिकांमध्ये असल्याने या नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणून विकास कामाला खिळ घातली जावू शकते. त्यामुळे विरोधकांच्या या राजकारणाला …

Read More »

कमला मिल आगप्रकरणी काँग्रेस भाजपकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी काँग्रेसच्या निरूपम यांच्या आरोपाला भाजपच्या भांडारींचे उत्तर

मुंबई : प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लोअर परळमधील कमला मिल कंपाऊडमधील मोजो ब्रिस्टो आगप्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी हॉटेल मालकांसोबत मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेतल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला. त्यास प्रतित्तुर देत भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी काँग्रेस काळातील नियमबाह्य परवाग्यांचे पितळ उघड होवू नये यासाठीच प्रशासनावर …

Read More »

वर्ष अखेरीस राज्यात कर्ज काढून ३ लाख ४१ हजार कोटींची विकास कामे सर्वाधिक कामे मुंबई आणि ठाणे शहरात

मुंबई : गिरिराज सावंत राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली. या तीन वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांच्या घोषणेचा एकच धडका लावला. या घोषणेनुसार राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या प्रमुख शहरांमध्ये ३ लाख ४१ हजार ४९०.५१ कोटी रूपयांची कामे हाती घेण्यात आली …

Read More »

हिवाळी अधिवेशानंतर भाजपतंर्गत राजकारणातील घडामोडींना वेग मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच पंख छाटण्याच्या कामाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. मात्र अधिवेशनाची सांगता होताच मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत संभावित चेहऱ्यांनी राजकिय वजन खर्ची घालण्यास सुरुवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये असूनही राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांना पाठबळ पुरविणाऱ्या राजकिय मंत्री आणि आमदारांच्या पंख छाटणीच्या कामास सुरुवात झाल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय …

Read More »

कोणी कितीही सांगितले तरी माझ्या कामाचे श्रेय मलाच मिळते महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन

नागपूर : प्रतिनिधी राज्यात मंत्री म्हणून विराजमान झाल्यानंतर ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली. ही योजना देशातील इतर राज्यांनाही चांगलीच आवडली असून राजस्थान, मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी त्याची अंमलबाजवणीही सुरु केली आहे. त्यामुळे जी योजना मी सुरु केलेली आहे. त्याचे श्रेय मलाच मिळणार असून ती …

Read More »

मुंबई महापालिकेच्या विभाजनावरून भाजप-काँग्रेस समोरासमोर तर शिवसेनेला उशीराने जाग ; सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब

नागपूर : प्रतिनिधी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने मुंबई महापालिकेचे तीन भागात विभागण करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी केली. मात्र भाजपने याचा राजकिय फायदा उठविण्यासाठी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडण्यासाठी काँग्रेसकडून हा प्रस्ताव आणला जात असल्याचा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला. त्यामुळे सत्ताधारी भाजप …

Read More »