गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा …
Read More »‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर अर्ज सादर करा
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक …
Read More »राज्यातील विविध देवस्थानांच्या २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना मंजूरी ग्रामीण विकासाला चालना मिळणार- मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह राज्याच्या ग्रामीण भागातील ८ देवस्थानांच्या सुमारे २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या विकास आराखड्यांच्या …
Read More »१ लाख १७ हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता सेमीकंडक्टर, इलेक्ट्रीक वाहन निर्मितीत गुंतवणूक; २९ हजार रोजगार निर्मिती
राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. आज मान्यता दिलेल्या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित मंत्रिमंडळाची बैठक संपन्न
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत मस्त्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणे, अटी व शर्ती देऊन शेवगांव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य देण्याचा निर्णय, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष, अंगणवाडीस सोलर सिस्टीम देणे, न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारीत भत्ते, कुक्कुटपालन संस्थाना व्याजदंड माफी यासह महत्वाच्या १० विषयांवर निर्णय घेतला. राज्य …
Read More »पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग ९ हजार कोटी रूपये खर्चून सुधारणा करणार ६ पदरी उन्नत आणि बाह्यवळण रस्ता मार्ग सुधारण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
सध्याच्या पुणे-शिरुर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पुणे ते शिरुर हा ५३ कि.मी. चा मार्ग सहा पदरी उन्नत करण्यात येणार असून एमएसआयडीसीमार्फत हे काम केले जाईल. यासाठी ७ हजार ५१५ कोटी खर्च अपेक्षित आहे. शिरुर अहमदनगर बाह्यवळण …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल अटकेप्रकरणी सीबीआयला फटकारले अटक करण्याआधी न्यायालयाला विचारायला पाहिजे होते
दिल्ली लीकर पॉलिसी प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा सीबीआयने अटक केली. या अटकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयवर फटकारत ताशेरे ओढले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, जेव्हा तुम्ही कोठडीत असाल… तुम्ही त्याला पुन्हा अटक करत असाल, तर तुम्हाला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. फौजदारी प्रक्रिया संहितेत काहीतरी आहे, …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा आपदग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात यावी
मागील दोन दिवस विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, हॉस्पिटलची ५०० कोटींची जमीन ७० कोटीत… मविआ सरकार असताना एस. टी. संप चिघळवणारे भाजपाचे तीन हस्तक आता गप्प का ?: विजय वडेट्टीवार
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली असून हत्या, खून, दरोडो, बलात्कार यांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात नुकतेच दिवसाढवळ्या दोन खून झाले. राज्यात शांतता राखण्यात भाजपा युती सरकार अपयशी ठरली आहे. कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असून सरकारचे सर्व लक्ष मात्र घोटाळे करून पैसा वसुल करण्याकडे आहे, असा घणाघाती हल्लाबोल …
Read More »सुनिल तटकरे यांची माहिती, जनसन्मान यात्रेचा तिसरा टप्पा… राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक मुंबईत पार
जनसन्मान यात्रेचा नुकताच दुसरा टप्पा संपला असून आता तिसरा टप्पा कधी घ्यायचा याच्या नियोजनावर चर्चा झाली. शिवाय महायुतीच्या नेत्यांची जी बैठक पार पडली त्याअनुषंगाने मतदारसंघनिहाय आढावा घेणे आणि त्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले …
Read More »
Marathi e-Batmya