Tag Archives: cm uddhav thackeray

पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पेगॅसस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी राज्यातील २०१७ सालचे फोन टॅपिंग व पेगॅसस हेरगिरीचा संबंध आहे का ?-नाना पटोले

मुंबईः प्रतिनिधी पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील महत्वाचे राजकीय नेते, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन हॅक करण्यात आले आहेत. या लोकांवर हॅकिंगच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशी आदेश अद्याप दिले नसले तरी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने या हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक …

Read More »

कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा! भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबईः प्रतिनिधी सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली ३८०० कोटींची देणी सरकारी तिजोरीतून देण्याची तत्परता दाखविण्यासाठी समिती नेमणा-या ठाकरे सरकारने पूरग्रस्त भागातील जनतेच्या भावनांची कुचेष्टा केली असून संकटग्रस्त जनतेच्या हितापेक्षा कर्जबुडव्यांबद्दल कळवळा दाखविणारे ठाकरे सरकार ढोंगी आहे. कर्जबुडव्या बड्या धेंडांसाठी पायघड्या घालत सामान्य संकटग्रस्तांसमोर आर्थिक अडचणीचे पाढे वाचणाऱ्या …

Read More »

तिजोरीत खडखडाट ? पूर- दरडबाधितांच्या मदतीकरीता फक्त २० कोटींचा निधी नुकसान भरपाईसाठी निधी कोठून आणायचा वित्त विभागाला पडला प्रश्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी आधीच कोरोनामुळे बेजार झालेल्या महाविकास आघाडीला आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीचे पुन्हा संकट आले असल्याने या आपत्तीला पैसा कोठून उभा करायचा असा प्रश्न वित्त विभागाला पडला असून तिजोरीत फारसा पैसा नसल्याने सध्या बाधित जिल्ह्यांच्या मदतीकरीता फक्त २० कोटी …

Read More »

बीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द ? पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे कार्यक्रम रद्द होणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे आणि दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमुळे वरळी येथील बीडीडी चाळीच्या पुर्नविकास प्रकल्पाचे दुसऱ्यांदा होणारा भूमिपूजन कार्यक्रम रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालय आणि गृहनिर्माण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईच्यादृष्टीने महत्वाचा असलेल्या बीडीडी चाळींच्या पुर्नविकास प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ …

Read More »

मुख्यमंत्र्यांना इतके दिवस हेलिकॉप्टर मिळालं नाही का ? कुठल्याही निकषांशिवाय तात्काळ मदत जाहीर करावी - भाजपची मागणी

तळीये-चिपळूण: प्रतिनिधी गेल्या ४ दिवसांपासून राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने, दरड कोसळलेल्या दुर्घटनांनी होत्याचं नव्हतं झालंय. आताची परिस्थिति अतिशय भीषण आहे. नुकसानग्रस्तांना थेट मदत मिळायला हवी. राज्याला विशेष मदत जाहीर करायला पाहिजे. नेहमीचे मदतीचे निकष आता लागू होणार नसून कुठल्याही निकषांशिवाय राज्य सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी विधान सभेचे विरोधी …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे आवाहन, वाढदिवस सेलिब्रेशन नको पण मुख्यमंत्री सहायत्ता निधीत योगदान द्या राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा …

Read More »

अतिवृष्टीचा फटका ८९० गावांना: जाणून घ्या कोठे किती मृत्यू आणि स्थलांतरीतांची संख्या अद्यापही ५९ अद्यापही बेपत्ता ७६ मृत्यू; सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

मुंबई : प्रतिनिधी सततच्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी- रायगडसह ९ जिल्ह्यात झालेल्या पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये एकूण ७६ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही ५९ नागरीक बेपत्ता आहेत. यापैकी सर्वाधिक नागरीत रायगड जिल्ह्यातील आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून ९ जिल्ह्यातील जवळपास ९० हजार नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने …

Read More »

महाडग्रस्तांसाठी अन्नाची पाकिटे, कपडे पाठवा हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुटका करणे सुरु : दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखाची मदत

मुंबई : प्रतिनिधी महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची …

Read More »

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी २७ जुलै रोजी होणार आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित …

Read More »

रत्नागिरी, रायगडमधील परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांनी दिल्या प्रशासनाला या सूचना जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : प्रतिनिधी गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा दिला असून रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित …

Read More »