Tag Archives: cm uddhav thackeray

मेट्रोसाठी लागणाऱ्या मिठागरांच्या जमिनींची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपविली भाजपा खासदारावर भाजपा खासदार गिरीष बापट यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने उपस्थित करण्यात येत असलेल्या आरे मेट्रो कारशेड आणि कांजूर मार्ग जमिनीवरून चांगलेच रणकंदन माजले असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या भविष्यातील मीठागरांच्या जमिनी मेट्रोसाठी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी भाजपाचे खासदार गिरीष बापट यांच्यावर सोपविल्याची …

Read More »

१०-१२ वीच्या परिक्षेच्या तारखा जाहिरः बालविवाह होवू नये यासाठी प्रयत्नशील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील १० वी ची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्यात येणार असून निकाल ऑगस्ट २०२१ मध्ये निकाल जाहिर करण्यात येणार आहे. तर १२ वीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ या कालावधी घेण्यात येणार असून जुलै २०२१ मध्ये १२ वीचा निकाल जाहीर …

Read More »

शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदलासाठी “स्टार्स” प्रकल्पाची अंमलबजावणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण ( Strengthening Teaching-learning and Results for States- STARS ) करण्याच्या उद्देशाने जागतिक बँक अर्थसहाय्यित, केंद्र पुरस्कृत प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, ओडिसा, राजस्थान, मध्यप्रदेश व केरळ अशा एकूण सहा …

Read More »

शासकीय बँकींग व्यवहार हाताळण्यास खाजगी बँकांना परवानगी राज्य सरकारचा खासगी बँकांबाबत युटर्न

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारने पोलिस कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांची पत्नी कार्यरत असलेल्या बँकेत वळविल्याविल्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उडविली. तसेच महाविकास आघाडी सरकार सत्तेत विराजमान झाल्यानंतर खाजगी बँकामधील शासनाकडून जमा करण्यात येणारे वेतन पुन्हा राष्ट्रीय बँकेतील खात्यातच भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या निर्णयास ७ ते ८ महिन्याचा …

Read More »

ग्रामीण भागातील मुलींना, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना १० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबविल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था असलेल्या गावी राहण्याकरिता ७ हजार रुपये व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी १० हजार रुपये एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याशिवाय मुलींना …

Read More »

मुंबईतील शेतकरी आंदोलनात शरद पवारांसह आघाडीचे नेते राहणार उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब हे २५ जानेवारी रोजी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी …

Read More »

उध्दव आपडा चे नंतर आता शिवसेनेचे “জয় বাংলা” ! (आनंद बांग्ला) शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी देशातील इतर राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत उतरून प्रांतिक असलेल्या शिवसेनेने राष्ट्रीय पक्ष म्हणून आपली वाटचाल सुरु केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या गुजरात, बिहार, उत्तर प्रदेशपाठोपाठ आता शिवसेनेने पश्चिम बंगालच्या निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. भाजपाला पर्याय ठरण्यासाठी शिवसेना पक्ष …

Read More »

औरंगाबाद नामांतर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले शिवसेनेला ढोंगी म्हणे शिळ्या कढीला ऊत आणला जातोय

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावरून धुराळा उठत असतानाच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी नामांतरचा प्रस्ताव राज्य सरकार लवकरच मांडणार असल्याचे जाहीर केले. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा राज्याच्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या या भूमिकेला चक्क ढोंगीपणाची उपमा देत शिळ्या कढीला ऊत आणण्याचा …

Read More »

पहिल्या दिवशी ८ लाखापैकी इतक्या जणांना दिला कोरोना लसचा पहिला डोस सायंकाळी सातपर्यंत १८ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी  लस  घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ …

Read More »

आजचा दिवस क्रांतीकारक पण कोविड सेंटर असेच ओस राहो मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर त्रिसूत्रीचा विसर पडू देऊ नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतीकारक पाऊल असल्याचे सांगतानाच सर्वात उत्तम लस ही मास्क आहे. लस घेतल्यानंतरसुद्धा मास्क वापरावा लागेल. आतापर्यंत आपण मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर या त्रिसूत्रीने कोरोनाचा मुकाबला केला आहे त्याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत आजही ते …

Read More »