Tag Archives: chief minister

पवारांचा सवाल, अमृता वहिनींना सांगू का? तर फडणवीस म्हणाले, सुनेत्रा वहिनींना विचारलं का? विधानसभेतील चर्चेवेळी देवेंद्र फडणवीस-अजित पवारांची परस्पर विरोधी टोले-बाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा- विदर्भ विषयावरील २९३ च्या विरोधकांच्या प्रस्तावाला उत्तर दिले. त्यानंतर राईट टू रिप्लायवर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळात एकही महिला सदस्या नसल्याची खंत व्यक्त करत याची तक्रार मिसेस फडणवीस यांना सांगू का असा सवाल करत मंत्रीमंडळाचा विस्तार करा असे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचा टोला, आम्हाला समृध्दीचा गोसीखुर्द होऊ द्यायचा नव्हता अजित पवारांवरील पूर्वीच्या आरोपांवरून मुख्यमंत्र्यांचा टोला

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कालपासून विरोधकांच्यावतीने विदर्भ-मराठवाड्यातील अनुशेषाच्या अनुषंगाने नियम २९३ खाली प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलताना सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील अनेक आमदारांनी मराठवाडा आणि विदर्भातील अनुशेष दूर करण्यासाठी काही सूचना केल्या तर काही जणांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली. या संपूर्ण झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

सीमा भागातील मराठी बांधवांसाठी मुख्यमंत्री शिंदेनी केल्या ‘या’ घोषणा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांचा मुख्यमंत्री सहायता देणगी योजनेत समावेश, महात्मा फुले जन आरोग्य योजनाही लागू

कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. सीमा भागातील मराठी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयांचा आणि सुरू केलेल्या योजनांविषयी मुख्यमंत्री शिंदे यांनी …

Read More »

वाचा, कर्नाटकच्या विरोधात मुख्यमंत्री शिंदेनी मांडलेला ठराव आहे तसा कर्नाटकाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा निषेधाचा मुख्यमंत्र्यांनी मांडलेला ठराव विधीमंडळात एकमताने मंजूर

कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव आज महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह ८६५ गावातील मराठी भाषक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे. सीमा …

Read More »

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी लोकांबद्ल जशी आग ओकली त्याला प्रतिउत्तरच नाही भारतीय जनता पक्षाची भूमिका सीमाप्रश्नीही नेहमीप्रमाणे संदिग्धच-नाना पटोले

सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटक सरकारने टार्गेट करत त्यांच्यावर अत्याचार केले, त्यांच्या गाड्या फोडल्या. महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतरही कर्नाटकाने कुरापती थांबवल्या नाहीत. महाराष्ट्रातील मंत्री सीमाभागात जाऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती असताना सभागृहात ठराव मांडताना कर्नाटक सरकारला खडेबोल सुनवायला पाहिजे होते. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी लोकांबद्दल ज्याप्रमाणे आग ओकली, …

Read More »

अजित पवारांच्या तक्रारीवर फडणवीस म्हणाले, सभागृह तुम्ही चालवू देताय हे माहितच नव्हते… मुख्यमंत्री किमान प्रश्नोत्तराच्या दरम्यान सभागृहात आले पाहिजे-अजित पवार

विधानसभेचे नियमित कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पुकारण्यात आला. त्यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उशीराने कामकाजात सहभागी झाल्यानतर.अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांकडे १४-१५ खाती आहेत. किमान प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान त्यांच्याकडील विभागाची उत्तरे त्यांनी स्वतः दिली असती तर अधिकची माहिती मिळाली असती. मात्र मुख्यमंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला …

Read More »

संजय राऊत यांचे फडणवीसांना आव्हान,… तर बिल्डर सूरज परमार प्रकरणीही एसआयटी लावा दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा केल्यानंतर संजय राऊत यांची मागणी

फडणवीस सरकारच्या काळात ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांनी सूसाईड नोट लिहीत आत्महत्या केली. त्यानंतर परमार यांची डायरी सापडली. त्यात अनेक राजकिय व्यक्तींची सांकेतिक भाषेत लिहिलेली नावे आढळून येत त्या व्यक्तींना पैसे दिल्याची माहिती उघडकीस आली. तसेच त्यातील काही नावे खोडा-खोड केल्याचेही उघडकीस आले होते. मात्र दिशा सालियन प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन, रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावणार श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा २७ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ संपन्न

राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान असून, राज्यात १४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. सोलापूर जिल्हा साखर पट्टा असून या भागाचा विकास महत्वाचा आहे. त्या पार्श्वभूमीवर रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तत्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. …

Read More »

अशोक चव्हाण म्हणाले, सत्ताधाऱ्यांचे वर्तन लोकशाहीला काळीमा फासणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनावरून साधला निशाणा

हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांचे वर्तन महाराष्ट्राचे नुकसान करणारे आणि लोकशाहीला काळीमा फासणारे असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. शुक्रवारी सकाळी विधानभवनात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. अशोक चव्हाण म्हणाले की, नागपूर हिवाळी …

Read More »

जयंत पाटील यांची खोचक टीका, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री साप चावल्यासारखे गप्प आता तरी मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांनी नेभळटपणा सोडून मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध ठराव मांडावा

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ‘बेळगावसह सर्व सीमांचे रक्षण करून महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या बेळगाव वादाचा निषेध करण्याचा ठराव’ करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री साप चावल्याप्रमाणे गप्प बसले आहेत अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला एक इंचही जमिन देणार नसल्याचे वक्तव्य केले. …

Read More »