Tag Archives: chief justice of india

सरन्यायाधीश बी आर गवई यांनी राजशिष्टाचारावरून मुख्य सचिव, डिजी, आयुक्तांना सुनावले राजशिष्टाचारावरून उपस्थित राहणे आवश्यक असतानाही तीघेही गैरहजर

भारताचे सरन्यायाधीश पदी न्यायमूर्ती बी.आर. गवई यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या पहिल्याच सत्काराचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. मात्र राजशिष्टाचारानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या स्वागतासाठी घटनात्मक पदावरील व्यक्ती उपस्थित नसतील तर राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि शहराचे पोलिस आयुक्त हजर असणे आवश्यक आहे. परंतु सरन्यायाधीशाच्या स्वागताला यापैकी कोणीच उपस्थित राहिले …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे न्यायमूर्ती भूषण गवई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा

राष्ट्रपति भवनात आयोजित एका विशेष समारंभात न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे 52व्या मुख्य न्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या समारोहाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी आर गवई यांच्या खंडपीठासमोर होणार वक्फ कायद्याची सुनावणी मुख्य सरन्यायाधीश संजीव खन्ना १३ मे रोजी होणार निवृत्त

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) संजीव खन्ना यांनी सोमवारी (५ मे, २०२५) सांगितले की, वक्फ (सुधारणा) कायदा, २०२४ ला आव्हान देणाऱ्या याचिका १३ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे वक्फ कायदा प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सूचीबद्ध केल्या जाणार असल्याचे सांगितले. कार्यवाहीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले …

Read More »

वक्फ प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या दुपारी पुन्हा सुनावणी घेणार सुधारीत वक्फ कायद्यातील तरतूदी लागू होणार नाहीत

अंतरिम आदेश पारित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय उद्या दुपारी २ वाजता पक्षकारांची सुनावणी घेईल. वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. भारताचे तथा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांचा समावेश असलेले खंडपीठ दुपारी २ वाजता …

Read More »

मग सत्ताधारी निवडणूक आयोगावर प्रभाव टाकेल, महुआ मोईत्रा यांची याचिका तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा यांची सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका

लोकसभा खासदार महुआ मोइत्रा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त अधिनियम, २०२३ च्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. भारताच्या सरन्यायाधीशांना निवडणूक आयुक्त (ECs) नियुक्त करणाऱ्या निवड समितीमधून काढून टाकले त्याच्या विरोधात ही याचिका महुआ मोईत्रा यांनी दाखल केली. हस्तक्षेपाची मागणी करत, तृणमूल काँग्रेसच्या खासदार …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकपालाच्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत याचिका फेटाळत दिला निर्णय

भारताचे सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकपालच्या अधिकारक्षेत्रास अनुकूल नसतात, त्यांनी तक्रारीची दखल घेण्यास नकार देत याचिका लोकपालाच्या अनुषंगाने दाखल याचिका फेटाळून लावली. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, २०१३ च्या कलम १४ नुसार सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही, असे लोकपालने म्हटले आहे. कलम १४ नुसार, लोकपालला अशा व्यक्तीवर अधिकारक्षेत्र …

Read More »

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना निरोप, म्हणाले, लोकांची सेवा करण्यास… शुक्रवारी कामकाजाचा शेवटचा दिवस रविवारी होणार निवृत्त

सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट हॉल १ मध्ये वकिलांकडून निरोप घेताना, भारताचे सरन्यायाधीश (CJI) डी वाय चंद्रचूड यांनी शुक्रवारी सांगितले की, गरजू लोकांची सेवा करण्यास सक्षम असण्यापेक्षा न्यायाधीशाची कोणतीही मोठी भावना नाही, अशी भावना सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी आज व्यक्त केली. १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचा …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन संकुलाच्या कोनशिलेचे सरन्यायाधीशांकडून अनावरण सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री शिंदे याच्या उपस्थित पार पडणार

मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन संकुल हे वांद्रे पूर्व, मुंबई येथे बांधण्यात येणार असून सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ रोजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.धनंजय वाय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्तावित जागेवर बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले जाणार आहे. कोनशिला अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती …

Read More »

सरन्यायाधीशांच्या घरी गणपती पूजनावरील टीकेला पंतप्रधान मोदींचे उत्तर गणपतीच्या पुजनाला गेल्याने काँग्रेसची पोटदुखी

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरी गणपती पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले. त्यावरून पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीश यांच्यावर सर्वचस्तरातून टीका करण्यात आली. त्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी उत्तर देत म्हणाले की, गणेश पूजेसाठी मी सहभागी झाल्यामुळे काँग्रेसकडून टीका करण्यात येत असल्याचे सांगितले. भुवनेश्वरमध्ये मंगळवारी …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, नाही तर गणपतीलाही पुढची तारीख दिली असती… न्यायालयाकडून निर्णयाची अपेक्षा करायची की करायची नाही आता जनतेच्या न्यायालायत

दोन तीन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीची पुजाही केली. या घटनेवरून कायदेतज्ञांबरोबर राजकिय नेत्यांकडूनही मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. तसेच शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही याबाबत भाष्य करत पंतप्रधान मोदी …

Read More »