मुंबई ही भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’ म्हणून उदयास येत आहे. बांद्रा परिसरात ‘ताज’ ग्रुपच्या नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलमधील आधुनिक कन्व्हेन्शन सेंटरमुळे मुंबईतील व्यावसायिक संधी अधिक वाढतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘ताज’ ग्रुपच्या बांद्रा परिसरातील नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी …
Read More »राज ठाकरे- मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट, एकनाथ शिंदे यांनी नियोजित बैठका केल्या रद्द अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठका आणि एमएसआरडीची आढावा बैठका पुढे ढकलल्या
मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून धुसफुस सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकिय सौख्य काही राहिल्याचे दिसून येत नसल्याची कुजबुज सध्या सुरु असतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका नजरेसमोर ठेवून महायुतीतील शिवसेना …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, ४०० वर्षांचे चिंबई गावठाण झोपडपट्टी कसे? मुंबईच्या गावठाण आणि कोळीवाड्यांची ओळख नष्ट करण्याचे भाजपा युती सरकाचे षडयंत्र
राज्यातील भाजपा युती सरकार हे लाडक्या बिल्डर मित्रांसाठी काम करते हे नवे नाही पण उद्योगपती, बिल्डर धार्जिणे भाजपा युती सरकार आता भूमिपुत्रांच्या हक्कावर गदा आणत आहे. एका बिल्डर मित्राच्या फायद्यासाठी वांद्र्यातील ४०० वर्षे जुन्या चिंबई गावठाणला झोपडपट्टी घोषित करण्यात आले आहे. मुंबईच्या भूमिपुत्रांना बेदखल करण्याचे हे षडयंत्र असून बिल्डर मित्रांच्या …
Read More »मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंग यांचा २१ महिन्यानंतर पदाचा अखेर राजीनामा जातीय हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याने भाजपा आमदार आक्रमक
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय संघर्षाला एकवीस महिने उलटून गेल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी रविवारी संध्याकाळी इंफाळमध्ये राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. बीरेन सिंग शनिवारी संध्याकाळी इम्फाळहून दिल्लीसाठी निघाले होते – या आठवड्यात राष्ट्रीय राजधानीचा असा दुसरा प्रवास – शनिवारी संध्याकाळी. मंत्रिमंडळातील कोणत्याही सहकाऱ्याशिवाय त्यांनी हा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, आनंदवनला आर्थिक पाठबळ देणार आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर
अतिशय कठीण काळात बाबा आमटेंनी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू केले. समाजामध्ये ज्या कामाला मान्यता नव्हती, तिरस्कार होत होता, अशा काळात बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत हाती घेतले. आज ७५ वर्षानंतर अनेक प्रतिष्ठित लोक या संस्थेची जुळले आहेत. या सर्व लोकांना आनंदवनातून आत्मिक समाधान मिळत असते. त्यामुळेच …
Read More »नाना पटोले यांनी कागदपत्रे दाखवत मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले चौकशीचे आव्हान कृषी विभागातील भ्रष्टाचारांची सखोल चौकशी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवावे.
देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना भाजपा युतीचे सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवर मात्र कृषी विभागातील अधिकारी व मंत्री संगनमताने खिसे भरत राहिले. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने नॅनो युरीया व नॅनो डीएपी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, २०१९ च्या निवडणूकीपूर्वीच उद्धव ठाकरे आघाडीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मी फोन केला होता
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि अविभाजित शिवसेना यांच्यातील प्रदीर्घ युती तुटल्याबद्दल बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आरोप केला की उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी आघाडी केली होती. त्यामुळे राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार येऊ शकले नाही. “तुम्हाला (उद्धव ठाकरे) बंद दरवाजाआड मुख्यमंत्री बनवले जाईल, असे …
Read More »अंजली दमानिया यांचा सवाल, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार की नाही…. दोन मोबाईल मिळाले, त्यातील डेटा रिट्राईव्ह करायला किती वेळ लागणार
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला आज दोन महिने झाले. या दोन महिन्यांनंतर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार आहे की नाही असा संशय निर्माण होत आहे. जे दोन मोबाईल मिळाले, त्या मोबाईलमधून डेटा रिट्राईव्ह करण्यात आला की नाही की त्यात मोठ्या नेत्याचा आवाज असल्याने त्या मोबाईलबाबतची माहिती लपविली जातेय अशी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा आशावाद, आमदार संमेलन क्षमता वृद्धींगत करण्याचे व्यासपीठ एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित राष्ट्रीय आमदार संमेलन
राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या माध्यमातून राजकारणातील ध्येय, मनातील विचार संवादात्मक पद्धतीने मांडण्यासाठी व आपल्या क्षमता वृद्धींगत करण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राष्ट्रीय विधायक संमेलन भारततर्फे देशातील आमदारांसाठी दोन दिवसीय क्षमता वृद्धी कार्यक्रम एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरुड येथे आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या उद्धाटनप्रसंगी …
Read More »चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरून प्रकाश आंबेडकर यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सवाल महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० हून अधिक !
महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० पेक्षा जास्त आहे आणि काही मृत भाविकांची वाहने अजूनही अनेक दिवसांपासून पार्किंगमध्ये पडून आहेत, कदाचित योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रशासन ही वाहने लपवायला विसरले असतील असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे विचारला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर …
Read More »
Marathi e-Batmya